• Wed. Jun 17th, 2026

    Sharad Pawar : बारामतीत काँग्रेसचा उमेदवार, राष्ट्रवादीचे विलीनीकरण ते ठाकरेंना विधान परिषदेत पाठिंबा, शरद पवार रोखठोक बोलले

    Sharad Pawar : बारामतीत काँग्रेसचा उमेदवार, राष्ट्रवादीचे विलीनीकरण ते ठाकरेंना विधान परिषदेत पाठिंबा, शरद पवार रोखठोक बोलले

    ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी आज पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी विविध मुद्द्यांवर भूमिका मांडली. यामध्ये बारामतीच्या पोटनिवडणुकीत काँग्रेसने दिलेला उमेदवार, विधान परिषदेत उद्धव ठाकरेंना पाठिंबा देण्याबाबत केलेल्या वक्तव्यापासून ते राष्ट्रवादीचे विलीनीकरण या सर्व विषयांवर शरद पवारांनी रोखठोक भूमिका मांडली.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    मुंबई / नवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी आज पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी विविध मुद्द्यांवर सविस्तर प्रतिक्रिया दिली. बारामती विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसकडून उमेदवार जाहीर झाला आहे. त्यामुळे ही निवडणूक चुरशीची होणार आहे. महाविकास आघाडीमधील घटक पक्ष असलेल्या शरद पवारांचा पक्ष आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या बारामतीमधील बिनविरोध निवडीला पाठिंबा दिला होता. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निधन झाल्यामुळे या जागेवर त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांची बिनविरोध निवड व्हावी, अशी काही नेत्यांची इच्छा होती. मविआच्या घटकपक्षांचीदेखील ती भूमिका होती. पण काँग्रेसने या निवडणुकीत उमेदवाराची घोषणा केली. त्यामुळे मविआत याबाबत एकमत नसल्याचं स्पष्ट झालं. या घडामोडींवर ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली.

    “एक मोठा राजकीय पक्ष आहे. त्यांना निवडणूक लढण्याचा अधिकार आहे. त्याची फार चर्चा करण्याचं कारण नाही. बिनविरोध निवडून द्या ही मागणी करण्याचं देखील काही कारण नाही. लोकशाहीमध्ये तुम्हाला निवडणूक लढवायची असेल तर समोर कुणीतरी निवडणूक लढवेल हे मान्य करुनच उभं राहायचं असतं”, अशी प्रतिक्रिया शरद पवार यांनी दिली. यावेळी पत्रकारांनी शरद पवार यांना तुम्ही सुनेत्रा पवार यांचा प्रचार करणार का? असा प्रश्न विचारला. त्यावर त्यांनी “नाही आम्ही प्रचार करणार नाहीत. प्रचार काय करायचा?”, असं उत्तर दिलं.

    ‘मी कुटुंबप्रमुख, माझ्यावर कुटुंबप्रमुख म्हणून जबाबदारी’

    “राजकारणात जे पडतात ते लोकांचं काम करण्यासाठी, अजित पवार हे लोकांचे काम करण्यासाठी सक्रिय होते. अजित पवारांबद्दल नागरिकांमध्ये एक आदर आहे. हे मान्य केलं पाहिजे. दुर्दैवाने अपघाती दुर्घटनेत ते गेले. याचं दु:ख कटुंब म्हणून आम्हा सर्वांना आहे. पवार कुटुंबावर संकट आलेलं आहे. मी कुटुंबप्रमुख आहे. त्यामुळे कुटुंबप्रमुख म्हणून माझ्यावर जबाबदारी आहे”, अशी भूमिका शरद पवार यांनी मांडली.

    दरम्यान, सुनेत्रा पवार यांचा उमेदवारी अर्ज भरताना पार पडलेल्या सभास्थळी लावलेल्या बॅनरवर पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, राज्यातील भाजप नेते यांच्यासह शरद पवार यांचाही फोटो एका बॅनरवर बघायला मिळाला. याबाबत पत्रकारांनी शरद पवार यांना प्रश्न विचारला असता, “मोदी-शाहांचा फोटो होते, भाजप नेत्यांचे फोटो होता त्याच चुकीचं काय? त्यांच्या पक्षाचे प्रचार असतील. यात अडचण काय? ते एनडीएमध्ये आहेत ना? तिथल्या बॅनरमध्ये माझा फोटो असेल तर चुकीचं आहे”, असं उत्तर शरद पवारांनी दिलं.

    उद्धव ठाकरेंना विधान परिषदेत पाठवण्याच्या वक्तव्यावर भाष्य

    उद्धव ठाकरेंबाबत विचारलेल्या प्रश्नावरही शरद पवारांनी उत्तर दिलं. “काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी पक्षाच्या वतीने भूमिका मांडणं हा त्यांचा अधिकार आहे. उद्धव ठाकरेंनी मी राज्यसभेवर जायचं म्हटलं त्यावेळेला फोन करुन सांगितलं की आमचा पाठिंबा आहे. त्यामुळे मला असं वाटतं की, त्यांनी आपणहून मला पाठिंबा दिला, सहकार्य केलं त्यामुळे आपणही ते दाखवावं”, अशी भूमिका शरद पवारांनी मांडली. “एखाद्या राजकीय पक्षाने एक भूमिका घेतली तर तो काही राजकीय इशू नाही किंवा राज्याचा इशू नाही. प्रगती व्हावी म्हणून त्यांनी निर्णय घेतला”, अशीदेखील प्रतिक्रिया शरद पवारांनी दिली.

    राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर काय म्हणाले?

    “कसं आहे, आमच्यावतीने जयंत पाटील आणि तिकडून अजित पवार हे चर्चा करत होते. अजित पवार यांचा अपघाती मृत्यू झाल्यानंतर ही चर्चा थांबली. असा तो विषय आहे. आमच्या पक्षात याची चर्चा नाही. त्यांच्या पाच-सहा बैठका झाल्या”, असं शरद पवार यांनी स्पष्ट केलं. यावेळी दोन्ही पक्ष आगामी काळात एकत्र येणार का? असा प्रश्न पत्रकारांनी विचारला. त्यावर त्यांनी “आज तरी ते नाही सांगू शकत”, अशी प्रतिक्रिया शरद पवारांनी दिली. पण अजित पवार यांच्या निधननंतर विलीनीकरणाच्या विषयावर चर्चा झाली नाही, असं शरद पवारांनी स्पष्ट केलं.

    चेतन पाटील

    लेखकाबद्दलचेतन पाटीलचेतन पाटील महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजीटल कंटेट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन इथे सेकंड शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. महाराष्ट्र, देश, विदेश, राजकीय, क्रीडा, मनोरंजन अशा विविध बीटच्या बातम्या लिहिण्याचा त्यांना अनुभव आहे. एखादी मोठी बातमी कमी वेळात सर्वात आधी ब्रेक करण्याचं त्यांचं कसब आहे. ब्रेकिंग आणि महत्त्वाच्या बातम्या कमी वेळात लिहून ते अपलोड करण्यात ते पारंगत आहेत. पण कुठलीही बातमी ब्रेक करताना तिची सत्यता पडताळणी केल्याशिवाय ते ती बातमी पुढे जाऊ देत नाहीत. पत्रकार म्हणून त्या बातमीची शहानिशा करणं ही आपली प्राथमिक जबाबदारी असल्याचं चेतन पाटील मानतात.

    डिजीटल पत्रकारितेच्या या अवाढव्य मोठ्या विश्वावात पत्रकाराने एक माणूस म्हणून योग्य जबाबदारी पार पाडणं जास्त आवश्यक आहे. त्यामुळे केवळ क्लिकबेट हेडिंग करुन वाचकांची दिशाभूल न करता पत्रकारितेचं नैतिक मूल्य अंगीकारण्यावर त्यांचा भर असतो. त्यामुळे कोरोना संकट काळ असले, विधानसभा, लोकसभा किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा काळ असेल, एकनाथ शिंदे यांचं शिवसेनेतील बंड असेल, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचा न्यायालयीन खटला असेल, भारत-पाकिस्तान युद्धजन्य स्थिती असेल, भारत-चीन सीमेवरील गलवान खोऱ्यातील संघर्ष असेल, दिल्लीच्या सीमेवरील शेतकऱ्यांचं आंदोलन असेल, त्यानंतर शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आलेलं हिंसक वळण असेल, महाराष्ट्रात मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन असेल, मराठा आरक्षणाचे आंदोलन असेल, कष्टकरी आणि शेतकऱ्यांची विविध आंदोलने असतील, विविध सामाजिक आणि राजकीय घटना असतील, ते त्या घटनांचं वृत्तांकन करताना पत्रकारितेच्या नैतिक मुल्यांचं अतिशय काटेकोरपणे पालन करण्याचा प्रयत्न करतात.

    चेतन पाटील यांना पत्रकारितेत जवळपास 9 वर्षांचा अनुभव आहे. पत्रकारितेचं पदवी शिक्षण घेत अतानाच त्यांना भिवंडी महापालिका निवडणूक काळात एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम केल्याचा अनुभव आहे. त्यानंतर लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा नामांकीत वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. आपलं महानगरमध्ये काम करत असताना त्यांनी यूट्यूबवर आयपीएलच्या मोसमात महिनाभर विश्लेषणाचे व्हिडीओ बनवले होते. तसेच ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन इथेदेखील विविध राजकीय घडामोडींचे विश्लेषण करणारे व्हिडीओ बनवत असतात.

    चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट झाला आहे. त्यांच्या एका बातमीमुळे धुळे बस स्टॅण्डवर फिरणाऱ्या एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली होती. महाविकास आघाडी सरकारने सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डातील शाळांमध्ये मराठी भाषेचं शिक्षण सक्तीचं केलं होतं. पण कोरोना काळानंतर अचानक या निर्णयावर घुमजाव केल्याचं बघायला मिळालं होतं. त्यावेळी चेतन पाटील यांनी ‘आपुल्याच घरात हाल सोसते मराठी’ या मथळ्याखाली बातमी लाहिली होती. ही बातमी महाराष्ट्र एकीकरण समितीने रिट्विट करत मोठा मुद्दा उपस्थित केला होता. अखेर या मुद्द्यावरुन वातावरण तापल्यानंतर तत्कालीन शालेय शिक्षण मंत्र्यांना यावर स्पष्टीकरण द्यावं लागलं होतं. निर्णय मागे घेतला नसून काही वर्ष मराठी भाषेचे श्रेणीतून गुण दिले जातील, असं त्यांनी स्पष्ट केलं होतं. जीआर काढताना अधिकाऱ्यांकडून चूक झाल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं.

    चेतन पाटील यांनी लिहिलेल्या बातमीमुळे गडचिरोली येथील सीमाभागातील स्थानिक नागरिकांचा पाण्याचा प्रश्न सुटला होता. त्या भागातील स्थानिकांना पिण्याचं पाणी आणण्यासाठी खूप पायपीट करावी लागत होती. चेतन पाटील यांना स्थानिक पत्रकारांनी या घटनेची माहिती दिल्यानंतर त्यांनी खोलवर सविस्तर विषयाची माहिती गोळा करत बातमी केली होती. त्यांच्या या बातमीची दखल तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी घेतली होती. विशेष म्हणजे बातमी प्रकाशित केल्यानंतर अवघ्या 15 दिवसांनी त्या भागातील नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न सुटल्याची बातमी चेतन पाटील यांनी केली होती.

    चेतन पाटील यांनी कल्याणच्या नामांकीत बिर्ला महाविद्यालयातून BMM (Bachelor Of Mass Media in Journalism) म्हणजेच पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं आहे. त्याआधी त्यांचं दहावीपर्यंतचं शिक्षण हे कल्याणच्या रॉयल हायस्कूल इथे झालं आहे. शालेय जीवनात त्यांना मराठी, हिंदी आणि गणित विषयाची विशेष गोडी होती. त्यांना लहानपणापासून कविता वाचनाचा छंद होता. त्यांनी अकरावी आणि बारावीचं शिक्षण हे विज्ञान शाखेतून केलं. पण बारावीनंतर त्यांना पत्रकारितेची वाट खुणावू लागली. त्यामुळे त्यांनी कल्याणच्या बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं.

    महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना त्यांनी विविध उपक्रमांमध्ये भाग घेतला आहे. त्यांना नाट्य आणि चित्रपट क्षेत्राविषयी नेहमीच आकर्षण राहिलं आहे. त्यामुळे त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना जलरंग तापी नाट्य संस्थेसोबत अहिराणी आणि मराठी नाटकांमध्ये काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य स्पर्धेत सहभाग घेतला आहे. त्यांनी ‘नटसम्राट’ नाटकात केलेल्या बूट पॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका खूप गाजली होती. त्यावेळी त्यांच्या अभिनयाचं खूप कौतुक झालं होतं.

    चेतन पाटील यांना कविता लिहिण्याचा आणि त्या सादर करण्याचा देखील छंद आहे. तसेच ज्येष्ठ आणि दिग्गज कवींच्या गाजलेल्या कविता सादर करण्याची देखील त्यांना आवड आहे. चेतन पाटील यांनी लिहिलेल्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड ही ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात कवी कट्टा कार्यक्रमात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.… आणखी वाचा