“आमच्या हायकमांडच्या निर्देशांनुसार, राजेश अडूर यांची गटनेतेपदी निवड झाली आहे. तसं पत्र प्रदेश काँग्रेस कमिटीने विभागीय आयुक्तांना पाठवलं आहे. मेलही केलं आहे. हे सर्व काम आमचे प्रभारी कुणाल चौधरी यांच्या देखरेखेखाली होत आहे. आज पाच वाजेचा वेळ आयुक्तांनी दिलेला आहे. सर्व 27 नगरसेवक काँग्रेसचा गट तयार करण्यासाठी एकत्र येतील आणि उपस्थित राहतील आणि गट निर्माण करतील, असा निर्णय हायकमांडने घेतला आहे. त्यामुळे आता कुठलीही वादाची किंवा संभ्रमाची परिस्थिती शिल्लक राहिलेली नाही, असं माझं मत आहे”, असं वडेट्टीवार यांनी स्पष्ट केलं.
“आता काही घाई करुन उपयोग नाही. सध्या महापौर पदासाठी उमेदवारी अर्ज केला जात आहे. 10 तारखेला निवडणूक आहे. जनसुराज पार्टी काँग्रेससोबत आहे. त्यांनी अर्ज भरला असेल तरी ते अर्ज मागे घेतील. दुसरा उबाठाने फॉर्म भरला आहे. त्यांच्यासोबत चर्चा करुन मार्ग काढला जाईल. त्यांच्याबरोबर आम्ही चर्चा करतो आहोत. त्यामुळे अडचण येईल, अशी परिस्थिती नाही”, असंही वडेट्टीवार यांनी स्पष्ट केलं.
“उबाठासाठी सुद्धा पर्याय ठेवला आहे. स्टँडिंग कमिटीचं चेअरमनपद उबाठाला देता येईल. सत्तेचं वाटप बरोबर होईल. उबाठासोबत चर्चा सुरु आहे. त्यांनी आज फॉर्म भरला तरी आमच्या प्रदेशाध्यक्षांनी खासदार संजय राऊत यांच्याबरोबर बोलणं झालं असल्याचं सांगितलं आहे”, अशी प्रतिक्रिया विजय वडेट्टीवार यांनी दिली.