• Fri. Mar 6th, 2026

    Konkan Bridge: खाडीवर उभा राहतोय विकासाचा सेतू, मुंबई-अलिबाग प्रवासात वेळ वाचणार; 3000 कोटींचा रेवस-करंजा पूल कुठून-कसा?

    Konkan Bridge: खाडीवर उभा राहतोय विकासाचा सेतू, मुंबई-अलिबाग प्रवासात वेळ वाचणार; 3000 कोटींचा रेवस-करंजा पूल कुठून-कसा?

    Karanja-Revas Creek Bridge: कोकणात तयार होणाऱ्या रेवस-करंजा खाडी पुलामुळे मुंबई ते अलिबाग प्रवासात वेळ वाचणार आहे. हा 10 किमी लांब मार्ग 2028पर्यंत प्रवासासाठी खुला होण्याची शक्यता आहे.

    रायगड: कोकणच्या विकासाला नवे पंख देणारा रेवस-करंजा खाडी पूल आणि सागरी महामार्गावरील सात प्रमुख पूल प्रकल्प वेगाने पुढे सरकत आहेत. धर्मतर खाडीवर सुमारे 2.04 किमी लांबीचा मुख्य पूल आणि एकूण 10.65 किमीचा मार्ग असलेला हा महाप्रकल्प 3000 कोटी रुपयांहून अधिक खर्चाचा असून मार्च 2028 पर्यंत वाहतुकीसाठी खुला करण्याचे उद्दिष्ट आहे. सध्या सुमारे 25 टक्के काम पूर्ण झाले आहे.

    प्रवासात वेळ वाचणार

    या सेतुमुळे दक्षिण मुंबई ते अलिबागचा सुमारे 2.5 तासांचा प्रवास अवघ्या 75 मिनिटांत होणार आहे. तसेच जवाहरलाल नेहरू पोर्ट प्राधिकरण (JNPT) ते अलिबाग हे 55 किमीचे अंतर सुमारे 30 किमीवर येईल. उद्योग, लॉजिस्टिक्स आणि दैनंदिन प्रवासासाठी हा बदल मोठा ‘गेमचेंजर’ ठरणार आहे.Maharashtra TimesNavi Mumbai News: ठाणे-नवी मुंबई विमानतळ उन्नत ‘डबल डेकर’ मार्ग, 90 मिनिटांचा प्रवास अर्ध्या तासांत; कसा असेल 25 किमी लांब मार्ग?

    रेवस-रेडी सागरी महामार्ग या 498 किमी लांबीच्या किनारी महामार्गावर रेवस-करंजासह एकूण सात मोठे खाडी पूल उभारले जात आहेत. या पुलांमुळे रेवस ते रेडीपर्यंतचा प्रवास अधिक सुरक्षित, जलद आणि अखंड होणार आहे. विशेषतः पावसाळ्यात बोट सेवा बंद असताना बारामाही रस्तामार्ग उपलब्ध राहणार असल्याने स्थानिकांना मोठा दिलासा मिळेल.

    कुठे-कुठे मिळणार जोडणी?

    या प्रकल्पामुळे कोकणातील नागरिकांना नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि जेएनपीटी बंदराशी थेट व वेगवान कनेक्टिव्हिटी मिळेल. निर्यात-आयात सुलभ होऊन उद्योग क्षेत्राला चालना मिळणार आहे. तसेच पर्यटन क्षेत्रालाही मोठी गती मिळेल. अलिबाग, श्रीवर्धन, हरिहरेश्वरसारख्या किनारी भागांत पर्यटकांची संख्या वाढण्याची अपेक्षा आहे.

    वाहतूक सुलभ झाल्याने हापूस आंबा, मासे आणि इतर कृषी उत्पादने बाजारपेठेत जलद पोहोचतील. रिअल इस्टेट आणि स्थानिक व्यवसायांना नवी उभारी मिळेल. रोजगारनिर्मिती वाढून कोकणच्या आर्थिक विकासाला बळ मिळेल.

    Maharashtra TimesAnjaneri-Brahmagiri Ropeway: अंजनेरी ते ब्रह्मगिरी रोपवेला चालना, भाविक अनुभवणार निसर्गरम्य सौंदर्य; कसा असेल 375 कोटींचा प्रकल्प?

    एकूणच, खाडीवर उभा राहणारा हा विकासाचा सेतू कोकणचा चेहरामोहरा बदलणारा ठरणार आहे. उद्योग, पर्यटन, शेती आणि दळणवळण या सर्व क्षेत्रांना जोडणारा हा प्रकल्प रायगडसह संपूर्ण कोकणसाठी सुवर्णसंधी ठरणार असल्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

    सानिया कदम

    लेखकाबद्दलसानिया कदमसानिया कदम, मटा ऑनलाईनमध्ये कन्सल्टंट पदावर कार्यरत आहे. प्रामुख्याने क्राइम, सिव्हिक आणि पॉलिटिक्स या बातम्या कव्हर करते. याआधी सहा महिने महाराष्ट्र टाइम्स प्रिंटमध्ये कॉलेज क्लब रिपोर्टर म्हणून काम केले आहे. त्या काळात कॉलेज इव्हेंट्स, शैक्षणिक उपक्रम आणि सोशल मीडियावरील ट्रेंड्सवर बातम्या केल्या. मुलुंड वाणिज्य महाविद्यालयातून BMM मध्ये पदवी घेतल्यानंतर सध्या के.सी. महाविद्यालयात MA in Communication and Journalism करत आहे. इंटरनॅशनल घडामोडी आणि पॉप कल्चर हे विषय विशेष आवडीचे असून इंग्लिश आणि मराठी या दोन्ही भाषेत वाचन व लेखन करण्याची आवड आहे.… आणखी वाचा