BMC New Flyover: मुंबईतील अनेक वर्षांपासून रखडलेल्या उड्डाणपूलाचे काम अखेर येत्या काही महिन्यांत पूर्ण होणार आहे. मुंबई महापालिकेच्या अधिकृत एक्स अकाऊंटवरून ही माहिती देण्यात आली. रेल्वे रूळांवरून बांधलेला हा पूल कसा असेल आणि कुठून-कुठे जोडेल ते पाहा
कसा असेल मार्ग?
विद्याविहार पूर्व–पश्चिमेला जोडणाऱ्या या रेल्वेवरील उड्डाणपुलाच्या कामाची नुकतीच अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी पाहणी केली. त्यानंतर मुंबई महापालिकेने आपल्या अधिकृत ‘एक्स’ अकाऊंटवरून याबाबत माहिती दिली आहे. महापालिकेच्या माहितीनुसार, या उड्डाणपुलाचं संपूर्ण काम 25 जून 2026 पर्यंत पूर्ण करण्याचं उद्दिष्ट आहे. यातील पूर्वेकडील सर्व काम 28 फेब्रुवारी 2026 पर्यंत पूर्ण होणार असून, मान्सूनच्या पार्श्वभूमीवर 31 मे 2026 पर्यंत जास्तीत जास्त काम पूर्ण करण्याचं नियोजन करण्यात आलं आहे. पुलाची एक बाजू येत्या महिन्यात वाहतुकीसाठी खुली होण्याची शक्यता आहे.
Vadhavan Airport: मुंबई शेजारीच उभारणार पहिलं समुद्रातील विमानतळ; 45 हजार कोटींचा खर्च; सी-लिंक, बंदराशी थेट जोडणी, कुठे होणार?
हा विद्याविहार उड्डाणपूल घाटकोपर पूर्वेतील रामचंद्र चेंबूरकर मार्ग आणि पश्चिमेकडील लालबहादूर शास्त्री मार्ग (LBS Road) यांना थेट जोडणार आहे. रेल्वे रूळांवरून जाणाऱ्या या पुलावर दोन मार्गिका असून, तो एकूण 650 मीटर लांबीचा आहे. पूर्वेकडील बाजूचं काम सध्या अंतिम टप्प्यात असून, पोहोच मार्ग पूर्ण करणे, पुलाचं संपूर्ण पृष्ठीकरण आदी सर्व कामे 28 फेब्रुवारी 2026 पर्यंत पूर्ण केली जाणार आहेत. दरम्यान, पश्चिमेकडील बाजूला आतापर्यंत सहा खांबांची उभारणी पूर्ण झाली असून, उर्वरित चार खांब, पुलाचा आडवा अंतरभाग (स्पॅन) आणि पोहोच मार्गाची कामे प्रलंबित आहेत. ही कामे करताना वाहतूक वळविणे (डायव्हर्जन) हे मोठे आव्हान ठरत आहे.
Pinky Mali : पिंकी माळीला अखेरचा निरोप देताना कुटुंबीयांच्या अश्रूंचा बांध फुटला
कुठून-कुठे जोडणार?
वाहतुकीवर कमीत कमी परिणाम होईल, यासाठी पुलाच्या दोन्ही बाजूंच्या रस्त्यांची कामे प्रथम पूर्ण करण्यात येणार आहेत. त्यानंतर बाधित निवासी व वाणिज्य बांधकामे हटविणे, तसेच रस्तारेषा (रोड अलाइनमेंट) नव्याने निश्चित करण्याची प्रक्रिया राबवली जाणार आहे. या टप्प्यांनंतर उड्डाणपुलाच्या उर्वरित कामांना मोठी गती मिळेल, अशी माहिती महापालिकेने दिली आहे. उल्लेखनीय म्हणजे, या उड्डाणपुलासाठी 1991 मध्ये प्रथम मागणी करण्यात आली होती. तब्बल तीन दशकांनंतर हा महत्त्वाचा प्रकल्प अखेर प्रत्यक्षात येत असून, घाटकोपर, विक्रोळी आणि विद्याविहार परिसरातील वाहतूक कोंडी कमी होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
