Chhatrapati Sambhajinagar News : छत्रपती संभाजीनगरमध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेनं संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. नेमकं काय घडलं?
नेमकं काय घडलं?
आयशा समीर मुल्ला (रा. घाट नांद्रे) असं मृत महिलेचं नाव आहे. या प्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आयशा यांनी 10 फेब्रुवारीच्या सुमारास गर्भपाताच्या गोळ्यांचे सेवन केले होते. त्यानंतर त्यांना अचानक त्रास जाणवू लागला आणि मोठ्या प्रमाणावर अतिरक्तस्राव सुरू झाला. प्रकृती खालावल्याने नातेवाईकांनी त्यांना तातडीने सिल्लोड येथील एका खासगी रुग्णालयात दाखल केले. तेथे सुमारे 10 दिवस त्यांच्यावर उपचार करण्यात आले, मात्र प्रकृतीत कोणतीही सुधारणा न झाल्याने आणि प्रकृती अधिकच चिंताजनक बनल्याने त्यांना पुढील उपचारांसाठी छत्रपती संभाजीनगर येथील शासकीय घाटी रुग्णालयात हलवण्यात आले. घाटी रुग्णालयात दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी त्यांना वाचवण्याचे शर्थीचे प्रयत्न केले. मात्र, काल सोमवारी रोजी पहाटे साडेचार वाजेच्या सुमारास उपचार सुरू असतानाच आयशा यांचा मृत्यू झाला. गर्भपाताच्या गोळ्यांच्या सेवनानंतर झालेल्या अतिरक्तस्रावामुळेच त्यांचा जीव गेल्याचे प्राथमिक माहितीवरून समोर आले आहे.
Ahilyanagar Accident : भल्यापहाटे काळाची झडप, कार अन् ट्रकचा भीषण अपघात; त्रिकोणी कुटुंबासह चौघांचा करुण अंत
सिल्लोडमध्ये बेकायदेशीर औषध विक्रीचे जाळे?
या घटनेमुळे सिल्लोड ग्रामीण पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. मात्र, या प्रकरणाने अनेक गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. या गोळ्या आयशा यांनी स्वतःहून मेडिकलवरून विकत घेतल्या होत्या की त्यांना कोणीतरी त्या बेकायदेशीरपणे उपलब्ध करून दिल्या होत्या, याचा तपास आता पोलीस करत आहेत. परिसरात यापूर्वीही अशा प्रकारचे अवैध प्रकार समोर आले असल्याने, पोलिसांनी सखोल तपास केल्यास औषध विक्री करणाऱ्या मोठ्या टोळीचे पितळ उघडे पडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
Raj Thackeray Japan Girl : ‘या जपानी मुलीला मनःपूर्वक धन्यवाद!’ राज ठाकरेंनी मानले तरुणीचे आभार, पण का?
छत्रपती संभाजीनगरमध्ये मध्यरात्री काय घडलं?
जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील चांगतपुरी गावाजवळ काल रात्री एक भीषण अपघात झाला. चालकाचा ताबा सुटल्याने कार थेट उजव्या कालव्यात कोसळली. या दुर्घटनेत कारमधील पती-पत्नीसह त्यांना वाचवण्यासाठी पाण्यात उतरलेला स्थानिक तरुण असे तिघेजण बेपत्ता झाले आहेत. या घटनेमुळे गावात खळबळ उडाली असून पोलिसांकडून शोधकार्य सुरू आहे.
