• Sat. Jun 6th, 2026

    Nanded News: आध्यात्मिक क्षेत्रातील एक दीपस्तंभ हरपला, श्रीदत्त शिखर संस्थानचे महंत मधुसूदनजी भारती महाराज वैकुंठवासी

    Nanded News: आध्यात्मिक क्षेत्रातील एक दीपस्तंभ हरपला, श्रीदत्त शिखर संस्थानचे महंत मधुसूदनजी भारती महाराज वैकुंठवासी

    Mahant Madhusudan Bharti Maharaj: माहूर येथील श्री दत्त शिखर संस्थानचे महंत प. पू. मधुसूदनजी भारती महाराज यांचं निधन झालं असून वयाच्या ९५ वर्षी घेतला अखेरचा श्वास घेतला.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    अर्जुन राठोड, नांदेड: जिल्ह्यातील माहूर तालुक्यातील श्री दत्त शिखर संस्थानचे महंत प. पू. मधुसूदनजी भारती गुरु अच्युत भारती महाराज यांच शनिवारी सायंकाळी निधन झाल. वयाच्या ९५ वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने असंख्य भक्तगण शोकसागरात बुडाले आहे.

    महंत प. पू. अच्युत भारती महाराज हे वैकुंठवासी झाले नंतर प. पू. मधुसूदनजी भारती महाराज हे सन १९७८ साली संस्थानच्या धार्मिक प्रक्रियेनुसार गादीवर विराजमान झाले होते. अत्यंत साधेपणा, अध्यात्मिक चिंतन आणि भक्तीभावासाठी ओळखले जात होते. त्यांनी आपल्या कार्यकाळात श्री दत्त शिखर संस्थानच्या धार्मिक परंपरा जपण्याबरोबरच भक्तांच्या सेवेसाठी स्वतःला अर्पण केले होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक धार्मिक उपक्रम, पूजा-अर्चा, तसेच उत्सव मोठ्या श्रद्धा आणि शिस्तीत पार पडत होते.

    महाराजांच्या प्रवचनांमधून त्यांनी अध्यात्म, नैतिक मूल्ये आणि संस्कार यांचा संदेश भाविकांपर्यंत पोहोचवला. त्यांच्या साध्या जीवनशैलीमुळे आणि प्रेमळ स्वभावामुळे ते सर्वांच्या मनात विशेष स्थान निर्माण करू शकले होते. त्यांच्या निधनाची बातमी समजताच माहूर व परिसरातील भाविकांनी दत्त शिखराकडे धाव घेत अंतिम दर्शनासाठी मोठी गर्दी केली. अनेक संत, महंत, तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांनी श्रद्धांजली अर्पण केली.दरम्यान, त्यांच्या पार्थिवावर आज धार्मिक विधीनुसार अंत्यसंस्कार करण्यात येणार असून, संस्थानतर्फे पुढील कार्यक्रमांची माहिती लवकरच जाहीर केली जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे. प. पू. मधुसूदनजी भारती महाराज यांच्या जाण्याने अध्यात्मिक क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली असून, त्यांच्या स्मृती आणि कार्य भाविकांच्या मनात कायम राहणार आहेत.

    राजकीय मंडळीकडून महंत अच्युत भारती महाराजाणा श्वद्धांजली

    माहूर तालुक्यातील श्री दत्त शिखर संस्थानचे महंत प. पू. मधुसूदनजी भारती गुरु अच्युत भारती महाराज यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होतं आहे. राजकीय मंडळीकडून मधुसूधन महाराज यांना श्रद्धांजली वाहिण्यात आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस,महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, काँग्रेस खासदार रवींद्र चव्हाण यांच्या सह आजी माजी आमदार खासदार तसेच राजकीय नेते, मंत्र्यानी देखील दुःख व्यक्त केले.

    आध्यात्मिक क्षेत्रातील एक दीपस्तंभ हरपला- अशोक चव्हाण

    माहूर येथील श्री दत्त शिखर संस्थानचे महंत श्री मधुसूदनजी भारती महाराज यांना झाल्याची बातमी मन सुन्न करणारी आहे. त्यांच्या देवाज्ञेमुळे आध्यात्मिक क्षेत्रातील एक दीपस्तंभ हरपला आहे. गेल्याच आठवड्यात मी त्यांचे दर्शन घेऊन प्रकृतीची विचारपूस केली होती. महाराजांनी आपल्या जीवनकार्यात केवळ भक्तीचा मार्ग दाखवला नाही, तर सेवा व मानवतेचीही शिकवण दिली. माहूर गडावरील दत्त शिखर संस्थानची आध्यात्मिक परंपरा त्यांनी अत्यंत प्रभावी व शिस्तबद्ध पद्धतीने जपली. महाराजांच्या रूपात एक थोर विचारवंत आणि मार्गदर्शक हरपले आहे. त्यांचे कार्य आणि शिकवण भक्तांच्या माध्यमातून सदैव अजरामर अस माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण म्हणाले.

    सानिया कदम

    लेखकाबद्दलसानिया कदमसानिया कदम या सध्या ‘मटा ऑनलाईन’मध्ये गेल्या सहा महिन्यांपासून कन्सल्टंट पदावर कार्यरत आहेत. २०२५ मध्ये बॅचलर्सचे शिक्षण पूर्ण करून त्यांनी नुकताच पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रवेश केला आहे. लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, आंतरराष्ट्रीय घडामोडी तसेच इन्फ्रास्ट्रक्चर व नागरी विकासाशी संबंधित बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे.

    पत्रकारितेतील व्यावसायिक कामाची ही त्यांची पहिलीच वेळ असली, तरी त्यांच्या पत्रकारितेच्या प्रवासाची सुरुवात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटमधून झाली. २०२४ मध्ये मुलुंड वाणिज्य महाविद्यालयातून बीएमएमचे शिक्षण घेत असताना प्राध्यापकांकडून त्यांची कॉलेज क्लब रिपोर्टर म्हणून नियुक्ती झाली आणि तेव्हाच ‘मटा’शी त्यांचा पहिला संबंध जोडला गेला.

    यानंतर त्यांनी अनेक महिन्यांपर्यंत महाराष्ट्र टाइम्सच्या ‘मुंबई टाइम्स’ पुरवणीसाठी लेखन केले. कॉलेज विद्यार्थ्यांच्या दैनंदिन समस्या, सोशल मीडियावरील ट्रेंड्स तसेच एआयच्या वाढत्या प्रभावावर त्यांनी अनेक लेख लिहिले. सोशल मीडियावर गाजलेल्या ‘घिबली आर्ट’ ट्रेंडवर तसेच परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांच्या आयुष्यात वाढत्या एआयच्या वापराबाबत लिहिलेल्या लेखांचे विशेष कौतुक झाले. या काळात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटच्या विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होत त्यांनी वृत्तांकनासाठीही हातभार लावला. २०२५ मधील ‘माय मराठी कला संगम’ तसेच महाराष्ट्र टाइम्सच्या ‘शोध युवा प्रतिमेचा’ या विशेष कार्यक्रमांचे त्यांनी वृत्तांकन केले. विद्यार्थ्यांशी आणि नव्या पिढीशी जोडून घेणाऱ्या, त्यांच्या दृष्टिकोनातून बातम्या मांडण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न राहिला.

    २०२५ मध्ये बीएमएमचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी के.सी. महाविद्यालयातून एमए इन जर्नलिझमला प्रवेश घेतला आणि त्याचवेळी ‘मटा ऑनलाईन’मध्ये काम सुरू केले. येथे त्यांनी लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग अपडेट्स, इन्फ्रास्ट्रक्चर व विकासकामे, तसेच सरकारी धोरणे यांवर विशेष प्राविण्य मिळवले.

    लहानपणापासूनच मराठी आणि इंग्रजी भाषेत वाचन-लेखनाची आवड असल्याने इंग्रजी भाषेवर त्यांचे विशेष प्रभुत्व आहे. त्यामुळे इंग्रजीतील गुंतागुंतीच्या बातम्या मराठी वाचकांसाठी सोप्या, समजण्यासारख्या भाषेत मांडण्याचा त्यांचा सातत्यपूर्ण प्रयत्न असतो. डिग्रीपर्यंतचं शिक्षण इंग्रजी माध्यमातून केलं असून संपूर्ण महाविद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला. शेवटच्या वर्षी, न्यूजरूम नावाच्या प्रोजेक्टसाठी एका वृत्तपत्राच्या संपादकांची मुलाखत घेणं आवश्यक होतं. त्यावेळी, मुंबई चौफेरचे संपादक श्री. प्रफुल्ल फडके यांची मुलाखत घेतली. या मुलाखती दरम्यान त्यांनी आपल्या 30 वर्षांच्या मराठी भाषेतील पत्रकारीतेच्या अनुभवाबद्दल सांगितलं. त्यावेळी मराठी माध्यमातून पत्रकारिता करण्याची आवड निर्माण झाली. नंतर महाराष्ट्र टाईम्स प्रिंटमधल्या अनुभवामुळे ही आवड आणखी वाढली.… आणखी वाचा