Devendra fadanvis on ajit pawar: “दादा एका पिढीचा आत्मविश्वास होते,” अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवारांच्या आठवणींना उजाळा दिला. शोकप्रस्तावावर बोलताना फडणवीसांनी दादांसोबतच्या शेवटच्या भेटीचा किस्सा आणि २०१९ च्या शपथविधीचे गुपित उलगडले आहे.
शेवटची भेट कशी होती?
अजित पवारांचा आणि माझा जन्म 22 जुलैचा. ते माझ्यापेक्षा 11 वर्ष मोठे. त्यांच्यात माझ्यात एक दशकाहून अधिक दीर्घ काळ जवळीक होती. 2014 नंतर आमच्यात भावनिक नाते तयार झाले होते. अजित पवारांसोबत माझे नाते मित्रत्त्वाचे नाते होते, ते केवळ स्ट्रॅटेजिक नेते नव्हते, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.
कधी झाली होती शेवटची भेट
27 जानेवारी 2026 रोजी आमची भेट झाली होती. ही भेट पायाभूत सुविधांची होती. त्या बैठकीमध्ये त्यांनी मुद्दे मांडले. नंतर आमची अँटीचेंबरमध्ये शेवटची भेट झाली. दादा कुठलेही काम कागदावर लिहून घ्यायचे. दादा हे एका पिढीचा आत्मविश्वास होते. शेती, पशुपालन, याविषयी पूर्ण जाण असलेले ते होते. संघर्षाला त्यांनी पाठ फिरवली नाही. जाहीर माफी मागायला त्यांनी मागे पाहिलं नाहीय अनेकांचा आधारवड असलेले दादा आपल्यात नसल्याने अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत, असं प्रतिपादन यावेळी मुख्यमंत्र्यांनी केलं आहे.
Eknath Shinde : सार्वजनिक बांधकाम खात्याची धुरा भुसेंकडे, तर नगरविकासची जबाबदारी सामंतांना; एकनाथ शिंदेंच्या पत्रात काय?
माझ्याशी चर्चा केली आणि…
अजित पवार हे शब्द पाळणारे नेते होते. याचा अनुभव मला 2019 साली आला. दिलेला शब्द मोडणार नाही त्यांनी म्हटलं. पहाटेचा शपथविधी नव्हे तर सकाळचा शपथविधी असं ते म्हणायचे. काही किंमत मोजावी लागली. सुप्रीम कोर्टात निर्णय विरोधात गेल्यावर त्यांनी वर्षा बंगल्यावर माझ्याशी चर्चा केली आणि त्यांचा निर्णय बदलवला. त्यांच्या स्वभावामध्ये पारदर्शकता होती. ते तोंडावर बोलायचे. राजकीय परिणामांची पर्वा करायचे नाही. काम होणारे असेल तर ते तात्काळ करायचे आणि दादा म्हणतात ते करतात असं राजकारणातलं चित्र विरळ आहे, असं फडणवीस म्हणाले.
शेवटची आठवण
शेवटच्या भेटीतील आठवण सांगताना मुख्यमंत्री म्हणाले की, सार्वजनिक बांधकाम विभागाचं प्रझेंटेशन झालं. बैठक संपली, कोणतंही काम त्यांच्या कागदावर लिहलेलं असायचं काय बोलायचं आहे गे त्यांनी थोडक्यात लिहिलेल असायच. पावणेतीन तास आम्ही एकत्र होतो.
Amol Mitkari: अजित पवारांच्या अपघाताबाबत अमोल मिटकरींकडून आरोपांचा नवा बॉम्ब; पायलटवर थेट ‘सुसाईड मिशन’चा आरोप
ती आमची शेवटची भेट असेल याची पुसटशीही कल्पना नव्हती, असं बोलताना मुख्यमंत्री फडणवीस भावूक झाल्याचे पाहायला मिळाले.
