• Tue. Jun 16th, 2026
    Mumbai News : मुंबईतील आणखी एका पुलाची दुरावस्था; तुटलेल्या पायऱ्या, कचऱ्याचा ढिग… धोकादायक स्थितीत शाळकरी मुलं, वृद्धांची ये-जा

    Mumbai Footbridge in Danger : मुंबईतील आणखी एक पादचारी पूल धोकादायक स्थितीत असल्याची तक्रार तेथील नागरिकांनी केली आहे. या पुलावर तुटलेल्या पायऱ्या, खाली कचऱ्याचा ढिग साचला आहे.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    मुंबई : मुंबईत दररोज मोठ्या प्रमाणात पादचाऱ्यांकडून वापरला जाणारा महत्त्वाचा पूल धोकादायक असल्याचं समोर आलं आहे. भाऊ दाजी रोड ते माटुंगा पश्चिमेला किंग्ज सर्कलजवळ जोडणारा पादचारी पूल हा अतिशय जुना पूल आहे. या पुलावरुन शाळेत जाणारी मुलं, ज्येष्ठ नागरिक मोठ्या प्रमाणात ये-जा करतात. मात्र सतत वापराता असलेला हा पूल सुरक्षेच्यादृष्टीने धोकादायक बनला आहे.

    माटुंगा पूर्व आणि पश्चिमेला जोडणारा महत्त्वाचा इंटरचेंज

    किंग्ज सर्कलजवळील या जुन्या पुलाचे जिने अतिशय खराब स्थितीत आहेत. तसेच जुने धोकादायकरित्या वर-खाली तुटलेले आहेत. त्यामुळे चालताना पूल अतिशय उंच वाटतो. तुटलेल्या, वर-खाली असलेल्या पायऱ्यासह सुरक्षेसाठी असलेले रेलिंगही धोकादायक, तुटलेल्या स्थितीत आहेत. अशा परिस्थिती पूल नव्या उभारण्याची किंवा किमान आहे त्या स्थितीत त्याला दुरुस्त करण्याची आवश्यकता आहे. या भागात राहणाऱ्या रहिवाशांनी या धोकादायक पुलाबाबत अनेकदा तक्रार केल्याचं सांगितलं. अनेकदा तक्रार देऊनही अद्याप कोणतीही कारवाई झाली नसल्याचं येथील लोकांचं म्हणणं आहे.
    Maharashtra TimesST Bus : ग्रुपसोबत लांबच्या सहलीला जायचंय? एसटीमधून स्वस्तात फिरण्याची संधी, महाराष्ट्राबाहेरही जाता येणार, कुठे संपर्क कराल?

    पूल धोकादायक स्थितीत, कचऱ्याचं साम्राज्य

    रहिवाशांनी पुलाजवळ कचऱ्याचं साम्राज्य पसरलं आहे. रहिवाशांनी कचरा आणि माती-सिमेंटचा ढिगारा असल्याच्या समस्या देखील निदर्शनास दिल्या. पुलाच्या दोन्ही टोकाला विशेषतः माटुंगा पूर्वेकडील बाजूला वाळलेली पानं, जंगली वनस्पती उगवल्या आहेत. त्यामुळे चालताना हा पूल अतिशय अरुंद होतो. शिवाय पावसाळ्यात पूल निसरडा होत असल्याने धोकादायक ठरतो.

    Ajit Pawar Speech | तिसरी अर्थव्यवस्था होणार सगळं ठीक मात्र इकडे इमारती, पूल पडतात त्याचं काय?

    माटुंगा पूर्व आणि पश्चिमेला जोडणारा हा महत्त्वाचा पूल आहे. इतका महत्त्वाचा इंटरचेंज असूनही याकडे प्रशासनाचं दुर्लक्ष असून रहिवाशांच्या तक्रारींकडेही पाहिलं जात नाही. किमान पूल चालण्यायोग्य करा, योग्य देखभाल करा अशी विनंती येथील नागरिकांकडून केली जात आहे. या पुलाचा मुद्दा पुढे आल्यानंतर आता रेल्वे अधिकाऱ्यांकडून याला अधिकृत उत्तर देण्यात आलं आहे. अधिकाऱ्यांकडून पुलाची पाहाणी केली जाईल. तसंच पुलाचं मूल्यांकन करण्यासाठीही एक पथक पाठवलं जाईल अशी माहिती देण्यात आली आहे.

    करिश्मा भुर्के

    लेखकाबद्दलकरिश्मा भुर्केकरिश्मा भुर्के, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये सिनीअर डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. सामना, झी २४ तास, न्यूज १८ लोकमतसह ७ वर्ष पत्रकारिता क्षेत्रातील अनुभव. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयसह, सामाजिक, गाव-खेड्यातील विविध विषयांवर लेखनाची आवड. मागील ३ वर्षांपासून महाराष्ट्र टाइम्समध्ये कार्यरत. जोशी-बेडेकर कॉलेजमधून बॅचलर ऑफ मास मीडियाची पदवी, त्यानंतर साठे महाविद्यालयातून मास्टर्स इन जर्नालिजमचं शिक्षण पूर्ण केलं आहे.… आणखी वाचा