• Tue. Mar 10th, 2026
    Aditya Thackeray: आदित्य ठाकरेंनी केली फडणवीसांची नक्कल; बांगलादेशींच्या मुद्द्यावरून मुख्यमंत्र्यांना सुनावलं

    मुंबई: मनसे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षांची आज मुंबईत शिवाजी पार्क मैदानावर एकत्रित सभा पार पडत आहे. या सभेत मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना उबाठा प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या भाषणाआधी आदित्य ठाकरेंनी त्यांची तोफ डागली. त्यांनी यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना चांगलच लक्ष केलं आहे.

    जय महाराष्ट्र, असं म्हणत आदित्य ठाकरेंनी त्यांच्या भाषणाला सुरुवात केली. उद्धव साहेब आणि राजसाहेब हे शिवतिर्थावरुन मुंबईसाठी एकत्रपपणे बोलणार आहेत.त्यामुळे हा क्षण मुंबईसाठी ऐतिहासिक आहे. ही निवडणूक महत्वाची तर आहेच, ही मुंबईची निवडणूक महाराष्ट्राची आहे, अस्मितेची आहेच पण याच्यापलिकडेही जाऊन ही निवडणूक गटर, वॉटर- मिटर याच्याबद्दल आहे, मतदारराजाने याच्याशिवाय इतर कोणत्याही गोष्टीकडे लक्ष देऊ नये, असं आदित्य ठाकरे म्हणाले आहेत.

    पुढे बोलताना ते म्हणाले की, भाजपवाल्यांचा प्रचार पाहा, आपल्यात आणि त्यांच्यातला फरक स्पष्ट दिसेल, आपण करुन दाखवलंचे होर्डींग लावले आहेत. तो आपला रेकॉर्ड आहे.2002 असेल,2007 असेल,2012 असेल,2017 असेल आणि ही निवडणूक देखील आपण करुन दाखवलेल्या कामांवर लढत आहोत.

    Uddhav Thackeray: शिवाजी पार्कच्या सभेत उद्धव ठाकरेंनी काढला अजित पवारांचा विषय, म्हणाले, ‘तर… त्यांची माफी मागा’

    पुढचा जो टप्पा आहे, शब्द ठाकरेंचा. या मुंबईमध्ये आपण काय करणार आहोत. त्याच्यावर बोलतोय. पण भाजपचे होर्डींग आपण पाहिलेत का? त्यांच्या होर्डींगवर दोन चेहरे आहेत.प्रधानमंत्री आणि मुख्यमंत्री असतील त्यांचं या मुंबई किंवा महाराष्ट्राला काय योगदान आहे, कोणी सांगू शकतं का? झिरो. असं आदित्य ठाकरे म्हणाले आहेत.

    अरे असं कसं तुम्ही बोलता. गिफ्टसिटी मुंबईतून गुजरातला नेली कोणी, आहे का नाही योगदान. इथून उद्योगधंदे गुजरातला नेले कोणी, आहे का नाही योगदान. आपला सामान्य माणूस मग जातपात न पाहता, मराठी- अमराठी न पाहता जी परवडणाऱ्या दरात बेस्ट सेवा आपण मुंबईकरांना, लोकांना देत होतो. त्यांचं खाजगीकरण करायच काम कोणी केलं, भाजप आणि मिंदेंनी केलेलं आहे. आहे की नाही योगदान. हे करणाऱ्यांना तुम्ही मतदान देणार आहेत का? हा निर्णय तुमचा असणार आहे. तुम्ही ठरवू शकता. निर्णय 29 शहरांचा असणार आहे. शिवसेना, मनसे, आणि राष्ट्रवादी काँग्रेस ही शिवशक्ती ठोस कृती घेऊन पुढे चाललो आहोत. आपण आतापर्यंतच्या कामावर निवडणुका लढवत आहोत आणि जिंकत आलेलो आहोत.

    मनसेचं पाहायला गेलं तर राजसाहेब भाषण करतात अन् नाशिकचा उल्लेख करतात तेव्हा 2012 ते 2017 नाशिकचा विकास हा त्यांनी लक्ष घालून केला आहे. त्यांच्या डोळ्यात पाहिलं तर एक प्रेम दिसतं. पण दुसऱ्या बाजूला भाजपा आहे. गेल्या 3 वर्षांमध्ये आपण पाहिलं आहे, लूट, लूट, लूट, भ्रष्टाचार, भ्रष्टाचार, भ्रष्टाचार. अमूक बोला, तमूक बोला.

    परवाकडे माझा एक तो व्हिडिओ खूप वायरल झाला. आज पण मला लोक बोलत होती, की तुम्ही परत त्यांच्यासारखं बोलणार का. मी बोललो कदाचित नसेनचा प्रॉब्लेम होईल. पण प्रयत्न करूया. कारण ते आवाज सगळीकडे घुमणार आहे तुमच्या व्हॉट्सअॅपवर.

    ‘एकच विषय घेतात. कुठेही गेलं की. आमची मुंबईमध्ये सत्ता येणार. आणि सत्ता आल्यानंतर अध्यक्ष महोदय, मोदी साहेब, आम्ही इथून बांगलादेशींना काढणार, ये जलवा है मेरा, मै आऊंगा.. काय चाललय हो. कशासाठी हे सगळं. मुख्यमंत्री महोदय, तुम्ही मुख्यमंत्री सात वर्ष या राज्याचे आहात, हे विसरू नका. तुम्ही या महाराष्ट्राचे गृहमंत्री गेल्या 12 वर्षांमधून दहा वर्षे तुमच्याच हातात गृहखात राहिलेला आहे. हे कर्तव्य बांगलादेशींना ओळखण आणि काढण्याचं, हे दहा वर्ष तुमच्या हातात होतं, ही जिम्मेदारी ही जबाबदारी तुमच्या हातात होती. जर तुम्ही तिथे चुकला असाल तर सरळ सरळ येऊन सांगा. आम्ही चुकलो. अजूनही आम्हाला बांगलादेशी सापडलेले नाहीत, आणि ही निवडणूक त्याच्याबद्दल नाहीच आहे’, असं म्हणतं आदित्य ठाकरेंनी यावेळी मुख्यमंत्री फडणवीसांची मिमिक्रीही केलेली पाहायला मिळाली.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *