• Sun. Jun 14th, 2026

    मुंबईकरांचा जीव कासावीस, काही ठिकाणी पारा 39 अंशावर; हवामान विभागाचा ठाणे, रायगडसाठी अलर्ट

    मुंबईकरांचा जीव कासावीस, काही ठिकाणी पारा 39 अंशावर; हवामान विभागाचा ठाणे, रायगडसाठी अलर्ट

    Mumbai Heatwave 24 March: मुंबईत सोमवारी तापमानात 3-4 अंशांनी वाढ नोंदवण्यात आली. गेल्या आठवड्यात पावासामुळे उतरलेले तापमान आता परत चढले आहे. हवामान विभागाने शहरात उष्णता वाढेल असा अंदाज वर्तवला आहे.

    म.टा. प्रतिनिधी, मुंबई: मुंबई, ठाणे आणि रायगड जिल्ह्यांमध्ये सोमवारी तुरळक ठिकाणी उष्णतेची लहर जाणवली. मुंबईमध्ये वातावरणातील उष्म्याने मुंबईकर कासावीस झाले होते. मात्र मुंबईत तुरळक ठिकाणी हा पारा ३९ अंशांपर्यंतही पोहोचला होता. मंगळवारीही मुंबईत तसेच ठाणे आणि रायगड जिल्ह्यात तुरळक ठिकाणी उष्ण आणि दमट वातावरणाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

    सोमवारी तापमानात 3 अंशांनी वाढ

    मुंबईत सांताक्रूझ येथे सोमवारी ३६.५ तर कुलाबा येथे ३४.९ अंश सेल्सिअस कमाल तापमान नोंदले गेले. रविवारीही सांताक्रूझ येथे ३६.४ तर कुलाबा येथे ३४.२ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली होती. सातत्याने दुसऱ्या दिवशी मुंबईमध्ये ३६ अंशांहून अधिक कमाल तापमानाची नोंद झाली. सांताक्रूझ येथील सोमवारचे कमाल तापमान सरासरीपेक्षा ३.७ अंशांनी तर कुलाबा येथील कमाल तापमान सरासरीपेक्षा ३.३ अंशांनी अधिक होते.Maharashtra TimesPrabhadevi Bridge: प्रभादेवीमध्ये उभारणार ‘डबल डेकर पूल’, 100 वर्ष जुन्या रेल्वे पुलाचं पाडकाम निम्म्यावर; शिवडी-वरळी कनेक्टर’ला वेग

    राममंदिर, विक्रोळी आणि विद्याविहार येथील केंद्रांवरील तापमान सोमवारी सांताक्रूझपेक्षाही अधिक होते. राम मंदिर येथे ३९ अंश सेल्सिअस कमाल तापमान नोंदले गेले तर विक्रोळी येथे ३७.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. विद्याविहार येथे ३६.८, दहिसर येथे ३५.४, चेंबूर येथे ३५.६ अंश सेल्सिअस कमाल तापमान होते. दिवसभरात कुलाबा येथे ५७ टक्के तर सांताक्रूझ येथे ४३ टक्के आर्द्रता नोंदली गेली. मंगळवारीही मुंबईसह ठाणे, रायगड येथे उष्ण वातावरण जाणवू शकते. उर्वरित महाराष्ट्रात मराठवाड्यात तुरळक ठिकाणी तसेच मध्य महाराष्ट्रात सोलापूरात मंगळवारी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे.

    Maharashtra TimesUttan-Virar Sea Linkमुळे मरिन ड्राइव्ह ते विरार जोडणी, अटल सेतूपेक्षा लांब सागरी मार्ग; 30 मिनिटांत होणार अंतर पार

    तापमान वाढीचं कारण काय?

    दरम्यान, हवामान विभागाने सोमवार आणि मंगळवारी उष्ण आणि दमट वातावरणाचा यलो अलर्ट जारी केला आहे. हवामान तज्ज्ञ अथ्रेया शेट्टीच्या मते उष्णतेची लाट जास्त काळ राहण्याची शक्यता कमी आहे. अरबी समुद्रातून येणाऱ्या पश्चिमी वाऱ्यांमुळे वातावरणात थोडा गारवा जाणवत होता. समुद्रात निर्माण झालेल्या वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे ही स्थिती निर्माण झाली. पण 20 मार्च रोजी हे वारे पुढे सरकल्याने तापमानात परत वाढ व्हायला सुरुवात झाली.

    सानिया कदम

    लेखकाबद्दलसानिया कदमसानिया कदम, मटा ऑनलाईनमध्ये कन्सल्टंट पदावर कार्यरत आहे. प्रामुख्याने क्राइम, सिव्हिक आणि पॉलिटिक्स या बातम्या कव्हर करते. याआधी सहा महिने महाराष्ट्र टाइम्स प्रिंटमध्ये कॉलेज क्लब रिपोर्टर म्हणून काम केले आहे. त्या काळात कॉलेज इव्हेंट्स, शैक्षणिक उपक्रम आणि सोशल मीडियावरील ट्रेंड्सवर बातम्या केल्या. मुलुंड वाणिज्य महाविद्यालयातून BMM मध्ये पदवी घेतल्यानंतर सध्या के.सी. महाविद्यालयात MA in Communication and Journalism करत आहे. इंटरनॅशनल घडामोडी आणि पॉप कल्चर हे विषय विशेष आवडीचे असून इंग्लिश आणि मराठी या दोन्ही भाषेत वाचन व लेखन करण्याची आवड आहे.… आणखी वाचा