Maharashtra Politics : मविआतील तीनही पक्षांनी समन्वय साधत अधिकची दहा मते खेचून आणल्यास त्यांचे दोन जण विधान परिषदेवर जाऊ शकतात, मात्र यासाठी मोठी कसरत करावी लागणार आहे.
विधान परिषदेसाठी सकाळी ९ वाजल्यापासून दुपारी ४ वाजेपर्यंत मतदान होईल, तर त्याच दिवशी निकाल जाहीर होतील. दरम्यान संख्याबळानुसार सत्ताधारी महायुतीच्या पारड्यात ८ जागा जाणार असून महाविकास आघाडीला एक जागा मिळणार आहे. ही एक जागा कोणाला जाते, याविषयी उत्सुकता आहे.
ठाकरेंच्या नावामुळे काँग्रेसची अडचण
सध्याच्या विधान परिषदेच्या ९ सदस्यांचा कार्यकाळ १३ मे रोजी संपणार आहे. निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाल्याने राजकीय पक्षातील इच्छुकांच्या हालचाली आपोआपच वाढल्या आहेत. मागच्या वेळी राज्यसभेसाठी उद्धव ठाकरे यांचा शिवसेना पक्ष हा प्रमुख दावेदार होता. पण तरीही त्यांनी ही जागा शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि प्रामुख्याने शरद पवार यांच्यासाठी सोडली. काँग्रेसनेही पवारांना पाठिंबा दिला. आता विधान परिषदेवर उद्धव ठाकरे यांना पाठविण्याची मागणी शिवसेना उबाठा पक्षाकडून करण्यात येत आहे. साहजिकच काँग्रेसच्या अडचणी वाढल्या आहेत. तीनही पक्षांनी समन्वय साधत अधिकची दहा मते खेचून आणल्यास महाविकास आघाडीचे दोन जण विधान परिषदेवर जाऊ शकतात. मात्र यासाठी मोठी कसरत करावी लागणार आहे.
Two brothers One wife : दोन सख्ख्या भावांशी लग्न करणारी महिला आई झाली, चिमुकली पावलं घरी येताच परदेशी राहणाऱ्या पित्याची प्रतिक्रिया समोर
२८ मतांचा कोटा
विधान परिषदेचा एक आमदार निवडून येण्यासाठी २८ मतांचा कोटा आवश्यक आहे. महायुतीत भाजप (१३१ आमदार), एकनाथ शिंदे यांची शिवसेना (५७ आमदार) आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी (४० आमदार) असे बलाबल पाहता महायुतीचे ८ उमेदवार सहज निवडून येऊ शकतात. तर महाविकास आघाडीचे एकूण संख्याबळ ४६ आहे. त्यामुळे त्यांचा केवळ एकच उमेदवार सहज निवडून येऊ शकतो. काँग्रेसने पाठिंबा नाही दिला तरी उद्धव ठाकरे हे सहज विधान परिषदेवर निवडून जाऊ शकतात.
MLC Election 2026 : विधानपरिषदेच्या एका जागेसाठी चढाओढ, महायुती महाविकास आघाडीची धाकधूक वाढणार?
‘मुख्यमंत्र्यांनी बारामतीप्रमाणे संस्कृती जपावी’
‘राज्यसभा निवडणुकीत काँग्रेसचा उमेदवार असावा व विधान परिषदेला मविआचा चेहरा उद्धव ठाकरे यांनी उमेदवारी करावी अशी काँग्रेस पक्षाची भूमिका होती. पण ज्येष्ठ नेते शरद पवार यांना मविआकडून राज्यसभेची उमेदवारी देण्यात आली. आता विधान परिषदेला जर उद्धव ठाकरे उमेदवार नसतील तर काँग्रेस पक्षाला उमेदवारी द्यावी, अशी आमची भूमिका आहे. विधान परिषदेची एक जागा ही काँग्रेसचे नेते राजीव सातव यांची होती. त्यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी प्रज्ञा सातव यांना काँग्रेसने उमेदवारी दिली होती. पण त्यांनी राजीनामा दिला. त्या जागेवर काँग्रेसच्या उमेदवाराला बिनविरोध निवडून दिले पाहिजे. यासाठी मुख्यमंत्र्यांनी बारामतीप्रमाणे संस्कृती व परंपरेचे पालन करावे’, असे आवाहन सपकाळ यांनी केले आहे. विधान परिषदेच्या रिक्त जागेची निवडणूकही त्याच दिवशी, म्हणजे 12 मे रोजी होणार आहे.
Vinod Tawde : बिहारमध्ये भाजपचा पहिला मुख्यमंत्री, विनोद तावडेंची पडद्यामागून शिष्टाई, गुप्तपणे सत्तेचे दरवाजे उघडले
विधान परिषदेतील या ९ आमदारांचा कार्यकाळ संपणार
उद्धव ठाकरे (शिवसेना – उबाठा), नीलम गोऱ्हे (शिवसेना), शशिकांत शिंदे (राष्ट्रवादी – शरद पवार गट), अमोल मिटकरी (राष्ट्रवादी – अजित पवार गट), दादाराव कैंचे (भाजप) , रणजितसिंह मोहिते-पाटील (भाजप), संजय केणेकर, (भाजप), संदिप जोशी (भाजप) आणि राजेश राठोड (काँग्रेस)
