• Sat. Mar 7th, 2026

    Mumbai-Goa Highway: उर्वरित मुंबई-गोवा महामार्ग लवकरच पूर्ण, बाह्यवळण मार्ग, दोन पूल, रेल्वे उड्डाणपूल… कधी होणार काम?

    Mumbai-Goa Highway: उर्वरित मुंबई-गोवा महामार्ग लवकरच पूर्ण, बाह्यवळण मार्ग, दोन पूल, रेल्वे उड्डाणपूल… कधी होणार काम?

    Mangaon-Indapur Bypass: मुंबई-गोवा महामार्गाचं काम अनेक वर्षांपासून रखडलं आहे. उर्वरित मार्गाचं काम लवकरच पूर्ण होणार आहे अशी माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी सांगितल.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    मुंबई: ‘मुंबई-गोवा महामार्गावरील प्रलंबित कामांना गती देण्यात आली असून माणगाव व इंदापूर बायपासची कामे युद्धपातळीवर सुरू आहेत. माणगाव व इंदापूर बायपास वगळता उर्वरित मुंबई–गोवा महामार्ग (एनएच-६६) मेपर्यंत पूर्णत्वाला जाईल’, अशी माहिती सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी विधान परिषदेत शनिवारी दिली. नेहमीप्रमाणे अधिवेशनात मुंबई-गोवा महामार्गाच्या पूर्णत्वाचा मुद्दा चर्चेला आला होता. त्यावर भोसले यांनी, पुढील गणेशोत्सवाआधी संपूर्ण महामार्ग प्रवाशांसाठी उपलब्ध होईल, असे आश्वासनही दिले.

    जुलै २०२७मध्ये काम पूर्ण होणार?

    आमदार निरंजन डावखरे यांनी मुंबई-गोवा महामार्गाच्या अपूर्णावस्थतेबाबत प्रश्न उपस्थित केला होता. ‘जगात सर्वांत दीर्घकाळ या महामार्गाचे बांधकाम सुरू असून त्यामागून अटल सेतू, समृद्धी महामार्ग असे प्रकल्प पूर्ण झाले. परंतु हा मार्ग पूर्ण होताना दिसत नाही’, अशी टीका आमदारांनी सरकारवर केली. यावर भोसले यांनी उत्तर दिले. ‘माणगाव बायपासवरील रेल्वे उड्डाणपुलाचे काम नव्या एजन्सीकडून सुरू असून ते प्रगतीपथावर आहे.Maharashtra TimesGhansoli to Airoli Flyover: नवी मुंबईतील वाहतूक कोंडीसाठी खाडीवर पूल, घणसोली ते ऐरोली उन्नत मार्गाला गती; कसा असेल मार्ग?

    माणगाव व इंदापूर बाह्यवळण मार्गासह तीन रेल्वे उड्डाणपूल आणि दोन मोठे पूल या कामांचा या प्रकल्पात समावेश आहे. ही कामे जुलै २०२५ मध्ये सुरू करण्यात आली असून जुलै २०२७ पर्यंत पूर्ण करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. संबंधित ठेकेदार काम करत नसल्याने त्याच्याकडून ते काम काढून घेऊन नव्या एजन्सीला देण्यात आले आहे’, असेही भोसले यांनी सांगितले.

    ‘कोकणातील गणेशोत्सव काळातील वाहतूककोंडी लक्षात घेता माणगाव-महाड मार्गावरील ताम्हिणी घाटाचा बाह्यवळण मार्ग पावसाळ्यापूर्वी, म्हणजे मेपर्यंत पूर्ण करण्याचा सार्वजनिक बांधकाम विभागाचा मानस आहे. त्यामुळे माणगाव शहरातील वाहतूककोंडी कमी होण्यास मदत होईल’, असेही ते म्हणाले.

    Maharashtra TimesDahisar-Mira-Bhayander Metro: मेट्रो लाइन 9ची चाचणी फेरी यशस्वी, किरकोळ बदलांनंतर पहिला टप्पा होणार सुरू; दहिसर ते काशीगाव थेट जोडणी

    बंदी नंतरही वाहतूक सुरुच

    दरम्यान, रायगड जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतरही अवजड वाहतूक सुरू असल्याने अलिबाग-रोहा मार्गावरील वाहतूककोंडीचे दुष्टचक्र सुरूच आहे. जोडून आलेल्या सुट्ट्या आणि सणांमुळे गावी जाणारे नोकरदार आणि पर्यटकांसह स्थानिकांना वाहतूक कोंडीचा प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. जिल्हा वाहतूक यंत्रणादेखील या कोंडीपुढे हतबल झाले असल्याचे चित्र अलिबाग-रोहा मार्गावर दिसून येते. अलिबाग-रोहा मार्गावर कुरूळ ते सुडकोली, कुरूळ-आक्षी मार्गे रेवदंडा तसेच, रेवदंडा बायपास रोड या ठिकाणी रस्ते, क्रॉस ड्रेन आणि गटारांची कामे सुरू आहेत. शनिवारी सहाण ते बेलकडे दरम्यान ठिकठिकाणी वाहतूककोंडी झाली होती. रायगडच्या जिल्हाधिकाऱ्यांनी अवजड वाहनांसाठी बंदी आदेश काढला. मात्र वाहनांनी आदेश झुगारून वाहतूक सुरूच ठेवली.

    सानिया कदम

    लेखकाबद्दलसानिया कदमसानिया कदम, मटा ऑनलाईनमध्ये कन्सल्टंट पदावर कार्यरत आहे. प्रामुख्याने क्राइम, सिव्हिक आणि पॉलिटिक्स या बातम्या कव्हर करते. याआधी सहा महिने महाराष्ट्र टाइम्स प्रिंटमध्ये कॉलेज क्लब रिपोर्टर म्हणून काम केले आहे. त्या काळात कॉलेज इव्हेंट्स, शैक्षणिक उपक्रम आणि सोशल मीडियावरील ट्रेंड्सवर बातम्या केल्या. मुलुंड वाणिज्य महाविद्यालयातून BMM मध्ये पदवी घेतल्यानंतर सध्या के.सी. महाविद्यालयात MA in Communication and Journalism करत आहे. इंटरनॅशनल घडामोडी आणि पॉप कल्चर हे विषय विशेष आवडीचे असून इंग्लिश आणि मराठी या दोन्ही भाषेत वाचन व लेखन करण्याची आवड आहे.… आणखी वाचा