हॉस्पिटलमधील नर्सने बोलणे बंद केल्याच्या नैराश्यातून डोंबिवलीत एका नामांकित डॉक्टरने टोकाचे पाऊल उचलले असून, त्याचे प्राण हॉस्पिटलमधीर कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे वाचले आहेत.
सुखी संसाराला लागली नजर
या प्रकरणातील डॉक्टर आणि त्यांची पत्नी दोघेही उच्चशिक्षित असून डोंबिवलीत त्यांचे स्वतःचे मोठे हॉस्पिटल आहे. मात्र, काही काळापासून या डॉक्टरांचे त्यांच्याच हॉस्पिटलमध्ये कार्यरत असलेल्या एका नर्ससोबत प्रेमसंबंध जुळले होते. या विवाहबाह्य संबंधांमुळे पती-पत्नीमध्ये वारंवार खटके उडू लागले. वादाचे स्वरूप इतके वाढले की, डॉक्टरांनी आपल्या पत्नीचा आणि घराचा त्याग करण्याचा निर्णय घेतला. ते डोंबिवली पूर्वेकडील एका हायफाय सोसायटीत भाड्याने घर घेऊन स्वतंत्र राहू लागले.
लग्नाचा तगादा आणि टोकाचे पाऊल
घटनेला कलाटणी तेव्हा मिळाली जेव्हा संबंधित नर्सने डॉक्टरांकडे लग्नासाठी तगादा लावला. “माझे आधीच लग्न झाले आहे, मी तुझ्याशी पुन्हा लग्न कसे करू?” असे डॉक्टरांनी स्पष्ट केल्यावर संतापलेल्या नर्सने त्यांच्याशी बोलणे पूर्णपणे बंद केले. ज्या नर्ससाठी सुखी संसारावर तुळशीपत्र ठेवले, तिनेच आता पाठ फिरवल्याने डॉक्टर मानसिक तणावात गेले. याच नैराश्यातून त्यांनी राहत्या घरी १० बिअर प्यायल्या आणि तब्बल ४५ झोपेच्या गोळ्यांचे सेवन करून जीवनप्रवास संपवण्याचा प्रयत्न केला.
Aditi Tatkare : ‘अजित दादा एकटे गेले नाहीत, आमचा रुबाब अन् माजसुद्धा सोबत घेऊन गेले’, आदिती तटकरेंच्या शब्दांनी सभागृह सुन्न
कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे वाचले प्राण
डॉक्टर वेळेवर हॉस्पिटलमध्ये न पोहोचल्याने कर्मचाऱ्यांना शंका आली. त्यांनी तातडीने डॉक्टरांच्या निवास्थानी धाव घेतली. दरवाजा उघडला असता डॉक्टर बेशुद्धावस्थेत आढळले. त्यांना तातडीने उपचारासाठी दाखल करण्यात आले.
सुदैवाने, वेळेवर उपचार मिळाल्याने सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळाली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास विष्णूनगर पोलीस करत आहेत.
