टी-२० वर्ल्डकपच्या सामन्यात भारतीय क्रिकेट संघाने ऐतिहासिक विजय मिळवला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टीम इंडियाच्या उत्कृष्ट कामगिरीचे कौतुक केले. यावेळी बोलताना मुख्यमंत्र्यांनी इराण-इस्रायल युद्धाबाबतही महत्त्वाचे विधान केले. या युद्धामुळे तेल, गॅसचा तुटवडा निर्माण होण्याची भीती भारतीय नागरिकांमध्ये आहे. अफवांवर विश्वास ठेवून साठे केल्यास परिस्थिती खराब होऊ शकते असे त्यांनी सांगितले.