एका २१ वर्षीय विवाहितेची अवघ्या एका महिन्यात तीन ठिकाणी विक्री करून तिचे जबरदस्तीने लग्न लावून दिल्याचा संतापजनक प्रकार बीडमधून उघडकीस आला आहे. या अमानुष छळाला कंटाळून पीडितेने टोकाचे पाऊल उचलले असून…
एका महिन्यात तीनदा विक्री
पीडितेच्या असहायतेचा फायदा घेत आरोपींनी तिला एखाद्या वस्तूंप्रमाणे विकायला सुरुवात केली, पहिली विक्री पुण्यातील अमर कालभोर नावाच्या व्यक्तीकडून ५ लाख रुपये घेऊन तिचे पहिले बळजबरीने लग्न लावून दिले. दुसरी विक्री, पहिल्या लग्नाला १० दिवसही पूर्ण झाले नसताना, तिला तिथून काढून दुसऱ्या एका व्यक्तीला ४.५ लाख रुपयांत विकले गेले. त्यानंतर तिसरी विक्री ४ मार्च २०२६ रोजी तुळजापूरच्या एका महिलेच्या मदतीने बीडमधील आष्टी तालुक्यातील कानडी बुद्रुक येथील एका व्यक्तीशी तिचे तिसरे लग्न लावून देण्यात आले. या व्यवहारातूनही आरोपींनी ४.५ लाख रुपये उकळले.
चौथ्या लग्नाचा दबाव आणि आत्महत्येचा प्रयत्न
इतके अत्याचार होऊनही आरोपींची पैशांची हाव संपली नव्हती. ६ मार्च रोजी आरोपींनी पीडितेला पुन्हा फोन केला आणि चौथ्या लग्नासाठी तयार राहा पजजलअशी धमकी देत दबाव टाकला. या सततच्या मानसिक आणि शारीरिक छळाला कंटाळून, तसेच भविष्यातील अंधकारमय आयुष्याच्या भीतीने पीडितेने विषारी औषध प्राशन करून आपले जीवन संपवण्याचा प्रयत्न केला. सध्या तिच्यावर मिरजगाव येथील रुग्णालयात उपचार सुरू असून तिची प्रकृती अत्यंत चिंताजनक आहे.
Pune News : सिंहगडावर पर्यटकांवर मधमाशांचा हल्ला; लहान मुलांसह अनेकजण जखमी, काही रुग्णालयात दाखल
पोलिस कारवाई आणि गुन्हा दाखल
या धक्कादायक प्रकरणाची दखल घेत आष्टी पोलिसांनी महानंदा, तिचा पती आणि तुळजापूर येथील दोन मध्यस्थ अशा एकूण चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. भारतीय न्याय संहितेच्या कलम ३१८ आणि ६१ (मानवी तस्करी व फसवणूक) अंतर्गत हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. हा प्रकार केवळ एका तरुणीपुरता मर्यादित नसून, यात एक मोठे आंतरजिल्हा रॅकेट सक्रिय असल्याची शक्यता आहे. पोलीस निरीक्षक शरद भुतेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू असून, या रॅकेटचे धागेदोरे शोधण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.
अशा घटनांमुळे समाजात महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. या नराधमांना कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी संपूर्ण जिल्ह्यातून होत आहे.
