• Fri. Mar 20th, 2026

    Mahant Adinath Shastri Maharaj : महंत आदिनाथ शास्त्री महाराजांनी स्वतःलाच केले गंभीर जखमी, अहिल्यानगरच्या खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल

    Mahant Adinath Shastri Maharaj : महंत आदिनाथ शास्त्री महाराजांनी स्वतःलाच केले गंभीर जखमी, अहिल्यानगरच्या खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल

    तारकेश्वर गडाचे महंत आदिनाथ शास्त्री महाराज यांनी स्वतःलाच गंभीर जखमी केल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेत ते गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यांच्यावर सध्या उपचार सुरु आहेत.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    अनिकेत यादव, अहिल्यानगर : अहिल्यानगर जिल्ह्यातील तारकेश्वर गडाचे महंत आदिनाथ शास्त्री महाराज यांनी स्वतःवरच वार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. या प्रकारात महाराज गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर सध्या अहिल्यानगरमधील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. महाराष्ट्रात संत, महंत आणि धार्मिक गुरूंना मोठे मानाचे स्थान आहे. प्रवचन, कीर्तन आणि धार्मिक संदेशांद्वारे समाज प्रबोधनाचे कार्य करणाऱ्या महंतांचा मोठा भक्तवर्ग असतो. अशा परिस्थितीत तारकेश्वर गडाचे महंत आदिनाथ शास्त्री महाराज यांनी स्वतःवरच वार केल्याची माहिती समोर आल्याने अनेकांना धक्का बसला आहे.

    महाराजांच्या अंगावर वार झाल्याचे दिसून आल्यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, महाराजांच्या अंगावर वार झाल्याचे दिसून आल्यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे. मात्र त्यांनी स्वतःवरच वार का केले? यामागचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही.

    या घटनेमुळे त्यांच्या भक्तांमध्ये प्रचंड संभ्रम आणि चिंता निर्माण झाली आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पाथर्डीच्या आमदार मोनिका राजळे तसेच भाजपचे युवा नेते अक्षय कर्डिले यांनी रुग्णालयात धाव घेत महाराजांची विचारपूस केली. तज्ज्ञ डॉक्टरांच्या पथकाकडून त्यांच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती समोर येत आहे.

    सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या फोटो आणि व्हिडिओंमुळे ही घटना चर्चेचा विषय ठरली आहे. पाथर्डी आणि बीड जिल्ह्यात महंत आदिनाथ शास्त्री महाराज यांचा मोठा भक्तपरिवार आहे. त्यामुळे या घटनेमुळे त्यांच्या अनुयायांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.

    दरम्यान, महाराजांनी स्वतःवर वार का केले? त्यामागे कोणताही वाद किंवा तणाव होता का? याबाबत विविध चर्चा सुरू असून याचा उलगडा पोलीस तपासानंतरच होणार आहे. सध्या या घटनेबाबत पोलिसात तक्रार दाखल झाली आहे की नाही? याबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नाही. मात्र सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या फोटो आणि व्हिडिओंमुळे ही घटना चर्चेचा विषय ठरली आहे. महाराजांची प्रकृती नेमकी कशी आहे आणि या घटनेमागचे कारण काय आहे? याकडे आता संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

    महाराजांना रुग्णालयात दाखल केल्याची माहिती समोर येताच राहुरी मतदारसंघाचे दिवंगत आमदार शिवाजीराव कर्डिले यांचे चिरंजीव तथा भाजपचे युवा नेते अक्षय कर्डिले यांनी तात्काळ रुग्णालयात धाव घेतली. त्यांनी डॉक्टरांकडून महाराजांच्या प्रकृतीची सविस्तर माहिती घेत त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. तसेच महाराजांवर उत्तम उपचार व्हावेत यासाठी आवश्यक ती काळजी घेण्याच्या सूचना त्यांनी रुग्णालय प्रशासनाला दिली आहे. या घटनेमुळे भक्तांमध्ये मोठी चिंता पसरली असून महाराज लवकरात लवकर बरे व्हावेत यासाठी त्यांच्या अनुयायांकडून प्रार्थना केली जात आहे.

    चेतन पाटील

    लेखकाबद्दलचेतन पाटील“चेतन पाटील हे पत्रकार आहेत. त्यांना राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, मनोरंजन आणि क्रीडा अशा विविध बीटच्या बातम्या केल्याचा अनुभव आहे. चेतन पाटील यांनी दैनिक लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा विविध वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. चेतन हे जवळपास 8 वर्षांपेक्षा अधिकचा काळ माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी कल्याणच्या नामांकित बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी शिक्षण घेतलं आहे. त्यांना पदवीचं शिक्षण घेत असताना एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम करण्याचा अनुभव आहे. सध्या ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन येथे कार्यरत आहेत.

    चेतन पाटील यांनी केलेल्या बातमीमुळे एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली. याशिवाय चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट पडलेला बघायला मिळाला आहे.

    चेतन पाटील महाविद्यालयात शिक्षण घेत असताना त्यांच्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या कवीकट्टा सदरात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांनी नाटकातही काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य हौशी स्पर्धेत भाग घेतलाय. त्यांनी ‘जलरंग तापी’ नाट्य संस्थेसोबत काम करत असताना ‘नटसम्राट’ नाटकात बूटपॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका साकारली होती. त्यांची ही भूमिका प्रचंड भाव खाऊन गेली होती. त्यांच्या अभिनयाने प्रभावित होऊन एका प्रेक्षकाने त्यांना खांद्यावर उचलून घेत नृत्य केलं होतं.

    खूप छोट्या गोष्टींमधून आनंद शोधावा, असं त्यांचं मत आहे. त्यांना पत्रकारितेसह वाचन, लेखनाची आवड आहे. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं वैयक्तिक आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.”… आणखी वाचा