• Sun. Mar 8th, 2026
    BMC Election Result: मुंबई-ठाण्यात महायुतीची मुसंडी; एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया समोर, पिछाडीवर असलेल्या ठाकरेंबद्दल म्हणाले…

    मुंबई: आज मुंबईसह राज्यातील 29 महापालिकांचे निकाल जाहिर झाले आहेत. मुंबईत भाजप – शिंदे महायुतीला मोठं यश पाहायला मिळत आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे यांनी लाईव्ह येत त्यांची प्रतिक्रिया दिली आहे. “ठाण्यामध्ये मतदारांनी स्पष्ट बहुमत दिलं आहे. त्यासाठी मी ठाणेकरांना धन्यवाद देतो, मुंबईकरांनीही महायुतीला बहुमताचा जो आकडा लागतो तो दिला आहे. त्यासाठी मी मुंबईकरांनाही धन्यवाद देतो. मुंबई एमएमआरमध्येही महायुतीला चांगलं यश मिळताना दिसत आहे. मुंबईत आम्ही विकासाच्या नावावर या निवडणुका लढवल्या आणि जिंकलो,” अशा शब्दांत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांची पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

    “राज्यात देखील मेजोरीटीमध्ये महापालिकांमध्ये महायुतीचे महापौर होतील, एकंदरीत राज्यातलं वातावरण महायुतीच्या बाजूने राहिलं आहे. ठाणे, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर, मुंबई जिंकलं आहे. मुंबईत शिवसेनेने मोठी मुसंडी मारली आहे. मुंबईत चांगली सुरुवात झाली. महायुतीचा महापौर होईल. काही लोकांनी ही निवडणूक भावनेच्या आधारावर लढली आहे. तरीसुद्धा मतदारांनी महायुतीलाच निवडलं आहे.

    गेल्या साडेतीन वर्षातील आमचं मुंबईतील काम, मी मुख्यमंत्री असताना, फडणवीसांचं मुख्यमंत्री म्हणून सुरु असलेलं काम, रस्ते, असतील किंवा अनेक थांबवलेली कामं यांना आम्ही चालना दिली.

    Solapur SMC Election Results 2026: पालकमंत्र्यांना नडला आणि भाजप आमदाराला भिडला; सोलापुरात एकनाथ शिंदेंच्या शिलेदाराने ‘गड’ जिंकला!

    25 वर्षे ज्या लोकानी मुंबईत सत्ता राबवली, त्यांच्या विरोधात मुंबईकरांनी मतदान केलं आहे. लोकांनी आता विकासाला स्विकारलं आहे. ज्यांनी विकासाला नाकारलं त्यांना मतदारांनीही नाकारलं आहे. डेव्हलपमेंट हा ब्रँड मुंबईकरांनी स्विकारला आहे, भ्रष्टाचाराचे मुद्दे लोकांसमोर आणले गेले तरी आम्ही सत्तेजवळ पोहोचलो आहेत”, असं शिंदे म्हणाले आहेत.

    “आता मुंबईचा विकास ज्या जोरात व्हायला पाहिजे ते पाहता. आता केंद्रात, राज्यात, आणि आता मुंबई महापालिकेतही महायुतीचा महापौर होईल त्यामुळे आता चांगला विकास करता येईल. मुंबई हे जागतिक दर्जाचं शहर झालं पाहिजे असं मोदीजी सांगतात, तसं आता झालं पाहिजे, मुंबई जशी लोकांना हवी आहे.

    मुंबई खड्डे मुक्त, प्रदुषण मुक्त, ट्रॅफिकमुक्त करण्यासाठी आता काम करता येईल. आम्ही अगोदरच याबद्दल काम करतो आहोत”, असंही यावेळी शिंदेंनी स्पष्ट केलं आहे.

    सुनिल लाटे

    लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे, हे एक पत्रकार आहेत. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ येथून बी.ए व एम.ए. पत्रकारितेचं पदव्यूत्तर शिक्षण पूर्ण केलं आहे. कॉलेज जीवनातच ‘दैनिक दिव्य मराठी’मध्ये पत्रकारितेचं प्रत्यक्ष प्रशिक्षण घेतलं आहे. दोन वर्षे ‘लोकसत्ता डॉट कॉम’साठी ‘फोटोगॅलरी व वेबस्टोरी’ या विभागात काम केलं आहे. ते ६ ऑक्टोबर २०२५ पासून ‘महाराष्ट्र टाईम्स’ ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. राजकारण, मनोरंजन, क्रीडा या विषयांच्या लिखाणात आवड आहे. याशिवाय काव्य लेखन, गीत लेखन आणि सादरीकरणातही स्वारस्य आहे. फोटोग्राफी, फोटो, व्हिडिओ संपादनातही खास रस आहे… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed