Mumbai Weather: महामुंबईत उष्णतेचा कहर; पारा ४१°C पार, नागरिक हैराण
मुंबईसह ठाणे आणि पालघर जिल्ह्यांत उष्णतेची तीव्र लाट कायम असून महामुंबई परिसरात तापमान ४१ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले आहे. कल्याण, डोंबिवली, भिवंडी, बदलापूर आणि कर्जत येथे प्रचंड उकाडा जाणवत आहे. मुंबईतही तापमान ३५-३६ अंशांच्या आसपास असून उष्णता आणि दमट हवेमुळे नागरिकांना अस्वस्थता जाणवत आहे. हवामान तज्ज्ञांच्या मते, आजही उष्णतेची तीव्रता कायम राहण्याची शक्यता आहे.
