Pune Borghat Accident: द्रुतगती मार्गावर नव्याने साकारलेल्या ‘मिसिंग लिंक’चे उद्घाटन एक मे रोजी अपेक्षित आहे. ‘मिसिंग लिंक’मुळे छोटी वाहने आणि बसना बोरघाटाला पर्याय मिळाला असून, याबरोबरच घाटातील धोकादायक वाहतुकीचा मुद्दाही पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.
‘एक्स्प्रेस वे’वरील २०२३ ते २०२५ या तीन वर्षांच्या कालावधीत अपघातांमध्ये बोरघाटात झालेल्या अपघातांचे प्रमाण अधिक आहे. २०२३मध्ये एकूण १५४ अपघातांपैकी १०६ अपघात बोरघाटात झाले होते, तर ६५ मृत्यूंपैकी ३९ मृत्यू याच पट्ट्यात नोंदले गेले. २०२४मध्ये अपघातांची संख्या १९१वर पोहोचली असून, त्यातील १०८ अपघात बोरघाटात झाले. या वर्षी ९० मृत्यूंपैकी ४२ मृत्यू घाटात झाले, तर १४३ गंभीर जखमींपैकी ५१ जण या भागात जखमी झाले. २०२५मध्ये अपघातांची संख्या १८७ होती, त्यापैकी ९१ अपघात घाटात झाले. ६८ मृत्यूंपैकी ३९ मृत्यू आणि १४० गंभीर जखमींपैकी २४ जखमी बोरघाटातील अपघातांमध्ये होते.
Prakash Abitkar: महाराष्ट्राने गमावले दोन मुख्यमंत्री! पतंगराव कदम, अजितदादांबाबत आबिटकरांचं वक्तव्य
चालू वर्षात बोरघाट अधिक धोकादायक
सन २०२६मध्ये जानेवारी ते मार्च या तीन महिन्यांत परिस्थिती आणखी गंभीर झाल्याचे दिसून येते. या कालावधीत एकूण ३६ अपघातांपैकी ३५ अपघात बोरघाटातच झाले आहेत. या अपघातांमध्ये १३ जणांचा मृत्यू झाला असून, त्यापैकी नऊ मृत्यू घाटात झाले आहेत. १६ गंभीर जखमींपैकी १२ जखमी बोरघाटातील अपघातांमध्ये नोंदवले गेले आहेत.
Amit Thackeray : ‘त्यांच्यात मुंबई बंद करण्याची ताकद नाही, मराठी रिक्षा चालक मुंबई सुरळीत ठेवतील’; अमित ठाकरेंचं वक्तव्य; म्हणाले, ‘गावी जा…’
बोरघाटात होणारी वाहतूक कोंडी आणि अपघात प्रामुख्याने अवजड वाहनांच्या बेशिस्तीमुळे होत असल्याचे दिसले आहे. आता ‘मिसिंग लिंक’ सुरू झाल्यानंतर तेथून केवळ छोटी प्रवासी वाहने सोडली आणि घाटातून अवजड वाहने सोडल्यास चित्र नक्कीच बदलेल. ‘मिसिंग लिंक’ कार्यान्वित झाल्यानंतर संबंधित सर्व यंत्रणांनी समन्वय साधून काम करायला हवे. – तन्मय पेंडसे, वाहतूक अभ्यासक
Pune News : टाकी स्वच्छ करण्यासाठी खाली उतरला, श्वास गुदमरल्याने त्याला वाचवण्यासाठी दुसराही उतरला; पुण्यात तीन कामगारांचा हृदयद्रावक अंत
अपघातांची प्रमुख कारणे…
-बोरघाटातील अपघातांमागे अनेक तांत्रिक आणि मानवी कारणांचा एकत्रित परिणाम दिसतो.
-घाटातील तीव्र वळणे आणि लांब उतार यामुळे वाहनांवर नियंत्रण ठेवणे अवघड होते.
-विशेषतः उतारावर वेग वाढल्यास चालकांना अचानक ब्रेक लावणे कठीण जाते.
-वेगमर्यादेचे उल्लंघन हे अपघातांचे मोठे कारण ठरत आहे. जड वाहनांचे ब्रेक निकामी होणे ही एक समस्या.
-ट्रक आणि कंटेनरला दीर्घ उतारावर सतत ब्रेक वापरावा लागल्याने गरम होऊन निकामी होण्याचे प्रकार घडतात.
-धुके, पाऊस आणि कमी दृश्यमानता यांसारखे हवामानातील बदल अपघातांना कारणीभूत ठरतात.
-रस्ता ओला असल्यास घसरण्याचा धोका वाढतो.
