पुण्याच्या चाकण औद्योगिक वसाहतीत ५० प्रवाशांनी भरलेल्या PMPML इलेक्ट्रिक बसने अचानक पेट घेतला. चालकाच्या प्रसंगावधानामुळे मोठी जीवितहानी टळली…
चिंतेची बाब आणि वाढत्या घटना
दरम्यान, अशा घटनांची ही काही पहिलीच वेळ नाही. गेल्या वर्षभरात पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात PMPML च्या बसेसना आग लागण्याच्या किमान १० ते १२ घटना समोर आल्या आहेत. कधी इंजिन गरम होणे, तर कधी बॅटरीमधील बिघाड, ही कारणे दिली जातात. पण प्रश्न उरतोच की, 50 प्रवाशांचा जीव धोक्यात घालणाऱ्या या तांत्रिक चुकांना जबाबदार कोण? प्रशासनाचा देखभाल-दुरुस्तीचा अभाव की कंत्राटदारांचा निष्काळजीपणा?
जीवन-मरणाचे गणित
एकीकडे आपण ‘ग्रीन मोबिलिटी’च्या गप्पा मारतो, पण त्याच इलेक्ट्रिक बसेस जर ‘फिरता मृत्यू’ ठरणार असतील, तर प्रवाशांनी कोणावर विश्वास ठेवायचा? दररोज लाखो पुणेकर या बसने प्रवास करतात. तांत्रिक तपासणीचा अभाव हे या घटनांमागचे मुख्य कारण असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.
Ajit Pawar: अजितदादांची जागा भरून काढणार, १५ वर्षांची परंपरा कायम ठेवणार; सुनेत्रा पवारांचा कार्यकर्त्यांसाठी खास निर्णय, पुण्यात…
काय काळजी घेणे आवश्यक आहे?
दरम्यान, प्रत्येक फेरीनंतर बसच्या इलेक्ट्रिकल वायरिंगची तपासणी होणे गरजेचे असते, बसमध्ये अग्निशमन उपकरणे सुस्थितीत असावीत आणि चालकांना त्याच्या वापराचे प्रशिक्षण दिलेले हवे असणे बंधनकारक असते. धूर निघताच अलार्म वाजणारी यंत्रणा बसमध्ये असणे अनिवार्य आहे, असं संबंधित घटना टाळण्यासाठी गरजेचं असल्याचं तज्ज्ञ सांगतात.
दरम्यान, प्रशासनाने या घटनांची केवळ कागदोपत्री चौकशी न करता दोषींवर कडक कारवाई करणे अपेक्षित आहे, अन्यथा प्रवाशांचा प्रवास हा कधीही अंतिम प्रवास ठरु शकतो.
