Live News Marathi: महाराष्ट्र दिनापासून सुरू होणाऱ्या या जनगणेनच्या पहिल्या टप्प्यात स्व-गणना केली जाणार असून, १ मे ते १५ मे या कालावधीत ही प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. आगामी विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार असल्याचे निश्चित झाले आहे. अर्ज भरण्याचा अखेरच्या दिवशी, गुरुवारी शिवसेनेकडून उपसभापती नीलम गोऱ्हे यांना, तर प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांना उमेदवारी देण्यात आली. शिवसेना (उबाठा) पक्षाकडून अंबादास दानवे यांनी अर्ज दाखल केला. या उमेदवारीवरून नाराज झालेल्या काँग्रेसने अखेर माघार घेत दानवे यांना पाठिंबा दिला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून झिशान सिद्दीकी यांनी अर्ज दाखल केला.
दिवसभरातील ताज्या बातम्या, ब्रेकिंग न्यूज पाहा फक्त एकाच ठिकाणी
