• Mon. Jun 15th, 2026

    Vidyavihar Flyover: मुंबईतील वर्षानुवर्षे रखडलेला उड्डाणपूल अखेर मार्गी, पावसाळ्यापूर्वी पूर्ण; घाटकोपर, विद्याविहार… कुठून-कुठे जोडणार?

    Vidyavihar Flyover: मुंबईतील वर्षानुवर्षे रखडलेला उड्डाणपूल अखेर मार्गी, पावसाळ्यापूर्वी पूर्ण; घाटकोपर, विद्याविहार… कुठून-कुठे जोडणार?

    BMC New Flyover: मुंबईतील अनेक वर्षांपासून रखडलेल्या उड्डाणपूलाचे काम अखेर येत्या काही महिन्यांत पूर्ण होणार आहे. मुंबई महापालिकेच्या अधिकृत एक्स अकाऊंटवरून ही माहिती देण्यात आली. रेल्वे रूळांवरून बांधलेला हा पूल कसा असेल आणि कुठून-कुठे जोडेल ते पाहा

    (photos – bmc)(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    मुंबई: मुंबईतील महत्त्वाच्या रेल्वे स्थानकावरील उड्डाणपूलाचे काम अखेर पूर्णत्वाच्या दिशेने जात आहे. गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेलं हे काम आता वेगात सुरू असून, 2026 च्या पावसाळ्यापूर्वी मुंबईकरांना या पुलाचा वापर करता येणार आहे. हा उड्डाणपूल मुंबई महापालिकेच्या N विभागाच्या हद्दीत येतो.

    कसा असेल मार्ग?

    विद्याविहार पूर्व–पश्चिमेला जोडणाऱ्या या रेल्वेवरील उड्डाणपुलाच्या कामाची नुकतीच अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी पाहणी केली. त्यानंतर मुंबई महापालिकेने आपल्या अधिकृत ‘एक्स’ अकाऊंटवरून याबाबत माहिती दिली आहे. महापालिकेच्या माहितीनुसार, या उड्डाणपुलाचं संपूर्ण काम 25 जून 2026 पर्यंत पूर्ण करण्याचं उद्दिष्ट आहे. यातील पूर्वेकडील सर्व काम 28 फेब्रुवारी 2026 पर्यंत पूर्ण होणार असून, मान्सूनच्या पार्श्वभूमीवर 31 मे 2026 पर्यंत जास्तीत जास्त काम पूर्ण करण्याचं नियोजन करण्यात आलं आहे. पुलाची एक बाजू येत्या महिन्यात वाहतुकीसाठी खुली होण्याची शक्यता आहे.Maharashtra TimesVadhavan Airport: मुंबई शेजारीच उभारणार पहिलं समुद्रातील विमानतळ; 45 हजार कोटींचा खर्च; सी-लिंक, बंदराशी थेट जोडणी, कुठे होणार?

    हा विद्याविहार उड्डाणपूल घाटकोपर पूर्वेतील रामचंद्र चेंबूरकर मार्ग आणि पश्चिमेकडील लालबहादूर शास्त्री मार्ग (LBS Road) यांना थेट जोडणार आहे. रेल्वे रूळांवरून जाणाऱ्या या पुलावर दोन मार्गिका असून, तो एकूण 650 मीटर लांबीचा आहे. पूर्वेकडील बाजूचं काम सध्या अंतिम टप्प्यात असून, पोहोच मार्ग पूर्ण करणे, पुलाचं संपूर्ण पृष्ठीकरण आदी सर्व कामे 28 फेब्रुवारी 2026 पर्यंत पूर्ण केली जाणार आहेत. दरम्यान, पश्चिमेकडील बाजूला आतापर्यंत सहा खांबांची उभारणी पूर्ण झाली असून, उर्वरित चार खांब, पुलाचा आडवा अंतरभाग (स्पॅन) आणि पोहोच मार्गाची कामे प्रलंबित आहेत. ही कामे करताना वाहतूक वळविणे (डायव्हर्जन) हे मोठे आव्हान ठरत आहे.

    Pinky Mali : पिंकी माळीला अखेरचा निरोप देताना कुटुंबीयांच्या अश्रूंचा बांध फुटला

    कुठून-कुठे जोडणार?

    वाहतुकीवर कमीत कमी परिणाम होईल, यासाठी पुलाच्या दोन्ही बाजूंच्या रस्त्यांची कामे प्रथम पूर्ण करण्यात येणार आहेत. त्यानंतर बाधित निवासी व वाणिज्य बांधकामे हटविणे, तसेच रस्तारेषा (रोड अलाइनमेंट) नव्याने निश्चित करण्याची प्रक्रिया राबवली जाणार आहे. या टप्प्यांनंतर उड्डाणपुलाच्या उर्वरित कामांना मोठी गती मिळेल, अशी माहिती महापालिकेने दिली आहे. उल्लेखनीय म्हणजे, या उड्डाणपुलासाठी 1991 मध्ये प्रथम मागणी करण्यात आली होती. तब्बल तीन दशकांनंतर हा महत्त्वाचा प्रकल्प अखेर प्रत्यक्षात येत असून, घाटकोपर, विक्रोळी आणि विद्याविहार परिसरातील वाहतूक कोंडी कमी होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

    सानिया कदम

    लेखकाबद्दलसानिया कदमसानिया कदम, मटा ऑनलाईनमध्ये कन्सल्टंट पदावर कार्यरत आहे. प्रामुख्याने क्राइम, सिव्हिक आणि पॉलिटिक्स या बातम्या कव्हर करते. याआधी सहा महिने महाराष्ट्र टाइम्स प्रिंटमध्ये कॉलेज क्लब रिपोर्टर म्हणून काम केले आहे. त्या काळात कॉलेज इव्हेंट्स, शैक्षणिक उपक्रम आणि सोशल मीडियावरील ट्रेंड्सवर बातम्या केल्या. मुलुंड वाणिज्य महाविद्यालयातून BMM मध्ये पदवी घेतल्यानंतर सध्या के.सी. महाविद्यालयात MA in Communication and Journalism करत आहे. इंटरनॅशनल घडामोडी आणि पॉप कल्चर हे विषय विशेष आवडीचे असून इंग्लिश आणि मराठी या दोन्ही भाषेत वाचन व लेखन करण्याची आवड आहे.… आणखी वाचा