Amol Mitkari On Jay Pawar: अजित पवार यांची उणीव भरून काढण्याची क्षमता असलेला हा चेहरा पक्षासाठी संजीवनी ठरेल, असे त्यांनी म्हटले आहे.
अजित पवार यांच्या मृत्यूनंतर जय पवारही राजकारणात सक्रिय झाले असून, नुकत्याच झालेल्या बारामती पोटनिवडणुकीत त्यांनी प्रचारात भाग घेतला होता. विधान परिषदेसाठी १२ मे रोजी निवडणूक होणार असून, यात राष्ट्रवादीकडून एका जागा लढविण्यात येणार आहे.
Mumbai Crime: शुभमंगल ‘सावधान’! मुंबईतील तरुणीला लाखोंना गंडवून नवरदेव पळाला, ४ वर्ष काढलं वेड्यात, प्रकरण काय?
‘घराणेशाही वाटेल ते वाटू दे’
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विधान परिषदेच्या एका जागेसाठी कार्यकर्ते व नेत्यांच्या जवळच्या लोकांची मोर्चेबांधणी व चढाओढ पाहता आगामी काळात राज्यभर पक्ष वाढीसाठी अजितदादांसारखा विश्वासू व युवा चेहरा पुढे आणण्याची आवश्यकता आहे. सद्यस्थितीत जय पवार हे नाव या जागेसाठी सर्वोत्तम आहे. कदाचित इतरांना घराणेशाही वाटेल ते वाटू दे, मात्र अजितदादांनंतर भविष्यात हा चेहरा दादांसारखाच आश्वासक वाटतो. दादांची उणीव भरून काढण्याची क्षमता असलेला हा चेहरा संजीवनी ठरेल. अंतिम निर्णय पक्षाचा असेल, असे ते म्हणाले.
El Nino Alert: भारतावर मोठं संकट! ‘एल निनो’मुळे हवामानात होणार उलथापालथ, काय सांगतो WMOचा अहवाल
‘तीन पक्षांची तोंडे तीन दिशेला’
मुंबई : ‘विधान परिषदेच्या निवडणुकीत कोणी कोणाचे नाही. हे फक्त पैशांचे काम आहे. त्यामुळे मते सांभाळा, हा संजय राऊत यांनी दिलेला सल्ला म्हणजे उद्धव ठाकरेंना यांना एक प्रकारे दिलेला इशाराच आहे. विधान परिषद निवडणुकीला उद्धव ठाकरे उभे राहिले तर महाविकास आघाडीची मते फुटतील आणि तुमचा पराभव होऊ शकतो . महाविकास आघाडीत तीन पक्षांची तोंडे तीन दिशेला आहेत,’ अशी टीका भाजपचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी सोमवारी केली.
