Pune Weather Update 26 april 2026: गेल्या आठवड्यात शहरात गारांचा पाऊस पडला होता. मात्र, हवामानातील प्रतिकूल घडामोडींमुळे चार दिवसांपासून पारा ३९ ते ४१ अंशामध्येच रेंगाळला आहे.
पुणे शहराबरोबरच जिल्ह्यासह मध्य महाराष्ट्रात गेल्या दोन दिवसांत तापमानात लक्षणीय वाढ झाली आहे. पुण्यात गुरुवारी कमाल तापमान ४० अंशांच्या पुढे नोंदविण्यात आले होते. शुक्रवारी त्यात थोडी घट झाली, दुपारनंतर आकाश ढगाळ होते. उन्हाचा चटका नाही; पण उकाडा वाढला होता. रात्री सरासरीच्या तुलनेत किमान तापमानात साडेतीन अंशांनी वाढ होऊन २४.३ अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले. शनिवारी सकाळपासूनच उन्हाचा चटका जाणवला.
Pune News : ऐकावं ते नवलंच! पुण्यात तरुणाने पळवली PMPMLची बस, पोलीस तपासात काय खुलासा? नेमकी चूक कोणाची?
अकोल्यात उच्चांकी तापमान
राज्यात शनिवारी उच्चांकी ४५.६ अंश सेल्सिअस तापमान अकोल्यात आणि किमान तापमान २१.६ अंश सेल्सिअस महाबळेश्वरमध्ये नोंदविण्यात आले. विदर्भातील सर्वच जिल्ह्यांमध्ये पारा ४० ते ४५ अंशांच्या पुढेच नोंदवला गेला.
पुण्यात ‘यलो अलर्ट’
पुण्यात पुढील दोन दिवसांत कमाल आणि किमान तापमानात वाढ कायम राहणार आहे. दुपारनंतर आकाश सामान्यतः ढगाळ राहणार असून, मेघगर्जनेसह विजांच्या कडकडाटासह हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे भारतीय हवामानशास्त्र विभागाने पुण्यासाठी पावसाचा यलो अलर्ट दिला आहे.
Sanjay Gaikwad ला घराबाहेर पडू देणार नाही, वंचित आक्रमक, जोरदार घोषणाबाजी
पुण्यातील तापमान (अंश सेल्सिअसमध्ये)
परिसर -कमाल -किमान
लोहगाव ४२.४ —२७.१
शिवाजीनगर ४०.९ —२४.३
वडगावशेरी ४०.७ —२८
चिंचवड ४०.५ —२६.७
तळेगाव ४०.१ —१६.७
हडपसर ३९.६ —२६.६
पाषाण ३९.२ —२३.३
एनडीए ३८.७ —२३.२
आंबेगाव ३८.५ —२५.४
Raigad News : रायगडमध्ये तब्बल 6 पोलीस कर्मचारी निलंबित, डॅशिंग SP आँचल दलाल यांचे आदेश, नेमकं प्रकरण काय?
उष्माघाताचे रुग्ण वाढले
राज्यात उष्मा वाढत असताना उष्माघाताच्या रुग्णांची संख्याही वाढती आहे. आत्तापर्यंत ३९ जणांना उष्माघाताचा त्रास झाला. एका व्यक्तीचा त्यामुळे मृत्यू झाल्याचा अंदाज आहे. मात्र वैद्यकीय विश्लेषण झाल्यानंतर निश्चित निदान होईल, असे आरोग्य विभागातील वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. राज्यात नंदुरबार, रत्नागिरी, गडचिरोली, जालना, पालघर, रायगड, सातारा या जिल्ह्यांमध्ये प्रत्येकी दोन, तर गोंदिया, जळगाव, नाशिक, परभणी, पुणे, सोलापूर, ठाण्यामध्ये प्रत्येकी एका रुग्णाची नोंद झाली. सोलापूरमध्ये एका रुग्णाचा उष्माघाताने मृत्यू झाल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. उष्मा वाढत असून येत्या काळात तापमान आणखी वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे अधिक काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. हलका आहार, भरपूर पाणी पिणे, गरज असल्यास वैद्यकीय मदत घ्यावी, असे आवाहन सार्वजनिक आरोग्य विभागाने केले. दुपारच्या वेळी घराबाहेर पडणे टाळावे, उष्माघाताचा त्रास झाल्यास वैद्यकीय मदत घ्यावी, असाही सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे.
