Mumbai Fire Tragedy: शनिवारी पहाटे 3 च्या सुमारास एका घरात भीषण आग लागली असून, या आगीत घरात झोपलेल्या तिघांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये 12 वर्षीय मुलाचाही समावेश आहे. पहटे ही आग नेमकी कशामुळे लागली हे पाहा…
कशामुळे लागली आग?
मिळालेल्या माहितीनुसार, ही आग ग्राउंड+1 मजली इमारतीत लागली होती. जमिनीवरील विद्युत वायरिंग व घरगुती साहित्याला आग लागल्यानंतर ती झपाट्याने पसरली आणि पहिल्या मजल्यावरील कपड्यांपर्यंत पोहोचली. आग लागली त्यावेळी घरातील तिघेही झोपेत असल्याने त्यांना बाहेर पडण्याची संधी मिळाली नाही. आगीची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचण्यापूर्वीच स्थानिक रहिवाशांनी पाण्याच्या बादल्यांच्या सहाय्याने आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, घटनेची माहिती मुंबई अग्निशमन दलाला देण्यात आली.
Atal Setu-Coastal Road: अटल सेतू-कोस्टल रोड कनेक्टर जवळपास पूर्ण; मुंबई-नवी मुंबई विमानतळ थेट जोडणार, मात्र ‘या’ कारणामुळे काम रखडले
तिघांचाही अंत
मुंबई अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी पोहोचताच तत्काळ वीजपुरवठा बंद करून आग नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न सुरू केला. अग्निशमन दलाच्या अथक प्रयत्नांनंतर पहाटे 3 वाजून 16 मिनिटांनी आग पूर्णतः विझवण्यात आली, अशी माहिती मुंबई अग्निशमन दलाकडून देण्यात आली आहे. दरम्यान, घरात अडकलेल्या तीन जणांना अग्निशमन दलाच्या जवानांनी बाहेर काढले आणि त्यांना तातडीने पोलीस वाहन व खासगी वाहनाच्या सहाय्याने गोरेगाव येथील ट्रॉमा केअर रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, रुग्णालयातील आरएमओ डॉ. मोईन यांनी तपासणीनंतर तिघांनाही मृत घोषित केले.
या भीषण आगीत घरातील हर्षदा पावसकर (वय 19 वर्षे), कुशल पावसकर (वय 12 वर्षे) आणि संजोग पावसकर (वय 48 वर्षे) मृत्यू झाला आहे. अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, तिघांनाही गंभीर भाजल्याच्या जखमा झाल्या होत्या. या भीषण दुर्घटनेनंतर परिसरात शोककळा पसरली असून स्थानिक नागरिकांनी हळहळ व्यक्त केली आहे. एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाल्याने परिसरात शोकमय वातावरण आहे.
धारावी लुटू द्यायची नाही, अदानीस्तान करू द्यायचं नाही; भाजपविरोधात आदित्य ठाकरेंची तोफ धडाडली
दरम्यान, आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसले तरी प्राथमिक तपासात विद्युत वायरिंगमधूनच आग लागल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. या घटनेप्रकरणी पुढील तपास सुरू असून संबंधित यंत्रणांकडून सविस्तर चौकशी करण्यात येत आहे.
