अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी मांडण्यात आलेल्या अंतिम आठवडा प्रस्तावावर विरोधकांनी अधिवेशनातील कामकाजावर ताशेरे ओढले. मागील महिन्याभरात कधी मंत्री तर कधी अधिकारी अनुपस्थित होते. अशा पद्धतीने सभागृह चालते. हे मी आतापर्यंत कधीच पाहिलेलं नाही, अशा शब्दात राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी सभागृहातील कामकाजाविषयी नाराजी व्यक्त केली.