• Fri. Mar 6th, 2026

    Navi Mumbai News: ठाणे-वाशी मार्गावरील रेल्वे स्थानक बकाल, दररोज कामगार, स्थानिकांची ये-जा; तरी बंद पंखे, कचरा, सांडपाण्याच्या समस्या

    Navi Mumbai News: ठाणे-वाशी मार्गावरील रेल्वे स्थानक बकाल, दररोज कामगार, स्थानिकांची ये-जा; तरी बंद पंखे, कचरा, सांडपाण्याच्या समस्या

    Navi Mumbai Railway Station: नवी मुंबईतील ठाणे-वाशी मार्गावरील महत्त्वाच्या रेल्वे स्थानकावर अस्वच्छता, सांडपाणी व इतर समस्यांमुळे प्रवाशी हैराण झाले आहेत. या स्थानकावरून दररोज स्थानिक नागरिकांसह महापे एमआयडीसेतील कामगार, माथाडी कामगार प्रवास करतात.

    म. टा. वृत्तसेवा, नवी मुंबई: घणसोली रेल्वेस्थानकात विविध समस्या वाढत चालल्या असून त्यामुळे हे रेल्वेस्थानक बकाल होऊ लागले आहे. या रेल्वेस्थानकाच्या देखभाल, दुरुस्तीकडे आणि स्वच्छतेकडे रेल्वे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असून, त्याकडे लक्ष द्यावे अशी मागणी प्रवासी करीत आहेत.

    घणसोली हे ठाणे-वाशी रेल्वेमार्गावरील महत्त्वाचे रेल्वेस्थानक आहे. या रेल्वेस्थानकातून दररोज शेकडो प्रवासी ये-जा करीत असतात. घणसोलीमध्ये माथाडी वस्ती मोठ्या प्रमाणात असल्यामुळे सकाळ-संध्याकाळी माथाडी कामगारांची रेल्वेस्थानकामधून मोठ्या प्रमाणात ये-जा सुरू असते. शिवाय महापे एमआयडीसीमध्ये कामासाठी जाणाऱ्या कामगारांना घणसोली रेल्वेस्थानक मध्यवर्ती पडत असल्याने तिकडे जाणाऱ्या प्रवाशांची संख्याही मोठी आहे. यामुळे घणसोली रेल्वेस्थानक नेहमी प्रवाशांनी गजबसलेले असते.

    Maharashtra TimesMumbai Coastal Road: दोन दशकांहून जुनं नाना-नानी उद्यान ‘गायब’ होणार? 186 झाडं तोडून कोस्टल रोड बांधणार; उन्नत मार्गाचं काम सुरू

    मात्र सध्या या रेल्वेस्थानकात वानवा आहे. फलाटावर सुविधांची रेल्वेस्थानकातून जाण्यासाठी प्रवाशांना अनेक वेळा साचलेल्या सांडपाण्यातून मार्ग काढत पुढे जावे लागते. रेल्वेस्थानकात विद्युत वाहिन्या सर्वत्र लोंबकळत असल्याचे चित्र दिसून येत आहे. रेल्वेस्थानकातील पंखे अध्येमध्ये बंद पडतात. काही पंखे फक्त शोभेसाठीच लावलेले आहेत. रेल्वेस्थानकात अनेक ठिकाणी भिंतींना लावलेल्या टाइल्स निघालेल्या आहेत. त्यामुळे रेल्वेस्थानक भकास वाटू लागले आहे. अस्वच्छता तर कायम दिसून येते.

    पाणपोयी फक्त दिखाव्यासाठी

    घणसोली रेल्वेस्थानकात असलेल्या पाणपोईची अवस्था बघवत नाही अशी आहे. ती अत्यंत अस्वच्छ आहे. पाणपोईमधील नळच गायब झालेले आहेत. तिथे पाणीच नाही. त्यामुळे प्रवाशांना फलाटावर पिण्याचे पाणी मिळत नाही. ही पाणपोई केवळ दिखाव्यासाठी उभारली आहे का ? असा प्रश्न यामुळे प्रवासी उपस्थित करत आहेत.

    Maharashtra TimesThane Coastal Road: ठाण्याच्या खाडीवर बनवणार कोस्टल रोड, आठ महिन्यांत मोठा टप्पा पूर्ण; थेट वाढवण बंदर, कर्नाटक पोहचवणार मार्ग, पाहा Video

    फेरीवाले, तृतीयपंथीयांचा कब्जा

    रेल्वेस्थानकाच्या पश्चिमेला नागरी वस्ती आहे. त्यामुळे इथून रेल्वे स्थानकात येण्या जाणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी आहे. मात्र अनेक वेळा रेल्वेस्थानकातून बाहेर पडताना फेरीवाले आणि तृतीयपंथीयांचा प्रवाशांना त्रास सहन करावा लागतो. रेल्वे सुरक्षा दल याकडे लक्ष देत नसल्याची प्रवाशांची तक्रार आहे.

    VIDEO : मुंबईत मेट्रोच्या पिलरचा भाग कोसळला, कार व रिक्षाचा चेंदामेंदा

    रेल्वेस्थानकाबाहेर भंगार, कचरा

    रेल्वेस्थानकाबाहेर पूर्वेला ठाणे-तुर्भे मार्गाकडे असलेल्या पार्किंगमध्ये सध्या भंगार गाड्यांचा खच पडला आहे. त्यामुळे रेल्वेस्थानकाला बकाल स्वरूप आले आहे. मोठे प्रशस्त रेल्वेस्थानक असूनही पडलेल्या भंगारामुळे या रेल्वेस्थानकाची पार रया गेली आहे.

    सानिया कदम

    लेखकाबद्दलसानिया कदमसानिया कदम, मटा ऑनलाईनमध्ये कन्सल्टंट पदावर कार्यरत आहे. प्रामुख्याने क्राइम, सिव्हिक आणि पॉलिटिक्स या बातम्या कव्हर करते. याआधी सहा महिने महाराष्ट्र टाइम्स प्रिंटमध्ये कॉलेज क्लब रिपोर्टर म्हणून काम केले आहे. त्या काळात कॉलेज इव्हेंट्स, शैक्षणिक उपक्रम आणि सोशल मीडियावरील ट्रेंड्सवर बातम्या केल्या. मुलुंड वाणिज्य महाविद्यालयातून BMM मध्ये पदवी घेतल्यानंतर सध्या के.सी. महाविद्यालयात MA in Communication and Journalism करत आहे. इंटरनॅशनल घडामोडी आणि पॉप कल्चर हे विषय विशेष आवडीचे असून इंग्लिश आणि मराठी या दोन्ही भाषेत वाचन व लेखन करण्याची आवड आहे.… आणखी वाचा