• Sun. Jun 7th, 2026
    Nashik ZP: दप्तर दिरंगाई झाल्यास थेट कारवाई; नाशिक जिल्हा परिषदेचे CEO ओमकार पवार यांचा इशारा

    Nashik ZP News: जिल्हा परिषदेचे कर्मचारी लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात अडकण्याच्या वाढत्या घटनांमुळे प्रशासनाची प्रतिमा मलीन होत असल्याबद्दल त्यांनी तीव्र खेद व्यक्त केला. या पार्श्वभूमीवर, सर्व प्रलंबित कामांचा तत्काळ निपटारा करण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत.

    nashik zp(फोटो– महाराष्ट्र टाइम्स)
    म. टा. प्रतिनिधी, नाशिक: जिल्हा परिषदेच्या प्रशासकीय कामकाजात गतिमानता आणण्यासाठी आणि अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सचोटीवर प्रश्नचिन्ह निर्माण करणाऱ्या घटनांना पायबंद घालण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार यांनी आक्रमक पाऊल उचलले आहे.

    पंचायत समित्यांनाही इशारा
    मुख्यालयातील महत्त्वाच्या नस्ती त्रयस्थ व्यक्तींच्या हाती दिल्यास किंवा त्यातील कागदपत्रे गहाळ झाल्यास संबंधित संकलन कर्मचाऱ्याला वैयक्तिकरीत्या जबाबदार धरून निलंबित केले जाईल. याशिवाय, ‘बीओटी’ तत्त्वावरील कामांसाठी जिल्हा स्तरावरून कोणताही ठेकेदार ठरवून दिला जात नाही. त्यामुळे तोंडी आदेशाचे कारण सांगून कामे मिळवण्याचा प्रयत्न करणाऱ्या ठेकेदारांना कामे देऊ नयेत, अशा स्पष्ट सूचना पंचायत समित्यांना देण्यात आल्या आहेत. प्रशासकीय शिस्त मोडणाऱ्या कोणत्याही अधिकारी किंवा कर्मचाऱ्याची गय केली जाणार नाही आणि त्यांच्यावर एकतर्फी शिस्तभंगविषयक कारवाई केली जाईल, असे या परिपत्रकात स्पष्ट करण्यात आले आहे.

    Maharashtra TimesNashik Crime: सलगीतून धर्मांतराचा डाव; विशिष्ट धर्माच्या तरुण-तरुणींकडून प्रयत्न, SITकडून ‘एचआर’ची चौकशी
    वैद्यकीय बिलांसाठी आता पंधरा दिवसांची मुदत
    अनेकदा तांत्रिक मान्यतेच्या नावाखाली वैद्यकीय बिले आणि इतर देयके दीर्घकाळ प्रलंबित ठेवली जातात. आता आरोग्य विभागाला वैद्यकीय बिलांच्या तांत्रिक मान्यतेसाठी जास्तीत जास्त १५ दिवसांची मुदत देण्यात आली आहे.जर यापेक्षा जास्त विलंब झाला, तर संबंधित कर्मचाऱ्यांवर ‘दप्तर दिरंगाई’ कायद्यांतर्गत शिस्तभंगविषयक कारवाई केली जाईल, असा इशारा पत्राद्वारे देण्यात आला आहे.

    Maharashtra TimesNashik Crime : सिंगल असल्याचं भासवून फ्लर्ट, WhatsApp ग्रुपवर प्लॅन, आठ तरुणींशी जवळीक, नाशिकच्या MNC मध्ये धर्मांतराचं जाळं
    विनापरवाना मुख्यालयात फिरणाऱ्यांवर लक्ष
    तालुका स्तरावरील अनेक कर्मचारी कोणतेही ठोस कारण नसताना जिल्हा परिषद मुख्यालयात वावरताना दिसतात, ज्यामुळे मूळ कामकाजावर परिणाम होतो. यापुढे अशा कर्मचाऱ्यांची मुख्यालयात येताना ‘अभ्यागत नोंदवही’त नोंद करणे अनिवार्य असेल. तसेच, हालचाल नोंदवही मध्ये नोंद न करता बाहेर जाणाऱ्या कर्मचाऱ्यांवर थेट निलंबनाची कारवाई प्रस्तावित करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

    किशोरी तेलकर

    लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर

    किशोरी तेलकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. किशोरी या २०२२पासून मटा ऑनलाइन सोबत जोडलेल्या आहेत. राजकारण, हायपर लोकल स्टोरी, क्राईम बातम्या, महिलांविषयक समस्या, गाव खेड्यातल्या बातम्या करण्याचा त्यांचा अनुभव आहे.

    पत्रकारितेतील अनुभव
    किशोरी यांना वृत्तपत्र, टीव्ही आणि डिजिटल माध्यमांमधील ६ वर्षांचा अनुभव आहे. किशोरी यांनी सकाळ वृत्तपत्रातून पत्रकारितेला सुरुवात केली. सकाळ वृत्तपत्रात काम करतांना त्यांनी प्रिंट मीडियासोबतच सोशल मीडिया हॅंडलिंग, वेबसाईटचेही काम केलं आहे. सध्या चार वर्षांपासून त्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. लेखन कौशल्याच्या जोरावर सामाजिक समस्या, शाळा- कॉलेज विद्यार्थी समस्या, आरोग्य टिप्स, महिलांविषयक प्रश्न, फॅशन, लाइफस्टाइल या विविध विषयांवर त्यांनी बातम्या केल्या आहेत.

    शैक्षणिक पात्रता
    किशोरी तेलकर यांनी कै. बिंदू रामराव देशमुख कला व वाणिज्य महिला महाविद्यालय, नाशिकरोड येथून एम.कॉम पदवी संपादन केली. त्यानंतर गोखले एज्युकेशन सोसायटीचे एच.पी.टी आर्ट्स अँड आर.वाय.के सायन्स कॉलेजमधून कम्युनिकेशन अँड जर्नलिझम विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. जर्नलिझमचे शिक्षण घेत असतानाच किशोरी यांनी देशदूत, दिव्यमराठी सारख्या वृत्तपत्रात इंटर्नशिप केलेली आहे. मराठी भाषेवर प्रभुत्व असून हिंदी, इंग्रजी भाषाही त्यांना अवगत आहेत.… आणखी वाचा