Indiranagar tunnel: नाशिकमधील राष्ट्रीय महामार्गावरील एक महत्त्वाचा बोगदा नोव्हेंबरमध्ये कामांसाठी बंद करण्यात आला होता. या मार्गावर भुयारी बोगद्याचं काम सुरू होतं. हे काम आता अंतिम टप्प्यात पोहचलं असून, वाहतूक कोंडी फोडण्यासाठी रॅम्पसुद्धा उभारला जात आहे. हे काम कधी पूर्ण होणार?
शहरातील वाहतूक कोंडीच्या समस्येसंदर्भात ‘मटा’ने सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर ‘कोंडीचे जंक्शन’ सुरळीत करण्यासाठी पोलिस, महापालिका, न्हाई या यंत्रणादेखील सरसावल्या आहेत. द्वारकाच्या समस्यामुक्तीसाठी सर्कल हटविल्यानंतर सारडा सर्कल ते काठे गल्लीपर्यंत नव्याने भुयारी मार्ग (ग्रेड सेप्रेटर) उभारून वाहनांना जागा करून देण्यात येणार आहे.
Atal Setu-Coastal Road: अटल सेतू-कोस्टल रोड कनेक्टर जवळपास पूर्ण; मुंबई-नवी मुंबई विमानतळ थेट जोडणार, मात्र ‘या’ कारणामुळे काम रखडले
कुठून-कुठे जोडणार?
दरम्यान, इंदिरानगर व गोविंदनगरमधील रस्त्यांसह शहराच्या दोन मुख्य भागांना जोडणाऱ्या इंदिरानगर बोगद्यातील वाहतूक कोंडी महत्त्वाची समस्या आहे. अरुंद बोगद्यासह महामार्गामुळे तेथील कोंडीत घट होण्याऐवजी वाढ होत आहे. पावसाळ्यात हमखास दोन्ही बाजूंची वाहतूक ठप्प होण्यासही बोगदा कारण ठरत आहे. त्यामुळे बोगद्याच्या रुंदीकरणासह तेथे दोन लहान पूलही उभारण्यात येत आहेत. इंदिरानगर येथेही बोगदा काहीसा रुंद झाल्यावर सर्व्हिसरोडपर्यंत येईल. त्यावर पूल उभारला जाईल. त्यामुळे ज्यांना थेट मुंबई नाका व पाथर्डी फाट्याच्या दिशेने जायचे आहे, ते पुलावरून जातील, असे ‘न्हाई’च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.
भाजप आणि शिंदे गट उद्धव साहेबच सांभाळतात की काय वाटतं; ठाकरेंच्या रणरागिणीचं तुफान भाषण
कधी होणार पूर्ण?
राणेनगर येथील बोगद्याचे रुंदीकरण पूर्ण झाले असून बोगद्यानंतर आता ‘रॅम्प’ उभारणीचे काम सुरू करण्यात आले आहे. राणेनगरमधील हा रॅम्प सध्या अंतिम टप्प्यात असून संपूर्ण प्रकल्पाचे काम फेब्रुवारीअखेरपर्यंत सुरू राहणार आहे. दरम्यान, इंदिरानगर बोगद्याच्या एका बाजूचे रुंदीकरण अंतिम टप्प्यात आले आहे. दोन्ही बाजूंच्या बोगद्याचे रुंदीकरण पूर्ण झाल्यानंतर येथेही ‘रॅम्प’ उभारणी करण्यात येणार असून इंदिरानगरमधील संपूर्ण काम मेअखेरपर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे.
