• Fri. Mar 6th, 2026

    Navi Mumbai Airport: 12 तासांऐवजी आता 24 तास उड्डाणे, नवी मुंबई विमानतळावर आजपासून सेवांचा विस्तार; एप्रिल महिन्यापर्यंत…

    Navi Mumbai Airport: 12 तासांऐवजी आता 24 तास उड्डाणे, नवी मुंबई विमानतळावर आजपासून सेवांचा विस्तार; एप्रिल महिन्यापर्यंत…

    NMIA News: नवी मुंबई विमानतळाची सुरूवात होऊन आता एक महिना उलटला असून, आजपासून विमानतळावर 24 तास विमान सेवा सुरू राहणार आहे. विमानतळाचा आता कसा विस्तार होईल ते जाणून घ्या…

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    नवी मुंबई: नवी मुंबई विमानतळ 25 डिसेंबरपासून प्रवाशांसाठी सुरू झालं होतं. त्यावेळी हे विमानतळ फक्त 12 तासांसाठी कार्यन्वित होतं, परंतु आज, म्हणजेच 1 फेब्रुवारीपासून 24 तास सुरू राहणार आहे. सकाळी 8 ते सायंकाळी 8 पर्यंत सुरू असलेलं विमानतळवर आता 24 तास विमानसेवा सुरू राहतील. यामुळे विमानतळावरील उड्डाणांची संख्या लवकरच वाढणार आहे.

    शेवटचं उड्डाण कधी?

    अद्याप रात्री उशिराच्या कोणत्याही विमानांचं वेळापत्रक निश्चित केलंलं नाही पण लवकरच मध्यरात्रीच्या सेवा ही सुरू करण्यात येतील. सध्या नवी मुंबई विमानतळावरील (Navi Mumbai Airport) शेवटचं विमान रात्री 9.50 ला उड्डाण घेणार असून, पहिलं उड्डाण सकाळी 7.10 वाजता होणार आहे. विमान वाहतूक उद्योगातील सूत्रांनी सांगितले की, उन्हाळी वेळापत्रक सुरू झाल्यावर आणखी विमानांची भर घातली जाईल. सध्या प्रतितास 10 विमानांची हालचाल असलेली संख्या येत्या एप्रिल महिन्यापर्यंत दुप्पत म्हणजेच, 20 होण्याची शक्यता आहे.Maharashtra TimesUnion Budget 2026: मुंबई-पुण्यासह प्रमुख शहरांना जोडणार 7 नव्या हाय-स्पीड ट्रेन, रेल्वे नेटवर्कचा विस्तार; अर्थमंत्र्यांची मोठी घोषणा

    सध्या केवळ दोनच विमानांची भर घालण्यात आली आहे, परंतु येत्या काही दिवसांत आणि आठवड्यांत विमान कंपन्या नवी मुंबईतील आपले वेळापत्रक वाढवतील अशी अपेक्षा आहे, असे सूत्रांनी सांगितले. मार्च महिन्याच्या अखेरीस, जेव्हा विमान कंपन्यांचे उन्हाळी वेळापत्रक सुरू होईल, तेव्हा विमानसेवेच्या संख्येत मोठी वाढ होण्याची शक्यता आहे.

    Maharashtra TimesCSMT Railway Station: आजपासून सीएसएमटी स्थानकावर ब्लॉक, 3 महिने ‘हे’ प्लॅटफॉर्म राहणार बंद; अनेक गाड्या दादर, ठाण्यापर्यंतच धावणार

    प्रवाशांना रात्रभर सेवा

    12 जानेवारी रोजी, नवी मुंबई विमानतळाने एक महत्त्वाचा परिचालन टप्पा पार केला होता. विमानतळ सुरू झाल्यापासून फक्त 19 दिवसांत तब्बल 1 लाख प्रवाशांनी प्रवास केला होता. युरोप आणि अमेरिकेत, प्रमुख विमानतळ वगळता, बहुतेक विमानतळे ध्वनी प्रदूषण मर्यादित करण्याच्या रात्रीच्या संचारबंदीच्या नियमांनुसार, सहसा रात्री 11 ते पहाटे 5 या वेळेत बंद होतात. ही विमानतळे बंद झाल्यावर अडकलेल्या प्रवाशांना टर्मिनल सोडावे लागते. परंतु, भारतातील प्रमुख विमानतळे 24 तास खुली राहतात. यामुळे विमानतळावर अडकलेल्या प्रवाशांना रात्रभर राहण्यासाठी एक सुरक्षित जागा मिळते.

    Navi Mumbai Airport : विमानतळाचं उद्घाटन पण ‘दिबां’च्या नावाची घोषणा नाही, कोण होते दि. बा. पाटील ?

    यापूर्वी, मंगळवारी राज्य मंत्रिमंडळाने छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाला एनएमआयए (NMIA) शी जोडणाऱ्या मेट्रो लाईन 8 च्या 35 किलोमीटर विस्ताराला मंजुरी दिली. ही मेट्रो लाईन 8 (Mumbai Metro 8) मुंबई आणि नवी मुंबई विमानतळाला थेट जोडणार आहे.

    सानिया कदम

    लेखकाबद्दलसानिया कदमसानिया कदम, मटा ऑनलाईनमध्ये कन्सल्टंट पदावर कार्यरत आहे. प्रामुख्याने क्राइम, सिव्हिक आणि पॉलिटिक्स या बातम्या कव्हर करते. याआधी सहा महिने महाराष्ट्र टाइम्स प्रिंटमध्ये कॉलेज क्लब रिपोर्टर म्हणून काम केले आहे. त्या काळात कॉलेज इव्हेंट्स, शैक्षणिक उपक्रम आणि सोशल मीडियावरील ट्रेंड्सवर बातम्या केल्या. मुलुंड वाणिज्य महाविद्यालयातून BMM मध्ये पदवी घेतल्यानंतर सध्या के.सी. महाविद्यालयात MA in Communication and Journalism करत आहे. इंटरनॅशनल घडामोडी आणि पॉप कल्चर हे विषय विशेष आवडीचे असून इंग्लिश आणि मराठी या दोन्ही भाषेत वाचन व लेखन करण्याची आवड आहे.… आणखी वाचा