• Sat. Mar 7th, 2026

    मी मुंबईत येतोय, माझे पाय…; राज ठाकरेंना भाजपच्या अण्णामलाई यांचं ओपन चॅलेंज, वाद पेटणार

    मी मुंबईत येतोय, माझे पाय…; राज ठाकरेंना भाजपच्या अण्णामलाई यांचं ओपन चॅलेंज, वाद पेटणार

    मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप नेते के. अण्णामलाई यांनी मुंबई महाराष्ट्राची नसून आंतरराष्ट्रीय शहर असल्याचे विधान केले होते. यावर राज ठाकरे यांनी तीव्र आक्षेप घेत अण्णामलाई यांना लक्ष्य केले.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    चेन्नई/मुंबई: मुंबई महापालिका निवडणूक अवघ्या काही दिवसांवर आली आहे. मनसे प्रमुख राज ठाकरे यांना भाजपचे नेते के. अण्णामलाई यांचा समाचार घेतला. मुंबई महाराष्ट्राची नसून ते आंतरराष्ट्रीय शहर असल्याचं विधान अण्णामलाई यांनी केलं होतं. या विधानाचा समाचार राज ठाकरे यांनी त्यांच्या शैलीत शिवतीर्थावरील सभेतून घेतला. यानंतर आता अण्णामलाई यांनी राज ठाकरेंना आव्हान दिलं आहे. त्यामुळे अण्णामलाई विरुद्ध ठाकरे वाद आणखी तापण्याची शक्यता आहे.

    मी मुंबईला नक्की जाणार. हिंमत असेल तर माझे पाय कापून दाखवा, असं खुलं आव्हान अण्णामलाई यांनी दिलं आहे. चेन्नईत माध्यमांशी बोलताना अण्णामलाई यांनी राज यांना उघड आव्हान दिलं. मला धमकी देणारे राज ठाकरे, आदित्य ठाकरे कोण? असा सवाल अण्णामलाई यांनी विचारला. मी शेतकऱ्याचा मुलगा आहे आणि अशा धमक्यांना घाबरत नाही, असं अण्णामलाई म्हणाले.
    Maharashtra Timesभाजप-MIMचे सूर पुनश्च जळले, युतीचे धागे पुन्हा विणले; पाच जणांचा पाठिंबा अन् गेम झाला
    मुंबईतील शिवतीर्थावर झालेल्या सभेत राज ठाकरे यांनी अण्णामलाई यांचा उल्लेख रसमलाई असा केला. यानंतर मनसेच्या काही समर्थकांनी अण्णामलाई यांना मुंबईत येण्याचं आव्हान दिलं. अण्णामलाई मुंबईत आले, तर त्यांचे पाय कापू, असा थेट इशारा मनसैनिकांकडून देण्यात आला. अशा धमक्या म्हणजे अज्ञान असल्याचं अण्णामलाई म्हणाले. जर मी घाबरत असतो, तर माझ्या गावालाच राहिलो असतो. मुंबई एक जागतिक शहर असल्याचं मी म्हणालो होतो. माझ्या विधानाचा विपर्यास करण्यात आला, असा दावा त्यांनी केला.
    Maharashtra Timesलेक है तो सेफ है! शिंदेंच्या पुत्राचा भाजपला धोबीपछाड; हायव्होल्टेज निवडणुकीत जोरदार धक्का
    राज ठाकरेंनी त्यांच्या भाषणात अण्णामलाई यांना लक्ष्य केलं. राज ठाकरेंनी बाळासाहेब ठाकरे यांनी १९६०-७० च्या दशकात दिलेल्या हटाओ लुंगी, बजाओ पुंगी घोषणेचा उल्लेख केला. ‘काल परवा मुंबईत तमिळनाडूवरुन एक रसमलाई आली होती. तो विचारतो, मुंबई आणि महाराष्ट्राचा संबंध काय? अरे तुझा काय संबंध इथे यायचा? यांच्यासाठीच माननीय बाळासाहेब बोलले होते, हटाओ लुंगी आणि बजाओ पुंगी,’ असं राज ठाकरे यांनी म्हटलं. यानंतर शिवतीर्थावर जमलेल्या हजारोंच्या गर्दीनं त्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

    कुणाल गवाणकर

    लेखकाबद्दलकुणाल गवाणकर“कुणाल किशोर गवाणकर, महाराष्ट्र टाईम्समध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. राज्य आणि राष्ट्रीय पातळीवरील राजकीय घडामोडींच्या बातम्या आणि त्यांचे विविध पैलू उलगडणारं लिखाण करण्यात हातखंडा. ब्रेकिंग न्यूज सोबतच राजकीय घडामोडींमधील बारकावे टिपून इनसाईड माहितीच्या आधारे सखोल विश्लेषण करणारं लिखाण करण्यात निष्णात. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील रंजक घटना आणि घडामोडींवर लिखाण.
    तीन वर्षांपासून महाराष्ट्र टाइम्समध्ये कार्यरत. त्याआधी लोकमत ऑनलाइन, लोकसत्ता ऑनलाइनमध्ये काम. न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 वृत्तवाहिन्यांमध्ये कामाचा अनुभव. पत्रकारितेत 14 वर्षांपासून कार्यरत.”
    … आणखी वाचा