• Sat. Jun 6th, 2026

    Pune News: पुण्यातील रेल्वे स्थानक समस्यांचं आगार, दुहेरीकरण पूर्ण पण मूलभूत सुविधाही मिळेनात; अनेक कामं रखडली

    Pune News: पुण्यातील रेल्वे स्थानक समस्यांचं आगार, दुहेरीकरण पूर्ण पण मूलभूत सुविधाही मिळेनात; अनेक कामं रखडली

    Daund Chord Line Station: दौंड कॉर्ड लाइन रेल्वे स्थानकावर प्रवाशांना गैरसोयींचा सामना करावा लागत आहे. रस्ता खराब असून रिक्षाचालकांची मनमानी सुरू आहे. नवीन फलाटावर पादचारी पूल, शेड, बसण्याची बाके, पिण्याचे पाणी आणि स्वच्छतागृहे नाहीत.

    नरेंद्र जगताप, दौंड: दौंड कॉर्ड लाइन रेल्वे स्थानक प्रवाशांसाठी गैरसोयींचे आगार बनले आहे. खराब रस्ते, रिक्षाचालकांची मनमानी, अपूर्ण सुविधा आणि रेल्वे प्रशासनाचे दुर्लक्ष यामुळे प्रवाशांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. दौंड शहर किंवा जुन्या दौंड स्थानकापासून कॉर्ड लाइन स्थानकाकडे येणारा तीन ते चार किलोमीटरचा सिमेंटचा रस्ता उखडला असून, पावसाळ्यात त्यात पाणी साचते. स्थानकावर रिक्षा सहज उपलब्ध होत नाहीत आणि रिक्षाचालक १५० ते २०० रुपये भाडे आकारतात, ज्यावर कोणाचेही नियंत्रण नाही. मनमाड, दिल्ली, नागपूरकडे जाणाऱ्या अनेक लांब पल्ल्याच्या गाड्या कॉर्ड लाइन स्थानकावर थांबत असल्या तरी, स्थानकाची अवस्था दयनीय आहे.

    पादचारी पूल नाही

    स्थानकावर लोहमार्गाचे दुहेरीकरण झाले असून, फेब्रुवारी २०२६ पासून मनमाडच्या दिशेने जाणाऱ्या गाड्या नवीन फलाट क्रमांक दोनवर थांबत आहेत. मात्र, प्रवाशांना या फलाटावर जाण्यासाठी पादचारी पूल (FOB) उभारलेला नाही. तसेच, कोच नंबर डिस्प्लेही लावलेले नाहीत. फलाट क्रमांक दोनवर शेड किंवा छत नसल्याने उन्हात प्रवाशांना उघड्यावर उभे राहावे लागते. ज्येष्ठ नागरिक, महिला आणि लहान मुलांसाठी बसण्याची सोय नाही. दुचाकी आणि चारचाकी वाहनांसाठी पार्किंगची व्यवस्था नाही. नवीन फलाटावर पिण्याच्या पाण्याची आणि स्वच्छतेची सोयही नाही.Maharashtra TimesKalyan-Taloja Metro: ‘मेट्रो लाइन 12’चा महत्त्वाचा टप्पा पूर्ण, कल्याण-शिळफाटा-तळोजा मार्गाला समांतर धावणार मार्गिका; कुठे असणार स्थानकं?

    मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापकांनी नुकतीच स्थानकाची पाहणी केली होती. त्यांच्या दौऱ्यापूर्वी प्रशासनाने घाईघाईने विजेची आणि इतर कामे केली होती. मात्र, ही कामे आता उघड्यावर पडली असून, अनेक कामे अपूर्ण आहेत. हे स्थानक एक महत्त्वाचे थांबा केंद्र बनले आहे आणि प्रवाशांकडून महसूल मिळत असूनही रेल्वे प्रशासन मूलभूत सुविधा पुरवत नाही.

    Maharashtra TimesNavi Mumbai News: ठाणे-वाशी मार्गावरील रेल्वे स्थानक बकाल, दररोज कामगार, स्थानिकांची ये-जा; तरी बंद पंखे, कचरा, सांडपाण्याच्या समस्या

    प्रवाशांची गैरसोय कशामुळे?

    याबाबत स्थानकप्रमुख ए. के. सिंग यांनी सांगितले की, ‘कॉर्ड लाइन रेल्वे स्थानकाबाबत प्रवाशांच्या तक्रारींचा वरिष्ठ कार्यालयाला लेखी अहवाल पाठवला असून, येथील त्रुटी लवकरच दूर करण्यात येतील.’ मात्र, प्रवाशांना या आश्वासनांची पूर्तता कधी होणार याची प्रतीक्षा आहे. खराब रस्ते आणि रिक्षाचालकांच्या मनमानीमुळे प्रवाशांना स्थानकावर पोहोचणेही एक आव्हान बनले आहे. या सर्व समस्यांमुळे कॉर्ड लाइन रेल्वे स्थानक प्रवाशांसाठी गैरसोयीचे केंद्र बनले आहे.

    सानिया कदम

    लेखकाबद्दलसानिया कदमसानिया कदम, मटा ऑनलाईनमध्ये कन्सल्टंट पदावर कार्यरत आहे. प्रामुख्याने क्राइम, सिव्हिक आणि पॉलिटिक्स या बातम्या कव्हर करते. याआधी सहा महिने महाराष्ट्र टाइम्स प्रिंटमध्ये कॉलेज क्लब रिपोर्टर म्हणून काम केले आहे. त्या काळात कॉलेज इव्हेंट्स, शैक्षणिक उपक्रम आणि सोशल मीडियावरील ट्रेंड्सवर बातम्या केल्या. मुलुंड वाणिज्य महाविद्यालयातून BMM मध्ये पदवी घेतल्यानंतर सध्या के.सी. महाविद्यालयात MA in Communication and Journalism करत आहे. इंटरनॅशनल घडामोडी आणि पॉप कल्चर हे विषय विशेष आवडीचे असून इंग्लिश आणि मराठी या दोन्ही भाषेत वाचन व लेखन करण्याची आवड आहे.… आणखी वाचा