नाशिकहून निघालेला शेतकऱ्यांचा मोर्चा आता कसाऱ्यात पोहोचला आहे. हा मोर्चा मुंबईत धडकण्याआधी राज्य सरकारने अखिल भारतीय किसान सभेच्या शिष्टमंडळासोबत बैठक घेतली आहे. यावेळी राज्य सरकारने अनेक मागण्या मान्य केल्याची माहिती अखिल भारतीय किसान सभेकडून सांगण्यात आलं आहे.