अजितदादांच्या पश्चात सुनेत्रा वहिनी यांच्या नेतृत्वात आणि मार्गदर्शनाखाली मावळचा विकास पुढे नेण्याचा निर्धार शेळके यांनी व्यक्त केला.
ही निवडणूक मामा विरुद्ध भाचा अशीच रंगली होती. भाजपचे माजी मंत्री बाळा भेगडे आणि त्यांचे भाचे सुनील शेळके यांच्यात निवडणूक प्रचारादरम्यान जोरदार आरोप-प्रत्यारोप झाले होते. बाळा भेगडे यांनी “घड्याळाची टिकटिक बंद करू,” असा दावा केला होता. मात्र, निकालानंतर भाजपचा पूर्णपणे पराभव झाल्याने सुनील शेळके यांनी बाळा भेगडे यांच्यावर निशाणा साधत, “आता गलिच्छ राजकारण थांबवावं,” असा सल्ला दिला.
सुनील शेळके पुढे म्हणाले, “मागील पाच-सहा वर्षांत आदरणीय अजितदादांनी मावळ तालुक्यासाठी हजारो कोटी रुपयांचा निधी दिला. रस्ते, वीज, पाणी यासारख्या मूलभूत सुविधा गाव-वाड्या-पाड्यांतील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या पश्चात मावळच्या मायबाप जनतेने हे दाखवून दिलं की, प्रामाणिकपणे काम करणाऱ्याच्या पाठीशी जनता खंबीरपणे उभी राहते.”
Solapur ZP Election Result : सोलापुरात माजी आमदारांचा ‘पॉवर गेम’; लेकाची 6 हजारांच्या मताधिक्याने बाजी; काँग्रेसला मोठा धक्का!
“आजही आम्हाला अजितदादांची उणीव जाणवते. मात्र, आमच्यासोबत त्यांचे आशीर्वाद आहेत. सुनेत्रा वहिनी यांचं उत्तराधिकारी म्हणून आम्हाला पाठबळ आहे. त्यांच्या खांद्याला खांदा लावून मावळमध्ये विकासकामे पुढे नेऊ. हीच आमच्याकडून अजितदादांना खरी श्रद्धांजली असेल,” असंही त्यांनी सांगितलं.
दरम्यान, बाळा भेगडे यांनी केलेली टीका ही निवडणुकीचा भाग असल्याचं सांगत सुनील शेळके म्हणाले, “प्रचारात अनेक मुद्दे मांडले जातात. आज आपण सुरक्षित आहोत, उद्या दुसऱ्याचं कुटुंब उध्वस्त झालं तरी चालेल, ही भूमिका त्यांनी थांबवावी,” असा घणाघात त्यांनी केला.
