• Sun. Mar 15th, 2026

    Sanjay Raut: इतके वाईट दिवस आलेले नाहीत, सत्ता…; एकनाथ शिंदेंच्या पाठिंब्यासंदर्भात संजय राऊत स्पष्टच बोलले

    Sanjay Raut: इतके वाईट दिवस आलेले नाहीत, सत्ता…; एकनाथ शिंदेंच्या पाठिंब्यासंदर्भात संजय राऊत स्पष्टच बोलले

    Sanjay Raut On Eknath Shinde: राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या नेतृत्वाखालील पक्षाशी युती करण्याच्या चर्चा फेटाळून लावल्या.

    sanjay raut(फोटो– महाराष्ट्र टाइम्स)
    मुंबई : एकनाथ शिंदेंचा पाठिंबा घ्यायचा की नाही, याबद्दल अंतिम निर्णय पक्षप्रमुख आणि पक्ष निर्णय घेतील. पण एक गोष्ट स्पष्ट आहे की, आम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये त्यांचा पाठिंबा घेणार नाही. शिवसेनेवर अद्याप इतके वाईट दिवस आलेले नाहीत. केवळ सत्तेत बसण्यासाठी आम्ही आमच्या तत्त्वांशी तडजोड करणार नाही’, असे शिवसेना (उबाठा) पक्षाचे नेते संजय राऊत यांनी शुक्रवारी स्पष्ट केले.

    राज्यातील महापालिका निवडणुकांचे निकाल लागल्यानंतर आता सत्ता स्थापनेसाठी आणि महापौरपदासाठी जोरदार रस्सीखेच सुरू आहे. ‘सत्ता मिळाली नाही म्हणून आमचा जीव तडफडत नाही. आम्ही सत्तेसाठी हपापलेले लोक नाहीत. भाजपला सत्तेची जी हाव सुटलेली आहे, ती आज संपूर्ण महाराष्ट्राला दिसतेय. ज्या पद्धतीने त्यांनी पैशांचा अफाट वापर करून निवडणुका लढवल्या आणि जिंकल्या, त्यावरून त्यांची लोकशाहीवरील निष्ठा दिसून येते’, असे राऊत म्हणाले.

    गद्दारांसोबत गेल्यावर किती खोके मिळणार? पण हा शिक्का मला नको, उद्धव ठाकरेंची फटकेबाजी

    राऊत यांनी यावेळी भाजपच्या राजकारणावर टीकास्त्र डागले. ‘आज जे राजकारण सुरू आहे, तो बाळासाहेबांचा विचार नक्कीच नव्हता. जेव्हा बाळासाहेबांना या भ्रष्ट राजकारणाची घृणा वाटू लागली, तेव्हा त्यांनी अत्यंत परखड भाषेत आपली नाराजी व्यक्त केली होती’, असे ते म्हणाले. राज्यातील विविध महापालिकांमध्ये सत्ताथापनेसाठी गणिते जुळवण्यात येत असून त्या पार्श्वभूमीवर विविध पक्षांचे गट एकत्र येत आहेत. त्यामुळे शिवसेना उबाठाची भूमिकाही निर्णायक ठरणाऱ्या ठिकाणांबाबत पक्षाकडून भूमिका स्पष्ट करण्यात आली आहे.

    Maharashtra Timesएक दिवस मी..; बाळासाहेबांचा निश्चय, समोर महाजन; राज ठाकरेंनी सांगितला किस्सा, ‘तो’ शब्द खरा ठरला
    मुंबईची दुर्दशा केल्याने पराभव
    शिवसेना-भाजप ही विकासासाठी युती आहे. त्यांच्यासारखी एखाद्याला खड्ड्यात घाल, दुसऱ्याला वर काढू, अशी आमची युती नाही. निवडणुकीत युती करून त्यांनी दुसऱ्याला खड्ड्यात घातले, असा टोला उपमुख्यमंत्री शिंदे यांनी लगावला. शिवसेनेचा अजेंडा सत्ता आणि खुर्चीचा नाही. त्यामुळेच मुंबईकरांनी आमच्यावर विश्वास ठेवला, असे ते म्हणाले. मुंबईकरांना २५ वर्षे खड्ड्यात घातल्यामुळे, प्रदूषण आणि भ्रष्टाचाराने मुंबईची दुर्दशा केल्यामुळेच त्यांचा महापालिका निवडणुकीत पराभव झाला, अशी टीका शिवसेना नेते व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना उबाठा पक्षावर केली. शिवसेना भाजप युती मजबूत असून मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर येथे महायुतीचाच महापौर बसेल, असेही शिंदे यांनी स्पष्ट केले.

    किशोरी तेलकर

    लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये ३ वर्षांपासून कन्सल्टंट म्हणून कार्यरत आहे.या आधी सकाळ मिडियामध्ये २ वर्ष कामाचा अनुभव आहे. चालू घडामोडी, गुन्हेगारी, राजकीय विषयांच्या बातम्यांत विशेष आवड.… आणखी वाचा