• Sun. Jun 7th, 2026
    दिवसभरातील ताज्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज पाहा फक्त एका क्लिकवर


    Marathi News Live: राज्यातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, परभणी, धाराशीव आणि लातूर या १२ जिल्हा परिषदा आणि १२५ पंचायत समित्यांच्या निवडणुकीची मतमोजणी काल झाली. त्यातील सिंधुदुर्ग, सातारा, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, परभणी आणि धाराशीव या सहा जिल्हा परिषदांमध्ये भाजप क्रमांक एकचा पक्ष ठरला. सत्ताधारी शिवसेनेने रायगड आणि रत्नागिरीमध्ये सर्वाधिक, तर राष्ट्रवादीने पुणे आणि कोल्हापूर जिल्हा परिषदेत सर्वाधिक जागांवर विजय मिळवला. काँग्रेसने लातूर जिल्हा परिषदेत सर्वाधिक २३ जागा जिंकून पक्षाचा गड राखला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शप) पक्षाने सांगलीमध्ये १८ जागा जिंकत चांगली कामगिरी केली आहे.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *