अवकाळी पाऊस व गारपिटीने जालन्यातील शेतकरी हवालदिल झाले आहेत. हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरवल्याने शेतकऱ्यांना अश्रू अनावर झाले आहेत.जालना जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये रब्बी पिकांचे अतोनात नुकसान झालेय. सरकारने सरसकट कर्जमाफी व आर्थिक मदत करावी अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. हेक्टरी ५० हजार रुपये आर्थिक मदत तत्काळ देण्याची मागणी काहींनी केली.