Maharashtra Weather Update 25 April 2026: मुंबईच्या तुलनेत ठाणे, पालघर जिल्ह्यांत तापमान अधिक असते. एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात या दोन जिल्ह्यांतील अनेक भागांत ४० अंश सेल्सिअसहून अधिक तापमानाची नोंद झाली.
मुंबईत वातावरणामध्ये उष्णता साचून राहिल्याने नागरिकांना अस्वस्थता जाणवत होती. येथे किमान तापमानाचा पाराही चढा होता. कुलाबा येथे २६.५, सांताक्रूझ येथे २६.१ अंश सेल्सिअस किमान तापमान नोंदवण्यात आले आहे. सांताक्रूझ येथील किमान तापमान सरासरीपेक्षा १.२ अंशांनी अधिक असल्याचे निदर्शनास आले.
कर्जत, मुरबाड, कल्याण, डोंबिवली, भिवंडी आदी परिसरात उष्णतेचा पारा अधिक आहे. गुरुवारी कल्याण, डोंबिवली, भिवंडी, बदलापूर, कर्जत परिसरात ४३ अंश कमाल तापमानाची नोंद झाली होती. शुक्रवारी यापेक्षा किंचित कमी तापमान नोंदवण्यात आले. आज, शनिवारी पुन्हा तापमान वाढण्याची शक्यता आहे, अशी माहिती हवामान अभ्यासक अभिजीत मोडक यांनी दिली.
Central Railway Megablock: मध्य रेल्वेवर आज 15 तासांचा ब्लॉक! आसनगाव–कसारा दरम्यान लोकल ठप्प; मेल-एक्स्प्रेसवर परिणाम
नाशिकमध्ये विक्रमी किमान तापमान
नाशिक : नाशिक जिल्ह्यात हंगामातील विक्रमी किमान तापमानाची शुक्रवारी नोंद झाली. हे तापमान २४.३ अंश सेल्सियस नोंदविले गेले. गारवा गायब झाल्याचा आणि सकाळपासूनच उकाडा जाणवत असल्याचा प्रत्यय नाशिककरांना येत आहे. कमाल तापमानही ३९.६ अंश सेल्सियस नोंदविले गेले. जळगावचे तापमान ४३.३ अंशांवर पोहोचले असून, मालेगाव आणि छत्रपती संभाजीनगरचे तापमान ४१.६ अंश सेल्सियस नोंदविण्यात आले आहे.
जळगावात उष्माघाताने मृत्यू
जळगाव : जळगाव जिल्ह्यात कमाल तापमानाचा पारा ४२.८ अंशांपर्यंत पोहोचला आहे. ही होरपळ आता कष्टकऱ्यांच्या जिवावर बेतू लागली आहे. रावेर शहरातील एका बांधकाम कामगाराचा गुरुवारी मध्यरात्री मृत्यू झाला असून, उष्माघातामुळे त्याचा बळी गेल्याचा प्राथमिक अंदाज वैद्यकीय सूत्रांनी वर्तवला आहे. योगेश सुधाकर महाजन असे या कामगाराचे नाव आहे.
Marathi Compulsion : दहिसरमध्ये मनसे-शिवसेनेचे कार्यकर्ते समोरासमोर, संजय निरुपम यांच्या गाडीच्या टायरची हवा काढली
कोकणालाही झळा
मुंबईसोबतच कोकण विभागातील कमाल तापमानाचा पारा चढा आहे. रत्नागिरी येथे ३६.३, तर डहाणू येथे ३५.६ अंश सेल्सिअस कमाल तापमान शुक्रवारी नोंदले गेले. उष्णता निर्देशांकाच्या आकडेवारीनुसार, कोकण किनारपट्टीवर, तसेच मुंबईतील कमाल तापमानाची जाणीव ही ४० अंशांच्या पार होती, असे दिसले. महाराष्ट्राच्या अंतर्भागात तुरळक ठिकाणी कमाल तापमानाची जाणीव ही ४० अंशांहून कमी होती, अशीही नोंद झाली. परंतु विदर्भ, कोकण किनारपट्टी येथे मात्र ही जाणीव अधिक तीव्र असल्याचे निदर्शनास आले.
मुंबईतील शुक्रवारचे कमाल तापमान (अंश सेल्सिअस)
राममंदिर : ३६.८
विक्रोळी : ३६.६
विद्याविहार : ३५.९
चेंबूर : ३५.४
वांद्रे आणि दहिसर : ३५.१
