Satara News : सातारा जिल्हा पोलिस अधीक्षकांच्या निलंबनाची कारवाई मागे घेण्यासाठी पडद्यामागून हालचाली सुरू असल्याचे समजते. आधी चौकशी व्हावी आणि मग कारवाई व्हावी अशी मागणी भाजपच्या नेत्यांकडून होत आहे.
शेवटपर्यंत भाजपला थांगपत्ता नाही
विधान परिषदेत सातारा पोलिस अधीक्षक तुषार दोशी यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्याचे निर्देश उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्याकडून देण्यात आले. त्यावर सभागृहात उपस्थित असलेले वनमंत्री गणेश नाईक तसेच उद्योगमंत्री उदय सामंत यांनी सरकारकडून या कारवाईला मान्यताही दिली. मात्र, हे सर्व अशा घाईघाईत झाले की याचा शेवटपर्यंत भाजपला थांगपत्ता लागला नाही.
Nagpur Crime : 24 वर्षीय मुलाच्या मित्राशी 48 वर्षीय आईचे अनैतिक संबंध, घरातून पळाले, नागपुरातील गावात चर्चा, दृष्टीहीन पतीचा टोकाचा निर्णय
शिवसेना-राष्ट्रवादीचे आमदार सभागृहात आक्रमक
सातारा जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीवरून भाजप आणि शिवसेना-राष्ट्रवादी या तिन्ही पक्षात मतमतांतरे होती. अशावेळी बहुमत नसतानाही भाजपने अध्यक्षपदाच्या निवडणुकीत बाजी मारली. मात्र, या निवडणुकीदरम्यान पोलिसांसोबत झालेल्या झटापटीत मंत्री शंभुराज देसाई यांना दुखापत झाली. त्याचसोबत मंत्री मकरंद पाटील यांच्यासोबतही पोलिसांची झटापट झाली. यावरून विधान परिषदेत शिवसेना आणि राष्ट्रवादीचे आमदार सभागृहात आक्रमक झाले.
Shiv Sena Vs BJP | साताऱ्यातला संघर्षामुळे भाजप शिवसेनेत वादाची ठिणगी, विरोधकांनीही संधी साधली
भाजपला आश्चर्याचा धक्का
उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी सातारा जिल्हा पोलीस प्रमुखांच्या निलंबनाचे निर्देश दिले. सभागृहात उदय सामंत आणि गणेश नाईक हे दोन्ही मंत्री उपस्थित असल्याने त्यांना सरकार म्हणून या कारवाईचे समर्थनही केले. मात्र या निलंबनाबाबतची माहिती भाजपला उशिरा कळाल्याचे समजते. साताऱ्यामध्ये जिल्हाध्यक्ष भाजपचा बसल्याने पोलिसांच्या कारवाईला पक्षाकडून अप्रत्यक्षरित्या समर्थन असल्याचे समजते. अशा परिस्थितीत पोलिसांवरच अशाप्रकारची कारवाई झाल्याने भाजपलाही आश्चर्याचा धक्का बसला आहे.
Mumbai News : मालिकेच्या शूटवरुन येताना अपघात, अभिनेत्याच्या मृत्यूप्रकरणी मुंबईत पाच डॉक्टरांवर गुन्हा, पायावरील शस्त्रक्रिया भोवली
शिवसेना-भाजप दुफळी
ही कारवाई आता मागे घेण्यासाठी पडद्यामागून हालचाली सुरू असल्याचे समजते. शिवसेनेच्या मंत्र्यांनाच पोलिसांकडून धक्काबुक्की झाल्यामुळे पोलिस अधीक्षकांवर कारवाई व्हायलाच हवी अशी त्यांची मागणी आहे, तर या प्रकरणात आधी चौकशी व्हावी आणि मग कारवाई व्हावी अशी मागणी भाजपच्या नेत्यांकडून होत आहे.
