Kalyan Daughter in Law Murder : ऐन निवडणुकीच्या तोंडावर कल्याण शहरात सर्वात भयंकर घटना घडली आहे. सासूने मित्राच्या मदतीने सुनेचा खून केल्याची घटना उघडकीस आली आहे.
नेमकं प्रकरण काय?
भारतीय रेल्वेमध्ये नोकरी करणाऱ्या विलास गांगुर्डे यांचे सप्टेंबर 2025 मध्ये निधन झालं. त्यांच्या निधनानंतर पत्नी रुपाली गांगुर्डे यांना 10 लाखांची ग्रॅच्युईटीची रक्कम मिळाली. तसेच, मयत पतीच्या जागेवर आपल्या नातवाला तेथे अनुकंपा तत्वावर नोकरी मिळविण्यासाठी प्रयत्न करू, असं सासू लक्ष्मीबाईचं मत होतं. मात्र, त्याऐवजी सूनेनं स्वत:साठी रेल्वेत अनुकंपा तत्वावरील नोकरीसाठी अर्ज केला होता. यावरून आपल्या मुलाच्या पश्चात त्याच्या ग्रॅच्युईटीतील काही रक्कम देण्यासाठी सून नकार देत होती. या रागातून सासू लक्ष्मीबाईने आपल्या मित्राच्या मदतीने 1 जानेवारी 2026 रोजी कल्याण पूर्वेच्या जिम्मीबाग, कर्पेवाडी भागात राहत्या घरात सुनेची हत्या केली. या हत्येचा उलगडा महात्मा फुले चौक पोलिसांनी अवघ्या 24 तासांत केला.
Navi Mumbai Crime : आपण करू ग लग्न! मंगेशने विश्वास जिंकला, दोन वर्षे पीडितेच्या राहत्या घरासह अनेक ठिकाणी ठेवले शरीर संबंध, अखेर… नेमकं प्रकरण काय?
‘ती’ चूक पडली महागात
वालधुनी रेल्वे पुलाखाली एका अज्ञात महिलेची हत्या करून तिचा मृतदेह टाकून देण्यात आल्याची माहिती आरपीएफ पोलिसांनी महात्मा फुले पोलिसांना शुक्रवारी दि. 2 जानेवारीला दिली. पोलिसांनी तात्काळ तपास चक्रांना वेग दिला. घटनेचा तपास सुरू असताना लताबाई सुनेचा फोटो घेऊनच फुले पोलीस स्टेशनात गेल्या. 1 जानेवारी 2026च्या रात्री आठ वाजल्यापासून सून रूपाली ही घरातून गायब आहे. अजूनही ती घरी परतली नाही, असं सासूने पोलिसांना सांगितलं. रूपालीच्या चेहऱ्यावर, डोक्यावर आणि मनगटावर गंभीर जखमा होत्या. त्यामुळे पोलिसांना तिच्या मृतदेहाची ओळख पटवणं मोठं आव्हान होतं. फुले पोलिसांनी लताबाईला आपल्या बेपत्ता सुनेचा मृतदेह दाखवताच तिने पोलीस स्टेशनमध्येच टाहो फोडला.
Gulshan Kumar : T-Series कंपनीचे संस्थापक गुलशनकुमार हत्येतील मुख्य शार्प शूटरचा मृत्यू, कोण होता अब्दुल मर्चंट?
‘त्या’ एका थेंबामुळे सापडले
हीच आपली सून असल्याचं सांगत लताबाईने पोलीस ठाण्यातच आक्रोश केला. पण पोलिसांचा संशय लताबाईकडे अधिक बळावला. पोलिसांनी फॉरेन्सिक पथकाच्या मदतीने जिम्मीबागेतल्या घराची झडती घेतली. रूपालीच्या घराची लताबाई आणि तिच्या मित्राने साफसफाई केली. पण तरीही फरशीवर आढळलेले रक्ताचे थेंब पोलिसांच्या नजरेतून सुटले नाही. तपासणीवेळी हे रक्त रूपालीचे असल्याचे स्पष्ट झाले. यानंतर पोलिसांनी लताबाईची कसून चौकशी केली असता तिने तिचा मित्र जगदीश म्हात्रेने ही हत्या केल्याचे पोलिसांना सांगितले.
