“राज्यात देखील मेजोरीटीमध्ये महापालिकांमध्ये महायुतीचे महापौर होतील, एकंदरीत राज्यातलं वातावरण महायुतीच्या बाजूने राहिलं आहे. ठाणे, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर, मुंबई जिंकलं आहे. मुंबईत शिवसेनेने मोठी मुसंडी मारली आहे. मुंबईत चांगली सुरुवात झाली. महायुतीचा महापौर होईल. काही लोकांनी ही निवडणूक भावनेच्या आधारावर लढली आहे. तरीसुद्धा मतदारांनी महायुतीलाच निवडलं आहे.
गेल्या साडेतीन वर्षातील आमचं मुंबईतील काम, मी मुख्यमंत्री असताना, फडणवीसांचं मुख्यमंत्री म्हणून सुरु असलेलं काम, रस्ते, असतील किंवा अनेक थांबवलेली कामं यांना आम्ही चालना दिली.
Solapur SMC Election Results 2026: पालकमंत्र्यांना नडला आणि भाजप आमदाराला भिडला; सोलापुरात एकनाथ शिंदेंच्या शिलेदाराने ‘गड’ जिंकला!
25 वर्षे ज्या लोकानी मुंबईत सत्ता राबवली, त्यांच्या विरोधात मुंबईकरांनी मतदान केलं आहे. लोकांनी आता विकासाला स्विकारलं आहे. ज्यांनी विकासाला नाकारलं त्यांना मतदारांनीही नाकारलं आहे. डेव्हलपमेंट हा ब्रँड मुंबईकरांनी स्विकारला आहे, भ्रष्टाचाराचे मुद्दे लोकांसमोर आणले गेले तरी आम्ही सत्तेजवळ पोहोचलो आहेत”, असं शिंदे म्हणाले आहेत.
“आता मुंबईचा विकास ज्या जोरात व्हायला पाहिजे ते पाहता. आता केंद्रात, राज्यात, आणि आता मुंबई महापालिकेतही महायुतीचा महापौर होईल त्यामुळे आता चांगला विकास करता येईल. मुंबई हे जागतिक दर्जाचं शहर झालं पाहिजे असं मोदीजी सांगतात, तसं आता झालं पाहिजे, मुंबई जशी लोकांना हवी आहे.
मुंबई खड्डे मुक्त, प्रदुषण मुक्त, ट्रॅफिकमुक्त करण्यासाठी आता काम करता येईल. आम्ही अगोदरच याबद्दल काम करतो आहोत”, असंही यावेळी शिंदेंनी स्पष्ट केलं आहे.
