Mumbai Family Biryani Watermelon Poison Case : मयत कुटुंबातील मुलीच्या शवविच्छेदनानंतर रासायनिक विश्लेषणासाठी घेतलेल्या नमुन्यांमध्ये फुफ्फुसांत अन्नघटक किंवा स्राव आहे का, याचा अभ्यास करण्यात येणार आहे. अफूच्या अतिरिक्त मात्रेच्या सेवनामुळे चौघांचा मृत्यू झाल्याचीही चर्चा आहे.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई : पायधुनी येथील डोकाडिया कुटुंबामधील चार जणांचे मृत्यू फळे कुजण्यामुळे निर्माण झालेल्या रासायनिक प्रक्रियेतून की, विषाणूंच्या प्रादुर्भावामुळे संसर्ग होऊन झाले, यादृष्टीने न्यायवैद्यकीय विश्लेषण केले जात आहे. प्राथमिक अहवालात त्यांच्या शरीरातील मेंदू, हृदय आणि आतडी यांसारखे मुख्य अवयव हिरव्या रंगाचे झाल्याचे आढळल्याने विषद्रव्याचा वापर झाला काय, या दिशेनेही तपास सुरू आहे.
विषद्रव्यांचा समावेश होता का
डोकाडिया कुटुंबाने खाल्लेल्या बिर्याणीमध्ये काही विषद्रव्याचा समावेश होता का किंवा कलिंगडामध्ये विषद्रव्ये टोचण्यात आली का, याविषयी चाचणी सुरू आहे. अफूच्या अतिरिक्त मात्रेच्या सेवनामुळे मृत्यू झाल्याचीही चर्चा आहे. हे औषध कॅन्सरग्रस्तांना वेदना कमी व्हाव्यात यासाठी देण्यात येते. ते औषधांच्या चिठ्ठीशिवाय कुणालाही मिळू शकत नाही. तसे असल्यास ते या कुटुंबाला कुणी आणून दिले, ते खुल्या बाजारात चिठ्ठीशिवाय उपलब्ध आहे का, असेही प्रश्न निर्माण होतात. रात्री उलट्या सुरू झाल्यानंतर या कुटुंबाने खासगी डॉक्टरला बोलावले व त्याने औषध दिले. त्याचा अंश घेतलेल्या नमुन्यांमध्ये असू शकतो.
मूत्रपिंडे निकामी होऊन मृत्यू ओढवतो
या कुटुंबातील मुलीच्या शवविच्छेदनानंतर रासायनिक विश्लेषणासाठी घेतलेल्या नमुन्यांमध्ये फुफ्फुसांत अन्नघटक किंवा स्राव आहे का, याचा अभ्यास करण्यात येणार आहे. अतिप्रमाणात उलट्या झाल्यामुळे शरीरातील पाण्याची पातळी अतिशय खालावते. परिणामी मूत्रपिंडे निकामी होऊन मृत्यू ओढवतो. तर अन्नातील कुजण्याच्या प्रक्रियेमधील रासायनिक घटकांमुळे डोक्यामध्ये, आतड्यांमध्ये अंतर्गत रक्तस्त्राव होण्याची शक्यताही नाकारता येत नाही. Pune News : कोंढव्याची तुलना कराचीसोबत? व्हिडिओने पुण्यात वाद पेटवला, भाजप पदाधिकारी सर्वेश मेहेंदळेंवर गुन्हा प्रत्येकाच्या शरीराची प्रतिकारशक्ती वेगवेगळी असते, त्यामुळे या चारही जणांचा मृत्यू या कलिंगड आणि बिर्याणीचे सेवन केल्यानंतर किती वेळात झाला, हे तपासले जात आहे. शरीरात विषारी द्रव्ये किंवा रासायनिक घटकांचा प्रादुर्भाव झाला असल्यास त्यासाठी किती वेळ लागला याचा निष्कर्ष त्यावरून काढण्यात येणार आहे.
खरंच आमचा पुळका तर तुकाराम मुंढेंना परत आणा, दिव्यांग बांधवांची बच्चू कडूंकडे मागणी
मायक्रोबायोलॉजी, हिस्टोपॅथालॉजी, फोरेन्सिक या विभागांच्या समन्वयाने मृत्यूचे नेमके कारण काय आहे यासंदर्भात अंतिम निष्कर्ष काढण्यात येणार आहे. कलिना येथील प्रयोगशाळेमध्ये काही नमुने पाठवण्यात आले आहेत, तर हिस्टोपॅथालॉजी विभागाचा अहवाल अद्याप प्रलंबित आहे. हा अंतिम अहवाल पोलिसांकडे देण्यात येणार असल्याची माहिती संबंधित प्रक्रियेशी संबंधित तज्ज्ञांनी दिली. Jabalpur Boat Tragedy : बोट बुडताना आईने मुलाला मिठीत धरलं, घट्ट बिलगलेल्या मायलेकाच्या बॉडी सापडल्या, कुटुंबाचा हंबरडा, मंत्रीही रडू लागले
अत्यंत तीव्र विषारी घटकाचा परिणाम
प्राथमिक अहवालात त्यांच्या शरीरातील मेंदू, हृदय आणि आतडी यांसारखे मुख्य अवयव हिरवट रंगाचे झाल्याचे आढळले आहे. अन्न विषबाधेत अशा प्रकारचे बदल सहसा दिसून येत नाहीत. जेव्हा शरीरातील अनेक अवयवांमध्ये एकाच वेळी असे बदल दिसतात, तेव्हा तो एखाद्या अत्यंत तीव्र विषारी घटकाचा परिणाम असू शकतो; हा घटक नेमका कोणता यासाठीही प्रगत रासायनिक विश्लेषण तपासण्या करण्यात येणार आहेत.
लेखकाबद्दलअनिश बेंद्रेअनिश बेंद्रे हे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये सहाय्यक वृत्त संपादक या पदावर कार्यरत आहेत. ते मटा ऑनलाईनमध्ये २०२२ पासून कार्यरत आहेत. टीव्ही आणि डिजिटल अशा दोन्ही माध्यमांचा एकत्रित १३ वर्षांचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. त्यांना राजकारण, समाजकारण यासोबतच मनोरंजन, गुन्हेगारी यासारख्या विविध विषयांवरील बातम्यांचे लेखन करण्याचा अनुभव आहे.
पत्रकारितेतील अनुभव अनिश बेंद्रे यांनी टीव्ही माध्यमातून पत्रकारितेला सुरुवात केली. एबीपी माझा वृत्तवाहिनीत सर्वप्रथम त्यांना प्रॉडक्शन आणि टिकर विभागात काम करण्याची संधी मिळाली. मराठी भाषेवरील प्रभुत्वामुळे त्यांनी लिहिलेल्या आकर्षक हेडलाईन्स सहकाऱ्यांसह प्रेक्षकांची वाहवा मिळवून गेल्या. त्यानंतर २०१५ मध्ये एबीपी माझा वृत्तवाहिनीच्याच वेब टीमसोबत त्यांनी डिजिटल विश्वात कामाचा श्रीगणेशा केला. डिजिटल माध्यमासाठी लेखन करण्याचं आव्हान पेलताना त्यांनी लक्षवेधी मथळे लिहिण्याचं कसब आत्मसात केलं. एबीपी समुहासोबत जवळपास ६ वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या. ट्रेनी, असिस्टंट प्रोड्युसर पदापासून प्रोड्युसरपर्यंत संधी मिळवली. मराठी भाषा दिवस, आंतरराष्ट्रीय पुरुष दिन, विवाहबाह्य संबंधावरील सुप्रीम कोर्टाचा निर्णय, वर्ल्ड टीव्ही डे यासारख्या विषयांवर त्यांनी केलेल्या डॉक्युमेंट्रीही विशेष गाजल्या.
पुढे टीव्ही९ मराठी वृत्तवाहिनीच्या वेबसाईटसोबत त्यांनी चार वर्ष काम केलं. यावेळी त्यांच्यातील नेतृत्व गुणांना वाव मिळाला. मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना बातमी लेखनाचं तंत्र शिकवण्यासोबतच त्यांनी सहकाऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन केले. टीमसोबत समन्वय राखणे, प्रत्येकातील गुण हेरुन त्यानुसार कामाची विभागणी करणे यामध्ये त्यांचा हातखंडा आहे. कारकिर्दीच्या १३ वर्षांपैकी दहाहून अधिक वर्ष त्यांनी डिजिटल विश्वात काम केलं आहे. या काळात लोकसभा-विधानसभा-महापालिका यासारख्या विविध निवडणुकांचा त्यांनी बारकाईने अभ्यास केला आहे.
अनिश बेंद्रे २०२२ पासून महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनसोबत काम करत आहेत. सुरुवातीपासूनच मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना त्यांनी सहाय्यक वृत्त संपादक पदापर्यंत उन्नती मिळवली आहे. बातम्यांच्या सखोल विश्लेषणासोबतच बातमीमागील बातमी जाणून घेण्यात त्यांना रस आहे. बातमीचे विविध पैलू जाणून घेत सोप्या भाषेत ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. मानसशास्त्र विषयातील अभ्यासामुळे गुन्हेगारी बातम्या उलगडून सांगण्यात त्यांना मदत होते. याशिवाय मटा मॉर्निंग बुलेटिनच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली होती. तसंच मटा पत्रकार परिषद या निवडणूक विषयक कार्यक्रमाची संकल्पना-संयोजन आणि सूत्रसंचालनही त्यांनी केले होते. निवडणुकांच्या निमित्ताने त्यांनी विविध मान्यवरांच्या मुलाखती घेतल्या, सखोल राजकीय विश्लेषण केले, तसेच सामान्य नागरिकांशी संवाद साधणारे काही कार्यक्रमही व्हिडिओ टीमसोबत केले.
शैक्षणिक पात्रता अनिश बेंद्रे यांनी २०१२ मध्ये रुपारेल महाविद्यालयातून मानसशास्त्र विषयात पदवी संपादन केली. त्यानंतर झेवियर्स महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. मराठीसोबतच हिंदी, इंग्रजी, संस्कृत आणि जपानी भाषेचाही त्यांनी अभ्यास केला आहे.… आणखी वाचा