बेळगाव सीमा प्रश्नावरून सांगली मध्ये भाजपाचे मंत्री चंद्रकांत पाटील आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जयंत पाटलांमध्ये चांगलीचं जुगलबंदी रंगली. बेळगाववासी आशा लावून बसलेले आहेत, पण चंद्रकांतदादा भेटतच नाहीत, असा मिश्किल टोला जयंत पाटलांनी चंद्रकांत पाटलांना लगावला. यावर मंत्री चंद्रकांत पाटलांनीही जयंत पाटलांना खोचक टोला लगावत प्रत्युत्तर दिलं.