• Sat. Jun 13th, 2026
    Tuljapur Rain: तुळजापुरात अवकाळीचा कहर; धारुरमध्ये गारांचा खच, वीज कोसळून एकाचा मृत्यू

    Tuljapur Unseasonal Rain: रस्त्यांवर बर्फाचे थर साचल्याने वाहनचालकांना कसरत करावी लागली, तर काही काळ वाहतूकही पूर्णतः ठप्प झाली होती.

    तुळजापूर पाऊस(फोटो– महाराष्ट्र टाइम्स)
    म.टा.प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर: धाराशिव जिल्ह्यातील धारुर परिसराला (ता. तुळजापुर) मंगळवारी सायंकाळी अवकाळी पावसाने झोडपून काढले. सोबतच वादळी वाऱ्यासह झालेल्या जोरदार गारपिटीमुळे जनजीवन विस्कळीत झाले. धारूरमध्ये रस्त्यांवर अक्षरशः बर्फाचे थर साचले होते. यामुळे शेतीपिकांचे अतोनात नुकसान झाले असून बळीराजा पुन्हा एकदा संकटात सापडला आहे. तर वीज कोसळून एकाचा मृत्यू झाला आहे.

    मंगळवारी दिवसभर उन्हाचा चटका तीव्रतेने जाणवत होता. सायंकाळच्या सुमारास हवामानात अचानक बदल झाला. तुळजापूरपासून साधारण १० ते १२ किलोमीटर अंतरावर असलेल्या धारूर परिसरात ढगांच्या गडगडाटासह पावसाला सुरुवात झाली. तर अवघ्या काही वेळातच मोठ्या प्रमाणात गारपीट झाली.
    Maharashtra TimesMarathwada Farmer Death Cases: भीषण वास्तव! मराठवाड्यात वर्षभरात सुमारे हजार शेतकऱ्यांनी संपवलं जीवन; कोणत्या जिल्ह्यांत सर्वाधिक घटना?
    या नैसर्गिक आपत्तीचा सर्वाधिक फटका शेतीला बसला आहे. परिसरात मोठ्या प्रमाणावर घेतल्या जाणाऱ्या भाजीपाला पिकांसह फळबागांचे मोठे नुकसान झाले आहे. काढणीला आलेली पिके भूईसपाट झाल्याने शेतकरी पुन्हा एकदा अडचणीत सापडला आहे. शासनाने तात्काळ पंचनामे करून नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. दरम्यान, मोठ्या आकाराच्या गारांमुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. सुरक्षिततेसाठी नागरिकांनी घराचा आसरा घेतला. मात्र, दुसरीकडे निसर्गाचे हे रौद्र पण ‘पांढरे’ रूप पाहून अनेकांनी आपल्या मोबाईलमध्ये या दृश्यांचे चित्रीकरण केले असून, सोशल मीडियावर याचे व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहेत.

    Maharashtra TimesMaharashtra Politics : छत्रपती संभाजीनगरमध्ये 10 जणांना नगरसेवकपदाची लॉटरी, कुणाकुणाला मिळाली संधी?
    दरम्यान, तुळजापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी समाजमाध्यमावरून परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेत नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. नुकसानीचे पंचनाम्याचे आदेशही देण्यात आल्याचेही त्यांनी नमूद केले. येत्या काही दिवसांत पुन्हा वादळ, जोरदार वारा, पाऊस आणि गारपिटीची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर, नागरिकांनी स्वतःची आणि कुटुंबाची योग्य ती काळजी घ्यावी,असे प्रशासनाने नमूद केले आहे.

    किशोरी तेलकर

    लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर

    किशोरी तेलकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. किशोरी या २०२२पासून मटा ऑनलाइन सोबत जोडलेल्या आहेत. राजकारण, हायपर लोकल स्टोरी, क्राईम बातम्या, महिलांविषयक समस्या, गाव खेड्यातल्या बातम्या करण्याचा त्यांचा अनुभव आहे.

    पत्रकारितेतील अनुभव
    किशोरी यांना वृत्तपत्र, टीव्ही आणि डिजिटल माध्यमांमधील ६ वर्षांचा अनुभव आहे. किशोरी यांनी सकाळ वृत्तपत्रातून पत्रकारितेला सुरुवात केली. सकाळ वृत्तपत्रात काम करतांना त्यांनी प्रिंट मीडियासोबतच सोशल मीडिया हॅंडलिंग, वेबसाईटचेही काम केलं आहे. सध्या चार वर्षांपासून त्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. लेखन कौशल्याच्या जोरावर सामाजिक समस्या, शाळा- कॉलेज विद्यार्थी समस्या, आरोग्य टिप्स, महिलांविषयक प्रश्न, फॅशन, लाइफस्टाइल या विविध विषयांवर त्यांनी बातम्या केल्या आहेत.

    शैक्षणिक पात्रता
    किशोरी तेलकर यांनी कै. बिंदू रामराव देशमुख कला व वाणिज्य महिला महाविद्यालय, नाशिकरोड येथून एम.कॉम पदवी संपादन केली. त्यानंतर गोखले एज्युकेशन सोसायटीचे एच.पी.टी आर्ट्स अँड आर.वाय.के सायन्स कॉलेजमधून कम्युनिकेशन अँड जर्नलिझम विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. जर्नलिझमचे शिक्षण घेत असतानाच किशोरी यांनी देशदूत, दिव्यमराठी सारख्या वृत्तपत्रात इंटर्नशिप केलेली आहे. मराठी भाषेवर प्रभुत्व असून हिंदी, इंग्रजी भाषाही त्यांना अवगत आहेत.… आणखी वाचा