Mumbai Footbridge in Danger : मुंबईतील आणखी एक पादचारी पूल धोकादायक स्थितीत असल्याची तक्रार तेथील नागरिकांनी केली आहे. या पुलावर तुटलेल्या पायऱ्या, खाली कचऱ्याचा ढिग साचला आहे.
माटुंगा पूर्व आणि पश्चिमेला जोडणारा महत्त्वाचा इंटरचेंज
किंग्ज सर्कलजवळील या जुन्या पुलाचे जिने अतिशय खराब स्थितीत आहेत. तसेच जुने धोकादायकरित्या वर-खाली तुटलेले आहेत. त्यामुळे चालताना पूल अतिशय उंच वाटतो. तुटलेल्या, वर-खाली असलेल्या पायऱ्यासह सुरक्षेसाठी असलेले रेलिंगही धोकादायक, तुटलेल्या स्थितीत आहेत. अशा परिस्थिती पूल नव्या उभारण्याची किंवा किमान आहे त्या स्थितीत त्याला दुरुस्त करण्याची आवश्यकता आहे. या भागात राहणाऱ्या रहिवाशांनी या धोकादायक पुलाबाबत अनेकदा तक्रार केल्याचं सांगितलं. अनेकदा तक्रार देऊनही अद्याप कोणतीही कारवाई झाली नसल्याचं येथील लोकांचं म्हणणं आहे.
ST Bus : ग्रुपसोबत लांबच्या सहलीला जायचंय? एसटीमधून स्वस्तात फिरण्याची संधी, महाराष्ट्राबाहेरही जाता येणार, कुठे संपर्क कराल?
पूल धोकादायक स्थितीत, कचऱ्याचं साम्राज्य
रहिवाशांनी पुलाजवळ कचऱ्याचं साम्राज्य पसरलं आहे. रहिवाशांनी कचरा आणि माती-सिमेंटचा ढिगारा असल्याच्या समस्या देखील निदर्शनास दिल्या. पुलाच्या दोन्ही टोकाला विशेषतः माटुंगा पूर्वेकडील बाजूला वाळलेली पानं, जंगली वनस्पती उगवल्या आहेत. त्यामुळे चालताना हा पूल अतिशय अरुंद होतो. शिवाय पावसाळ्यात पूल निसरडा होत असल्याने धोकादायक ठरतो.
Ajit Pawar Speech | तिसरी अर्थव्यवस्था होणार सगळं ठीक मात्र इकडे इमारती, पूल पडतात त्याचं काय?
माटुंगा पूर्व आणि पश्चिमेला जोडणारा हा महत्त्वाचा पूल आहे. इतका महत्त्वाचा इंटरचेंज असूनही याकडे प्रशासनाचं दुर्लक्ष असून रहिवाशांच्या तक्रारींकडेही पाहिलं जात नाही. किमान पूल चालण्यायोग्य करा, योग्य देखभाल करा अशी विनंती येथील नागरिकांकडून केली जात आहे. या पुलाचा मुद्दा पुढे आल्यानंतर आता रेल्वे अधिकाऱ्यांकडून याला अधिकृत उत्तर देण्यात आलं आहे. अधिकाऱ्यांकडून पुलाची पाहाणी केली जाईल. तसंच पुलाचं मूल्यांकन करण्यासाठीही एक पथक पाठवलं जाईल अशी माहिती देण्यात आली आहे.
