• Mon. Jun 15th, 2026
    Rahul Gandhi : राहुल गांधी उद्या भिवंडी न्यायालयात हजर होणार, नेमकं प्रकरण काय?

    काँग्रेस नेते राहुल गांधी उद्या भिवंडी न्यायालयात हजर होणार आहेत. विशेष म्हणजे ते आज उत्तर प्रदेशच्या सुल्तानपूर येथे न्यायालयात हजर राहीले होते. त्यानंतर ते उद्या भिवंडी न्यायालयात हजर राहणार असल्याची माहिती आहे.

    Rahul Gandhi(फोटो– ANI)
    ठाणे : लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्याविरोधात भिवंडी न्यायालयात अवमान याचिका दाखल असून या प्रकरणात नवीन जामीनदार देण्यासाठी ते आज, शनिवारी सकाळी न्यायालयात हजर राहणार आहेत. आहे. परंतु, त्यांना नेमके कोण जामीनदार राहणार आहेत, याबाबत नाव गुप्त ठेवण्यात आले आहे. जामीनदाराच्या नावाचा उलगडा आज होणार असला तरी भिवंडी महापालिकेची महापौर पदाची निवडणूक तसेच, इतर सध्याच्या राजकीय परिस्थितीवर ते काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

    लोकसभा निवडणुकीत २०१४ मध्ये भिवंडीतील प्रचार सभेत राहुल गांधी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाविषयी वादग्रस्त विधान केले होते. या प्रकरणी त्यांच्याविरुद्ध आरएसएसचे राजेश कुंटे यांनी भिवंडी न्यायालयात अवमान याचिका दाखल केली. या प्रकरणात राहुल यांना कॉँग्रेसचे ज्येष्ठ नेते शिवराज पाटील-चाकूरकर जामीनदार होते. चाकूरकर यांचे गेल्यावर्षी निधन झाल्याने राहुल यांना नवीन जामीनदार द्यावा लागणार आहे. त्यामुळे आज ते न्यायालयात उपस्थित राहून नवीन जामीनदार देतील, अशी माहिती त्यांचे वकील नारायण अय्यर यांनी दिली. मात्र, सुरक्षिततेच्या दृष्टीने अद्याप जामीनदाराचे नाव जाहीर करण्यात आले नाही. त्यामुळे राहुल यांना कोण जामीनदार राहिले आहे, याबाबत सर्वांना उत्सुकता लागली आहे.

    विशेष म्हणजे राहुल गांधी हे शुक्रवारी (20 फेब्रुवारी) उत्तर प्रदेशच्या सुल्तानपूर येथे दाखल झाले होते. सुल्तनापूरच्या एमपी-एमएलए कोर्टात ते हजर झाले होते. यानंतर सलग दुसऱ्या दिवशी त्यांना कोर्टात हजर राहावं लागलणार आहे. पण यावेळी त्यांना कोर्टात हजर राहण्यासाठी सुल्तानपूरहून भिवंडीत यावं लागणार आहे. ते उद्या कोर्टात हजर राहणार असल्याची माहिती आहे.

    राहुल गांधी यांच्या भिवंडी दौऱ्याकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे. राहुल गांधी भिवंडीत कोर्टाचं काम आटोपल्यानंतर कुणाला भेटतात, पक्षाच्या नेत्यांसोबत काय चर्चा करतात, आगामी काळासाठी काही रणनीती ठरवतात का? ते पाहणं आता महत्त्वाचं आहे. भिवंडी महापालिका निवडणुकीचा निकाल नुकताच लागला आहे. इथे भाजपला धक्का देत काँग्रेसने भाजपचे बंडखोर नारायण चौधरी यांनी पाठिंबा देत महापौर निवडणुकीत विजयी केले. त्यानंतर उपमहापौरही काँग्रेसचा बसला. या निवडणुकीच्या दुसऱ्याच दिवशी राहुल गांधी भिवंडीत जात आहेत. त्यामुळे भिवंडी काँग्रेसच्या नेत्यांमध्ये राहुल गांधी यांच्या भेटीने नवी ऊर्जा मिळण्याची शक्यता आहे.

    चेतन पाटील

    लेखकाबद्दलचेतन पाटील“चेतन पाटील हे पत्रकार आहेत. त्यांना राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, मनोरंजन आणि क्रीडा अशा विविध बीटच्या बातम्या केल्याचा अनुभव आहे. चेतन पाटील यांनी दैनिक लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा विविध वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. चेतन हे जवळपास 8 वर्षांपेक्षा अधिकचा काळ माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी कल्याणच्या नामांकित बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी शिक्षण घेतलं आहे. त्यांना पदवीचं शिक्षण घेत असताना एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम करण्याचा अनुभव आहे. सध्या ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन येथे कार्यरत आहेत.

    चेतन पाटील यांनी केलेल्या बातमीमुळे एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली. याशिवाय चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट पडलेला बघायला मिळाला आहे.

    चेतन पाटील महाविद्यालयात शिक्षण घेत असताना त्यांच्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या कवीकट्टा सदरात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांनी नाटकातही काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य हौशी स्पर्धेत भाग घेतलाय. त्यांनी ‘जलरंग तापी’ नाट्य संस्थेसोबत काम करत असताना ‘नटसम्राट’ नाटकात बूटपॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका साकारली होती. त्यांची ही भूमिका प्रचंड भाव खाऊन गेली होती. त्यांच्या अभिनयाने प्रभावित होऊन एका प्रेक्षकाने त्यांना खांद्यावर उचलून घेत नृत्य केलं होतं.

    खूप छोट्या गोष्टींमधून आनंद शोधावा, असं त्यांचं मत आहे. त्यांना पत्रकारितेसह वाचन, लेखनाची आवड आहे. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं वैयक्तिक आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.”… आणखी वाचा