• Sat. Mar 7th, 2026
    ZP Election : याला म्हणतात जबाबदार नागरीक! नवरदेवाचं मतदान केल्यानंतरच वऱ्हाड निघालं लग्नाला

    साताऱ्यातील एका नवरदेवाच्या एका कृतीने सर्वांची मने जिंकून घेतली आहेत. राज्यातील 12 जिल्हा परिषद आणि 125 नगर पंतायतींसाठी आज मतदान पार पडत आहे. या मतदानाच्या निमित्ताने साताऱ्यातील नवरदेवाने आधी आपलं नागरीक म्हणून महत्त्वाची जबाबदारी पार पाडली. त्यानंतर तो लग्न कार्यासाठी गेला. त्यामुळे त्याचं सर्वत्र कौतुक होत आहे.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    सुधीर पाटील, सातारा : राज्यातील 12 जिल्हा परिषद आणि 125 पंचायत समित्यांचा निवडणुकीचा कार्यक्रम पार पडत आहे. या सर्व ठिकाणी आज मतदान देखील पार पडलं आहे. मतदानाचा अधिकार हा लोकशाहीतला सर्वात श्रेष्ठ अधिकार मानला जातो. त्यामुळे देशाचे जबाबदार नागरीक म्हणून आपण तो अधिकार बजावणं आवश्यक आहे. अनेक जण मतदानाची सुट्टी ही बाहेरगावी फिरण्यात व्यथित करतात. ते मतदानाला जात नाहीत. त्यांना मतदानाचं गांभीर्य कळत नाही. पण आपलं एक मत खूप मोठं परिवर्तन घडवू शकतं याची त्यांना जाणीव असायला हवी.

    जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांची निवडणूक तर ग्रामीण महाराष्ट्राचा कणाच मानला जातो. कारण ग्रामीण महाराष्ट्रातील नागरिकांच्या सोयी सुविधांसाठी या संस्था महत्त्वाच्या आहेत. त्यामुळे या निवडणुकीत मतदान करण्याचं आवाहन वारंवार केलं जातं. विशेष म्हणजे याच गोष्टीचं गांभीर्य ओळखत साताऱ्यात एका नवरदेवाने लग्नाला जाण्याआधी आपला मतदानाचा अधिकार बजावला. या नवरदेवाची सध्या साताऱ्यात चांगलीच चर्चा होत आहे. या नगरसेवकाचं कौतुकदेखील होत आहे.

    नगरसेवकाचं स्तुत्य काम

    जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीसाठी आज सकाळपासून मतदान सुरू आहे. निवडणूक म्हणजे लोकशाहीचा उत्सव. त्यामुळे प्रत्येक जण या उत्सवात सहभागी होऊन मतदानाचं कर्तव्य बजावत आहे. कराड तालुक्यातील तांबवे गावात एका नवरदेवाने आपल्या लग्नाआधी मतदान केंद्र गाठले. सहकुटुंब मतदान केलं अन् मगच त्याचं वऱ्हाड पुण्याला रवाना झालं.

    हल्ली मतदानाच्या बाबतीत मतदारांमध्ये मोठी जागृती झाली आहे. त्यामुळे मताचा अधिकार मिळालेले नवतरूण उत्साहाने मतदान करत आहेत. त्याचबरोबर वृद्ध आणि दिव्यांग मतदार देखील मतदान केंद्रावर येऊन मतदानाचा अधिकार बजावतात. तांबवे (ता. कराड) गावातील विक्रम पाटील या तरूणाचे आज पुण्यात लग्न आहे. पावणे दोनशे किलोमीटर अंतरावर लग्न सोहळा असल्याने वेळेवर पोहोचणे आवश्यक होते. ही बाब लक्षात घेऊन त्याने राष्ट्रीय कर्तव्याला प्राधान्य दिलं आणि मग तो पुण्याकडे रवाना झाला.

    नवरदेवानं सकाळी लवकर आपल्या कुटुंबासह मतदान केंद्रावर जाऊन मतदान केलं. मतदानासाठी रांगेत उभ्या राहिलेल्या नवरदेवाने सर्वांचे लक्ष वेधले. त्याच्या सोबत कुटुंबातील महिला आणि करवल्या देखील मतदानासाठी आल्या होत्या. त्यामुळे मतदान प्रतिनिधींनी नवरदेवासोबत फोटो काढले. नवरदेवासाठी सुद्धा हा दिवस संस्मरणीय ठरला. मतदानामुळे मित्रपरिवार आणि ग्रामस्थांना प्रत्यक्ष लग्नाला जाणे शक्य नव्हते. त्यांनी मतदार केंद्रावरच त्याच्या सोबत फोटो काढून त्याला भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

    चेतन पाटील

    लेखकाबद्दलचेतन पाटील“चेतन पाटील हे पत्रकार आहेत. त्यांना राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, मनोरंजन आणि क्रीडा अशा विविध बीटच्या बातम्या केल्याचा अनुभव आहे. चेतन पाटील यांनी दैनिक लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा विविध वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. चेतन हे जवळपास 8 वर्षांपेक्षा अधिकचा काळ माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी कल्याणच्या नामांकित बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी शिक्षण घेतलं आहे. त्यांना पदवीचं शिक्षण घेत असताना एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम करण्याचा अनुभव आहे. सध्या ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन येथे कार्यरत आहेत.

    चेतन पाटील यांनी केलेल्या बातमीमुळे एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली. याशिवाय चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट पडलेला बघायला मिळाला आहे.

    चेतन पाटील महाविद्यालयात शिक्षण घेत असताना त्यांच्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या कवीकट्टा सदरात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांनी नाटकातही काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य हौशी स्पर्धेत भाग घेतलाय. त्यांनी ‘जलरंग तापी’ नाट्य संस्थेसोबत काम करत असताना ‘नटसम्राट’ नाटकात बूटपॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका साकारली होती. त्यांची ही भूमिका प्रचंड भाव खाऊन गेली होती. त्यांच्या अभिनयाने प्रभावित होऊन एका प्रेक्षकाने त्यांना खांद्यावर उचलून घेत नृत्य केलं होतं.

    खूप छोट्या गोष्टींमधून आनंद शोधावा, असं त्यांचं मत आहे. त्यांना पत्रकारितेसह वाचन, लेखनाची आवड आहे. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं वैयक्तिक आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.”… आणखी वाचा