• Wed. Jun 17th, 2026
    Nagpur News: सहा वर्षापूर्वी आईने जीव दिल्याचं पाहिलं, आजी-आजोबांकडे राहणाऱ्या 10 वर्षीय मुलीनेही संपवलं जीवन

    Nagpur Girl Ends Life: कन्हान पोलिस ठाण्याच्या हद्दीतील वेकोलि क्वॉर्टर येथे १० वर्षीय मुलीने जीवन संपवल्याची घटना घडली आहे. का घेतला टोकाचा निर्णय?

    अवघ्या दहा वर्षांच्या मुलीने संपविले जीवन(फोटो– महाराष्ट्र टाइम्स)
    म. टा. प्रतिनिधी, नागपूर: आईने सहा वर्षांपूर्वी आत्महत्या केली होती. वडील कामानिमित्त मुंबईला. आजी-आजोबाकडे राहणाऱ्या दहा वर्षीय मुलीने गळफास घेऊन स्वत:चे लाखमोलाचे जीवन संपवले. समाजमन सुन्न करणारी ही घटना कन्हान पोलिस ठाण्याच्या हद्दीतील वेकोलि क्वॉर्टर येथे घडली.

    प्रीती सत्यनारायण तिवारी असे मृत मुलीचे नाव आहे. ती नारायणा विद्यालयात पाचव्या वर्गात शिकत होती. पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार, कुटुंबाचा गाडा चालवण्यासाठी प्रीतीचे वडील मुंबईत नोकरीला आहेत. प्रीतीला मुंबईला नेणे शक्य नसल्याने तिला आजी-आजोबांसोबत ठेवण्यात आले. २४ वर्षीय चुलत बहीण तिचा सांभाळ करायची. प्रीती चार वर्षांची असताना तिच्या आईने गळफास घेऊन जीवन संपवलं होतं. ही घटना प्रीतीने पाहिली होती.

    Maharashtra TimesNagpur Crime : सोशल मीडियावर ओळख, फूस लावून शाळेतून पळवलं, पालकांना लेक गैरहजर असल्याचा मेसेज; अल्पवयीन मुलीवर अत्याचार
    हट्टी स्वभावाची असलेली प्रीती कधीकधी स्वतःला खोलीत बंद करून ठेवायची. ती टीव्हीवर सतत ‘क्राइम पेट्रोल’ ही मालिकाही पाहत होती. मंगळवारी दुपारी ४ वाजताच्या सुमारास प्रीतीने खोलीत स्वतःला बंद करून घेतले. ती स्टूलवर उभी झाली. लाकडी बल्लीला ओढणी बांधून तिने गळफास घेतला.
    Maharashtra TimesNagpur Crime : बॉयफ्रेंडसोबत व्हिडिओ कॉलवर बोलताना स्वत:ला संपवलं, पदवीदान कार्यक्रमाच्या दिवशीच तरुणीने आयुष्याची दोर कापली
    दरम्यान, तिच्या काकाने खिडकीतून पाहिले असता प्रीती गळफास लावलेली दिसली. खिडकीतूनच काका खोलीत गेले. फास काढून प्रीतीला रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी तपासून तिला मृत घोषित केले. याप्रकरणी कन्हान पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. ठाणेदार वैजयंती मंडवधरे यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. दहा वर्षीय प्रीतीच्या मृत्यूने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

    Maharashtra Timesगॅस सिलिंडरसाठी वणवण जीवावर बेतली! रेल्वे उड्डाणपुलाची लोखंडी प्लेट अंगावर कोसळल्याने तरुणाचा मृत्यू, मित्र जखमी
    तर दुसऱ्या एका घटनेत, तुमसर तालुक्यातील रोंघा येथे ३१ मार्चपासून बेपत्ता असलेल्या दोन बालकांचे मृतदेह बुधवारी सकाळी गावाजवळील एका पाण्याच्या डबक्यात आढळून आले. चंद्रपाल रुपचंद कुंभरे (वय ७) आणि सार्थक संजय उईके (वय ६) अशी त्यांची नावे आहेत. ही मुले घरी न परतल्याने कुटुंबीयांनी त्यांचा सर्वत्र शोध घेतला, मात्र त्यांचा कोणताही सुगावा लागला नव्हता. रात्रभर शोध घेऊनही मुले न मिळाल्याने गावात चिंतेचे वातावरण होते. यातच गावाजवळील एका पाण्याच्या डबक्यात दोन्ही बालकांचे मृतदेह तरंगताना आढळले.

    किशोरी तेलकर

    लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर

    किशोरी तेलकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. किशोरी या २०२२पासून मटा ऑनलाइन सोबत जोडलेल्या आहेत. राजकारण, हायपर लोकल स्टोरी, क्राईम बातम्या, महिलांविषयक समस्या, गाव खेड्यातल्या बातम्या करण्याचा त्यांचा अनुभव आहे.

    पत्रकारितेतील अनुभव
    किशोरी यांना वृत्तपत्र, टीव्ही आणि डिजिटल माध्यमांमधील ६ वर्षांचा अनुभव आहे. किशोरी यांनी सकाळ वृत्तपत्रातून पत्रकारितेला सुरुवात केली. सकाळ वृत्तपत्रात काम करतांना त्यांनी प्रिंट मीडियासोबतच सोशल मीडिया हॅंडलिंग, वेबसाईटचेही काम केलं आहे. सध्या चार वर्षांपासून त्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. लेखन कौशल्याच्या जोरावर सामाजिक समस्या, शाळा- कॉलेज विद्यार्थी समस्या, आरोग्य टिप्स, महिलांविषयक प्रश्न, फॅशन, लाइफस्टाइल या विविध विषयांवर त्यांनी बातम्या केल्या आहेत.

    शैक्षणिक पात्रता
    किशोरी तेलकर यांनी कै. बिंदू रामराव देशमुख कला व वाणिज्य महिला महाविद्यालय, नाशिकरोड येथून एम.कॉम पदवी संपादन केली. त्यानंतर गोखले एज्युकेशन सोसायटीचे एच.पी.टी आर्ट्स अँड आर.वाय.के सायन्स कॉलेजमधून कम्युनिकेशन अँड जर्नलिझम विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. जर्नलिझमचे शिक्षण घेत असतानाच किशोरी यांनी देशदूत, दिव्यमराठी सारख्या वृत्तपत्रात इंटर्नशिप केलेली आहे. मराठी भाषेवर प्रभुत्व असून हिंदी, इंग्रजी भाषाही त्यांना अवगत आहेत.… आणखी वाचा