• Wed. Mar 11th, 2026
    राज साहेब, किती वेळा तुम्ही… मनसेबाहेर पडलेल्या संतोष धुरींचा बोचरा सवाल, थेट म्हणाले मनसेची चेष्टा झाली आणि…

    BMC Election Result Santosh Dhuri on Raj Thackeray : जागावाटपासाठी गोंधळ घातला, दुसऱ्यांना जिंकवण्यासाठी मनसेचा वापर केला, असं संतोष धुरी म्हणाले.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    मुंबई : मनसेची चेष्टा झाली, ठाकरे कुटुंब एकत्र आले, तरी सहाच जागा मिळाल्या, पण यापूर्वी महाराष्ट्र नवनिर्माण सेना आठ जागा जिंकली होती, अशा शब्दात भाजप नेते संतोष धुरी यांनी ठाकरे बंधूंच्या युतीवर शरसंधान साधले. महापालिका निवडणुकीच्या तोंडावर संतोष धुरी यांनी मनसेची साथ सोडून भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे.

    मनसेत असणाऱ्या आणि बाहेर पडणाऱ्या अनेकांनी भाजपच येणार याचे भाकित केले होते. मनसेची चेष्टा झाली, कुटुंब एकत्र आले तरी ६ जागा, यापूर्वी ८ जागा मनसे जिंकले होते. जागावाटपासाठी गोंधळ घातला, वापर करुन घेतला जातो आहे, दुसऱ्यांना जिंकवण्यासाठी मनसेचा वापर केला, असं संतोष धुरी म्हणाले.

    युती आघाडीत मनसेची वरळीतील १ जागा जिंकली नाही, जाणीवपूर्वक शिवसेनेच्या वतीने दुसरा उमेदवार दिला. माहीम, दादर येथे काय फरकाने जागा आल्या आहेत हे पहायला हवं, असंही धुरी म्हणाले. किती वेळा दुसऱ्यांना जिंकवून आणणार? म्हणजे राज ठाकरेंनी याच्या आधी ज्यांना ज्यांना मदत केली, त्यांना त्याचा फायदा झाला, परंतु मनसेला त्याचा फायदा झाला नाही, असंही संतोष धुरी म्हणाले.

    वापर झाल्याच्या नंतर गोष्टी टिकून राहतात का हे तुम्हीच ओळखावे. आता वापर करून झालेला आहे, असा इशारा संतोष धुरींनी ठाकरे बंधूंच्या युतीवर भाष्य करताना दिला.
    Maharashtra TimesBMC Election 2026 : …तर मुंबईत ठाकरेंनी भाजपला जेरीस आणलं असतं, तो ‘हात’ ठरला असता मदतीचा, मग कसा बदलला खेळ?

    इंजिनाची धाव मर्यादितच

    राज्यातील शाळांमध्ये करण्यात आलेल्या हिंदीसक्तीच्या निर्णयाला विरोध करण्याच्या निमित्ताने ठाकरे बंधू एकत्र आल्याने यंदाच्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या रेल्वे इंजिनाला शिवसेना उबाठाच्या ‘मशाल’च्या बळ प्राप्त झाले. मात्र पुन्हा या बळाचे रूपांतर मतांमध्ये करण्यास पक्षाला अपयश आल्याचे चित्र निवडणुकीच्या निकालात दिसून आले. या निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला अवघ्या सहाच जागा मिळविता आल्या. २०१७च्या तुलनेत पक्षाला एक जागा कमीच मिळाली.
    Maharashtra TimesUlhasanagar Municipal Corporation Election : आता काँग्रेस-वंचितची मदत घ्यावीच लागणार, शिवसेना-भाजपपुढे मोठा पेच, आकड्यांनी सगळा गेमच पालटला
    यंदाच्या निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून जवळपास ५२ जणांना निवडणुकीच्या रिंगणात उतरविण्यात आले होते. मात्र रात्री उशिरापर्यंत जाहीर झालेल्या निकालात पक्षाला केवळ सहा जागांवर यश मिळाले. यात पक्षाला पुन्हा एकदा मराठीबहुल भागांत यश मिळाले. ठाकरे बंधूची युती जवळपास जुलै महिन्यात झाली होती. त्यानंतर उर्वरित सात-आठ महिने दोन्ही पक्षांतील कार्यकर्त्यांची मने जुळवण्यात या पक्षांना फारसे यश आलेले नाही, असे मानले जाते.

    अनिश बेंद्रे

    लेखकाबद्दलअनिश बेंद्रेअनिश सतीश बेंद्रे, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये सहाय्यक वृत्त संपादक पदावर कार्यरत आहेत. गेल्या तीन वर्षांपासून ते मटासोबत काम करत आहेत. राजकीय, गुन्हेगारी आणि मनोरंजन या विषयातील बातम्यांमध्ये त्यांचा विशेष हातखंडा आहे. ब्रेकिंग न्यूजसोबतच निवडणूक विषयक विश्लेषण करण्यात त्यांना अधिक रस आहे. त्यांनी झेविअर्स कॉलेजमधून मास कम्युनिकेशनचे पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. आतापर्यंत एबीपी माझा, टीव्ही9 मराठीसह पत्रकारिता क्षेत्रात 12 वर्षांहून अधिक काळचा अनुभव त्यांना आहे… आणखी वाचा