Pune Student Electric Shock Death: पुण्यातील कृषी महाविद्यालयात २३ वर्षीय विद्यार्थी चैतन्य चव्हाण याचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.
चैतन्य कुंडलिक चव्हाण (वय २३, रा. डोंगरगाव, आष्टी, बीड) असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे. तो कृषी महाविद्यालयात ॲग्रिकल्चर बिझनेस मॅनेजमेंट अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षात शिक्षण घेत होता.
Pune Traffic Update: पुणेकरांसाठी महत्त्वाचे! राम नवमीनिमित्ताने आज वाहतुकीत मोठे बदल, दुपारी 4 ते 10 वाजेपर्यंत काही रस्ते बंद
चैतन्य १४ मार्चला मेसमधील कामकाज पाहत होता. जलशुद्धीकरण यंत्र व्यवस्थित सुरू आहे का, याची तपासणी करताना अचानक यंत्रात विद्युत प्रवाह उतरला. विजेचा धक्का बसल्याने तो जागीच बेशुद्ध पडला. खासगी रुग्णालयात उपचारांदरम्यान मंगळवारी त्याचा मृत्यू झाला. या घटनेनंतर महाविद्यालय प्रशासनाविरोधात विद्यार्थ्यांनी संताप व्यक्त केला.
सुरक्षा उपाययोजनांचा अभाव
मेसमधील उपकरणांची योग्य देखभाल न करणे, सुरक्षा उपाययोजनांचा अभाव आणि निष्काळजीपणा यामुळेच ही दुर्घटना घडल्याचा आरोप करण्यात येत आहे. संपूर्ण परिसरातील विद्युत सुरक्षेचे लेखापरीक्षण (सेफ्टी ऑडिट) तातडीने करावे, तसेच जबाबदारांवर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे. या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली असली तरी अद्याप गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही.
Pune News : पुण्यात तरुणाने तरुणीला प्रेमाच्या नावाने फसवलं; प्रेम, लग्नाचं आमिष अन् नोकरी लागताच पलटला
ही अतिशय दुखःद घटना आहे. चैतन्य चव्हाण याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. तो बरा व्हावा याकरिता महाविद्यालय, विद्यार्थी अशा सर्वांनी प्रयत्न केले. मात्र, दुर्दैवाने त्यात यश आले नाही. या घटनेनंतर विद्यार्थ्यांनी माझ्याशी चर्चा केली. या घटनेबाबत अधिष्ठात्यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली असून, ती पाहणी करून सोयीसुविधा अद्ययावत करण्याबाबत अहवाल देईल. – डॉ. विलास खर्चे, कुलगुरू, महात्मा फुले कृषी विद्यापीठ
