यावेळी सामंत यांनी शिवसेनेच्या ताकदीचे आकडे मांडत विरोधकांना सूचक इशारा दिला आहे.
नेमकं काय म्हणाले सामंत?
सामंत म्हणाले की, जयंत पाटील यांनी जे काही वक्तव्य केलं आहे, ते त्यांचं वैयक्तिक मत होतं. मात्र अंतिम निर्णय घेण्याची ताकद, अनुभव आणि अधिकार हे शरद पवार साहेबांकडेच आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीबाबतचा निर्णय त्यांच्याच नेतृत्वाखाली होईल. या वक्तव्यामुळे राष्ट्रवादीच्या भवितव्याबाबत सुरू असलेल्या दाव्या-प्रतिदाव्यांवर पडदा पडेल, अशी राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे.
‘जिल्हा परिषद निवडणुकांमध्येही शिवसेनेचा स्ट्राईक रेट नक्कीच चांगला राहील’
दरम्यान, जिल्हा परिषद निवडणुकांबाबतही उदय सामंत यांनी आत्मविश्वास व्यक्त करत विरोधकांना इशारा दिला. ते म्हणाले, ‘महायुतीमध्ये भाजपा हा मोठा पक्ष आहे, हे मान्य आहे. पण आम्ही भाजपाच्या अगदी पाठोपाठ आहोत. थेट दुसऱ्या क्रमांकावर आहोत, असंही यावेळी सामंत म्हणाले.
Ambadas Danve: ‘मंगळसूत्र’ उतरवणं हेच का तुमचं हिंदुत्व?’; परीक्षा केंद्रावरील नियमावलीवरून वाद, अंबादास दानवे यांची सरकारवर टीका
दरम्यान, गेल्या तीन वर्षांतील शिवसेनेची कामगिरी सांगताना सामंत यांनी आकडेवारी मांडली. 60 आमदार निवडून येणं, 72 नगरपालिकांमध्ये अध्यक्षपद मिळवणं, 450 पेक्षा अधिक नगरसेवक निवडून येणं ही आमची ताकद आहे.
त्यामुळे जिल्हा परिषद निवडणुकांमध्येही शिवसेनेचा स्ट्राईक रेट नक्कीच चांगला राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. राज्यात सत्तासमीकरणे बदलत असताना आणि आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर असताना, उदय सामंत यांच्या या स्पष्ट, आक्रमक विधानांनी राजकीय चर्चांना पुन्हा एकदा उधाण आणले आहे.
