सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी एक खळबळजनक वक्तव्य केले आहे. सोलापूरमधील माळशिरसच्या राजकारणावर भाष्य करताना गोरेंनी गंभीर आरोप केला. माजी आमदार राम सातपुते यांना संपवण्याचा कट रचण्यात आलेला, असे विधान त्यांनी केले. हा कट कोणी रचला होता ते भविष्यात पोलीस तपासात समोर येईल, असेही गोरे म्हणाले.