भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड (बीईएल) या कंपनीद्वारे निर्मित ईव्हीएममध्ये तांत्रिक अडचण आल्यास पाडु या यंत्राचा वापर करून निकाल पाहण्याची सुविधा उपलब्ध आहे. मात्र, पाडुचा सरसकट वापर केला जाणार नाही, असे निवडणूक आयोगाने बुधवारी स्पष्ट केले.
पाडुविषयी राजकीय पक्षांनी आक्षेप घेत ऐनवेळी या अतिरिक्त यंत्रणेविषयी सांगण्यात आल्याचा आरोप केला आहे. मात्र, याविषयी राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींना आधीच माहिती देण्यात आली होती, असे आयोगाचे म्हणणे आहे.
Rohan Deshpande : मनसे-ठाकरेंसोबत आंदोलन, ‘कमळा’ची बदनामी, भाजपच्या बड्या नेत्याची पक्षातून हकालपट्टी
भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडची मतदान यंत्रे केवळ मुंबई महानगरपालिका निवडणुकांसाठीच वापरली जात आहेत. ही यंत्रे भारत निवडणूक आयोगाची असून ती ‘एम३ए’ या प्रकाराची आहेत. त्यात झालेल्या मतदानाची मतमोजणी कंट्रोल युनिटला (सीयू) बॅलेट युनिट (बीयू) जोडूनच करावी, फक्त तांत्रिक अडचण आली तरच अत्यंत अपवादात्मकरित्या पाडुचा वापर करावा, असे आयोगाचे आदेश आहेत.
Manoj Jarange | राज-उद्धव ठाकरेंना पाठिंबा? महापालिका निवडुकीबाबत मनोज जरांगेंचा मोठा खुलासा
मुंबई महानगरपालिका निवडणुकांसाठी १४० पाडुंची उपलब्धता करून देण्यात आली आहे. पाडुच्या वापराबाबत महापालिका प्रशासनाकडून राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींना प्रात्यक्षिके याआधी दाखविण्यात आली आहेत.
दरम्यान, पाडु यंत्रणा आणल्याबद्दल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेयांनी बुधवारी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली. ही यंत्रणा नेमकी काय आहे, निवडणूक आयोगाने हे मशिन कोणलाही दाखविले नाही, यामध्ये मतदानाचे फेरफार होणार नाही, याची शाश्वती कोण देणार, असा संतप्त प्रश्न राज ठाकरे यांनी केला.
BMC Election : दहा वाजता मतमोजणी, एका वेळी दोनच प्रभागांचं Counting, कोणकोणत्या उमेदवारांचे निकाल लांबणार?
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी बुधवारी राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ निवासस्थानी सहकुटुंब भेट दिली. तेथून दोन्ही ठाकरे बंधू कुटुंबासह एकत्रितपणे मुंबादेवीच्या मंदिराकडे रवाना झाले. यावेळी रश्मी ठाकरे, शर्मिला ठाकरे, जयवंती ठाकरे, आदित्य, अमित, उर्वशी यांच्यासह खासदार संजय राऊत, अरविंद सावंत, मनसेचे नेते बाळा नांदगावकर आदी उपस्थित होते.
